एक्स्प्लोर

अमित शाह यांच्यासह शिंदे-फडणवीसांनी तीन तास उन्हात उभं राहावं, मी 10 लाख देतो; जलील यांचे आव्हान

Imtiyaz Jaleel : उष्माघातच्या घटनेवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर टीका केली आहे.

Imtiyaz Jaleel On Maharashtra Bhushan Award Program: नवी मुंबईतील खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यानंतर अनेकांना उष्माघाताचा (Heath Stroke) त्रास झाला आणि यामध्ये एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 600 जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. तर यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी देखील यावरून सरकारवर टीका केली आहे. श्री सेवकांच्या मतांसाठी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) 13 जणांची हत्या केली असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. तर या लोकांनी फक्त तीन तास उन्हात उभं राहून दाखल्यावर मी 10 लाख रुपये देतो, असे आव्हान देखील जलील यांनी दिले आहे. 

दरम्यान याबाबत बोलताना जलील म्हणाले की, 20 लाख अनुयायांच्या मतांसाठी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 जणांची हत्या केली आहे. अनुयायांची मत लक्षात घेऊनच सोहळा मोठा केला गेला. सामान्य लोकांच्या जीवाची किंमत पाच लाख रुपये करता. मग तुमच्या जीवाची किंमत सांगा? असे जलील म्हणाले. तर गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी तीन तास उन्हात थांबवून दाखवाव, मी त्यांना 10 लाख रुपये देतो, असे आव्हान देखील जलील यांनी दिले. 

चर्चा होऊ नये म्हणून अजित पवारांचा विषय काढला

दरम्यान पुढे बोलताना जलील म्हणाले की,  नवी मुंबईतील खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारसाठी लाखो लोकं उपस्थित होते. मात्र यावेळी नेत्यांसाठी विशेष मंडपाची सोय करण्यात आली होती. परंतु कार्यक्रमासाठी आलेल्या श्री सेवकांना भर उन्हात बसवण्यात आले. यात 13 लोकांचा बळी गेला आहे. त्यानंतर काय केलं रुग्णालयात गेले आणि पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली. त्यामुळे मी तुम्हाला विचारतो तुमच्या जीवाची काय किंमत आहे, असे जलील म्हणाले. विशेष म्हणजे 13 जणांचा बळी गेल्यानंतर त्यावर चर्चा होऊ नये म्हणून अजित पवारांचा विषय काढला गेला असल्याचा आरोप देखील जलील यांनी केला आहे. 

अन्यथा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची गेली...

पुलवामामध्ये काय झालं होतं, मलिक यांना त्यावेळी कसे गप्प बसण्याचे सांगितले गेलं याबाबत माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या याच आरोपाच्या दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये अतिक अहमदवर गोळीबार करून हत्या करण्यात आली. त्यामुळे सर्व फोकस त्या घटनेकडे गेलं. मलिक यांनी केलेले आरोप गंभीर होते. त्यांच्या आरोपांवर जर चर्चा झाली असती तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची गेली असती. पण हा विषय चर्चेत येऊ नयेत म्हणून, आपली सरकार असल्याने गोळीबारची घटना घडवण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maharashtra Bhushan Award : 'आप्पांचे भक्त उन्हात आणि आप्पांमुळे मत मिळतील ते सावलीत'; जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर निशाणा

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
PM Modi on Vande Mataram: फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
Manoj Jarange and Dhananjay Munde: धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजितदादा पापात सहभागी होऊ नका, अन्यथा... मनोज जरांगेंचा इशारा
धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजितदादा पापात सहभागी होऊ नका, अन्यथा... मनोज जरांगेंचा इशारा
युझवेंद्र चहलच्या Ex वाईफचा गोव्यात ग्लॅम अवतार; हॉट फोटो पाहून चाहत्यांनीच श्वास रोखला!
युझवेंद्र चहलच्या Ex वाईफचा गोव्यात ग्लॅम अवतार; हॉट फोटो पाहून चाहत्यांनीच श्वास रोखला!
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
Embed widget