एक्स्प्लोर

Corona Update : वाढत्या कोरोनाबाबत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली चिंता, नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन  

maharashtra Corona Update : 16 एप्रिल 2022 रोजी राज्यात सर्वात कमी म्हणजे 626 कोरोना रुग्ण आढळले होते. दीड महिन्यानंतर राज्यात बाधित रुग्णांची संख्या 626 वरून 4500 वर पोहोचली आहे.

maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Corona ) रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमिवर  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी कोरोनाचे रुग्ण वाढल्यास चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. कदाचित ही चौथी लाट असेल, परंतु, घाबरण्याची गरज नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता  पुन्हा मास्क वापरण्याची वेळ आली आहे. लोकांनी बाहेर पडताना खबरदारी घ्यायची आहे, शिवाय कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी मास्कचा वापर करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

राज्यात पुन्हा मास्क बंधणकारक करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. परंतु, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,  “भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) मार्गदर्शक तत्त्वे जारी करेपर्यंत आम्ही थांबलो आहोत. जेव्हा केंद्र सरकार नियम जारी करेल तेव्हा आम्ही देखील प्रोटोकॉल लागू करू.” 

"सध्या राज्यात कोरोना रूग्णांच्या संखेत वाढ होत असल्यामुळे त्याला आपण चौथी लाट म्हणता येईल. परंतु, घाबरायचं कारण नाही, फक्त सूचनांचे पालन करा, रुग्ण वाढत असले तरी चिंताजनक परिस्थिती नाही. मात्र, सर्वांनी मास्क वापला पाहिजे," असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.  

दरम्यान, काश्मीर मधील परिस्थितीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'काश्मिरी पंडितांसाठी आमचे दरवाजे सदैव खुले आहेत. आमच्या राज्यात त्यांचे स्वागत आहे. काश्मीरमधील परिस्थिती अजून सुधारलेली नाही. काश्मीरमधून जी माहिती समोर येत आहे ती चांगली नाही. आशा आहे की भारत सरकार यावर आपली भूमिका स्पष्ट करेल. 

 नवी मुंबईत झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "वृक्ष तोडणी होणार असे म्हटले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात त्याची परवानगी दिलेली नसून तो प्रस्ताव आहे. या प्रस्तावार अभ्यास केला जात आहे. पर्यावरणासाठी आम्ही शाश्वत काम करत आहोत. 

राज्यात कोरोना रूग्णांमध्ये वाढ  
16 एप्रिल 2022 रोजी राज्यात सर्वात कमी म्हणजे 626 कोरोना रुग्ण आढळले होते. दीड महिन्यानंतर राज्यात बाधित रुग्णांची संख्या 626 वरून 4500 वर पोहोचली आहे. गेल्या दीड महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात पटीने वाढली आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget