एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप 

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : महाराष्ट्र तोडण्याचा डाव भाजपकडून सुरू असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्याच्या सभेत बोलताना केली होती. याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय.

रत्नागिरी : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बोलायला आता काही नसल्यामुळे ते महाराष्ट्र तोडण्याची भाषा वापरत आहेत. कोण तोडतंय महाराष्ट्र? कशासाठी तोडतील?  महाराष्ट्र ना कधी तुटला, ना कधी तुटणार, ना कोणी कधी तोडण्याची हिंमत करणार. मुंबईपासून संपूर्ण महाराष्ट्र एकसंघ आहे आणि एक संघच राहील. ज्या गोष्टींमध्ये तथ्य नाही अशी वक्तव्य उद्धव ठाकरे सध्या करत आहेत. महाराष्ट्र भक्कमपणे चालवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत. परंतु, सत्ता गेल्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. 

 महाराष्ट्र तोडण्याचा डाव भाजपकडून सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्याच्या सभेत केली होती. याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे यांच्या अनेक मुद्द्यांवर बावनकुळे यांनी टीका केलीय. छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार लंडनमधून महाराष्ट्रात आणणार असं केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यावर टीका केली. "तलवार पेलण्यासाठी जे मनगट लागतं ते मनगट फक्त शिवसैनिक आणि शेतकऱ्यांमध्ये असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. यावर बोलताना  बावनकुळे म्हणाले, "गेले अडीच वर्ष तुमच्याकडे सत्ता होती. त्यावेळी तुमच्या हातातून पेन चालवण्याची सुद्धा ताकद नव्हती. तुम्ही काय तलवार उचलण्याची भाषा करता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात वेळ काढूपणाचं काम केलं. अडीच वर्ष फेसबुक लाईव्ह करत राहिले. हे मुख्यमंत्री असताना प्रायव्हेट सेक्रेटरीला देखील चार चार महिने वेळ मिळत नव्हता. अडीच वर्षाच्या काळात 18 महिने आमदारांनाही भेट दिली नाही. साध्या पत्रावरही सही केली नाही. त्यांच्या मनगटात काय ताकद आहे? जी काय ताकद आहे ती मोदीजींमध्ये आहे. मोदींमध्ये संपूर्ण जगात देशाला विश्वगुरू बनवण्याची ताकद आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातात जेव्हा होतं तेव्हा त्यांनी काही केलं नाही. मुख्यमंत्री असताना साधा पापड भाजता आला नाही आणि भाजलेला पापड तोडला आला नाही, तुम्ही काय जगदंबा तलवारीची गोष्ट करता? 

"शिंदे गटातील आमदारांना तुम्ही आता रेडे म्हणताय. मात्र ते शिवसेनेत असताना त्यांना तुम्ही तिकीट दिलंय. जनतेने त्यांना आमदार म्हणून निवडून दिले आहे. त्यावेळी ते शिवसैनिक होते आणि आता तुम्ही त्यांना रेडे म्हणताय. तुमच्या हुकूमशाहीला, दडपशाहीला कंटाळून हे लोक गेले आहेत. आमदारांची तुम्ही थट्टा करताय, पुढच्या वेळी तुम्हाला दोन आमदार मिळणं सुद्धा मुश्कील आहे. जे राहिले आहेत ते सुद्धा तुम्हाला सोडून जातील.  तुमच्या अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्र मागे गेलाय, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केला.  

भाजप हा चोर बाजारांचा पक्ष असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, "आम्ही तुमच्यासारखे हुकुमशहा नाही. तुम्हाला 40 आमदार सांभाळता आले नाहीत. तुम्ही आमदार खासदारांसोबत अत्यंत वाईट वागलात. त्यामुळेच तुमच्यासोबत आमदार, खासदार राहत नसून ते आमच्याकडे येत आहेत. महाविकास आघाडीला 2024  मध्ये उमेदवार सुद्धा मिळणार नाही अशी स्थिती होईल. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान भाजपमध्ये दीड हजार कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सत्तेच्या लोभापाई शिवसेनेची वाट लावली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची वाट लावली. त्यामुळे उद्धवजी हा इतिहास जमा झालेला विषय असतील.

बावनकुळे यांनी यावेळी राज्यपालांच्या वक्तव्याबाबत देखील आपली भूमिका स्पष्ट केली. "राज्यपालांच्या वक्तव्याचं कुणीही समर्थन केलेलं नाही. आतापर्यंतची 50 उदाहरणं असतील त्यांनी शिवरायांचा मान राखण्याचं काम केलं. पायी शिवनेरीवर सुद्धा ते गेले. एक संदर्भ आला आणि त्या संदर्भातून एक वक्तव्य आलं, त्या वक्तव्याचं समर्थन कोणीच करत नाही. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र बंद करण्याची भाषा करता. परंतु, महाराष्ट्र बंद करण्याची क्षमता तुमच्यात नाही.  उद्धव ठाकरें जवळ माणसंच राहिली नाहीत, तर ते महाराष्ट्र काय बंद करतील. हे फक्त वल्गना करतात. त्यांच्यासोबत कोणीच नाही. जे आहेत ते फक्त तोंडाच्या वाफा आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली.  

महत्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार, उद्धव ठाकरेंचं चिखलीत टीकास्त्र 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget