एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप 

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : महाराष्ट्र तोडण्याचा डाव भाजपकडून सुरू असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्याच्या सभेत बोलताना केली होती. याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय.

रत्नागिरी : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बोलायला आता काही नसल्यामुळे ते महाराष्ट्र तोडण्याची भाषा वापरत आहेत. कोण तोडतंय महाराष्ट्र? कशासाठी तोडतील?  महाराष्ट्र ना कधी तुटला, ना कधी तुटणार, ना कोणी कधी तोडण्याची हिंमत करणार. मुंबईपासून संपूर्ण महाराष्ट्र एकसंघ आहे आणि एक संघच राहील. ज्या गोष्टींमध्ये तथ्य नाही अशी वक्तव्य उद्धव ठाकरे सध्या करत आहेत. महाराष्ट्र भक्कमपणे चालवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत. परंतु, सत्ता गेल्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. 

 महाराष्ट्र तोडण्याचा डाव भाजपकडून सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्याच्या सभेत केली होती. याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे यांच्या अनेक मुद्द्यांवर बावनकुळे यांनी टीका केलीय. छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार लंडनमधून महाराष्ट्रात आणणार असं केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यावर टीका केली. "तलवार पेलण्यासाठी जे मनगट लागतं ते मनगट फक्त शिवसैनिक आणि शेतकऱ्यांमध्ये असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. यावर बोलताना  बावनकुळे म्हणाले, "गेले अडीच वर्ष तुमच्याकडे सत्ता होती. त्यावेळी तुमच्या हातातून पेन चालवण्याची सुद्धा ताकद नव्हती. तुम्ही काय तलवार उचलण्याची भाषा करता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात वेळ काढूपणाचं काम केलं. अडीच वर्ष फेसबुक लाईव्ह करत राहिले. हे मुख्यमंत्री असताना प्रायव्हेट सेक्रेटरीला देखील चार चार महिने वेळ मिळत नव्हता. अडीच वर्षाच्या काळात 18 महिने आमदारांनाही भेट दिली नाही. साध्या पत्रावरही सही केली नाही. त्यांच्या मनगटात काय ताकद आहे? जी काय ताकद आहे ती मोदीजींमध्ये आहे. मोदींमध्ये संपूर्ण जगात देशाला विश्वगुरू बनवण्याची ताकद आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातात जेव्हा होतं तेव्हा त्यांनी काही केलं नाही. मुख्यमंत्री असताना साधा पापड भाजता आला नाही आणि भाजलेला पापड तोडला आला नाही, तुम्ही काय जगदंबा तलवारीची गोष्ट करता? 

"शिंदे गटातील आमदारांना तुम्ही आता रेडे म्हणताय. मात्र ते शिवसेनेत असताना त्यांना तुम्ही तिकीट दिलंय. जनतेने त्यांना आमदार म्हणून निवडून दिले आहे. त्यावेळी ते शिवसैनिक होते आणि आता तुम्ही त्यांना रेडे म्हणताय. तुमच्या हुकूमशाहीला, दडपशाहीला कंटाळून हे लोक गेले आहेत. आमदारांची तुम्ही थट्टा करताय, पुढच्या वेळी तुम्हाला दोन आमदार मिळणं सुद्धा मुश्कील आहे. जे राहिले आहेत ते सुद्धा तुम्हाला सोडून जातील.  तुमच्या अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्र मागे गेलाय, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केला.  

भाजप हा चोर बाजारांचा पक्ष असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, "आम्ही तुमच्यासारखे हुकुमशहा नाही. तुम्हाला 40 आमदार सांभाळता आले नाहीत. तुम्ही आमदार खासदारांसोबत अत्यंत वाईट वागलात. त्यामुळेच तुमच्यासोबत आमदार, खासदार राहत नसून ते आमच्याकडे येत आहेत. महाविकास आघाडीला 2024  मध्ये उमेदवार सुद्धा मिळणार नाही अशी स्थिती होईल. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान भाजपमध्ये दीड हजार कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सत्तेच्या लोभापाई शिवसेनेची वाट लावली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची वाट लावली. त्यामुळे उद्धवजी हा इतिहास जमा झालेला विषय असतील.

बावनकुळे यांनी यावेळी राज्यपालांच्या वक्तव्याबाबत देखील आपली भूमिका स्पष्ट केली. "राज्यपालांच्या वक्तव्याचं कुणीही समर्थन केलेलं नाही. आतापर्यंतची 50 उदाहरणं असतील त्यांनी शिवरायांचा मान राखण्याचं काम केलं. पायी शिवनेरीवर सुद्धा ते गेले. एक संदर्भ आला आणि त्या संदर्भातून एक वक्तव्य आलं, त्या वक्तव्याचं समर्थन कोणीच करत नाही. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र बंद करण्याची भाषा करता. परंतु, महाराष्ट्र बंद करण्याची क्षमता तुमच्यात नाही.  उद्धव ठाकरें जवळ माणसंच राहिली नाहीत, तर ते महाराष्ट्र काय बंद करतील. हे फक्त वल्गना करतात. त्यांच्यासोबत कोणीच नाही. जे आहेत ते फक्त तोंडाच्या वाफा आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली.  

महत्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार, उद्धव ठाकरेंचं चिखलीत टीकास्त्र 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, भेटीच्या टायमिंगमुळे खळबळ, तर तटकरेंचा वेगळा दावा
मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, भेटीच्या टायमिंगमुळे खळबळ, तर तटकरेंचा वेगळा दावा
धक्कादायक! वादळी वाऱ्यासह पावसानं भिंत कोसळली, सहा भाविकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी, सांगली जिल्ह्यात हळहळ
धक्कादायक! वादळी वाऱ्यासह पावसानं भिंत कोसळली, सहा भाविकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी, सांगली जिल्ह्यात हळहळ
...बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? मुंबईतील 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
...बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? मुंबईतील 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
सावधान! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे, विक्रमी तापमानाची नोंद होणार, हवामान विभागाचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन
सावधान! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे, विक्रमी तापमानाची नोंद होणार, हवामान विभागाचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget