एक्स्प्लोर

Maharashtra corona crisis : बीडमध्ये अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने दोन रुग्ण दगावले?

बीडमध्ये अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

बीड : नाशिकमध्ये ऑक्सिजनची गळती होऊन लोकांना प्राण गमवावे लागले तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयांमध्ये सुद्धा ऑक्सिजन संपल्याने सहा लोकांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला होता. आता तिसरी घटना समोर आली आहे, ती म्हणजे बीड मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अचानक ऑक्सिजनचा पुरवठा कोणीतरी बंद केला. त्यामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

बीडच्या जिल्हा रुग्णालयातील प्रकार 
बीड येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डात व्यवस्थापनाचा अनागोंदी कारभार रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. काल मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने येथील ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याचा प्रकार समोर आला. यात दोन रुग्ण दगावले आहेत. दरम्यान रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठा बंद केला गेल्याचे मान्य केले असले तरी रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याचे मात्र मान्य केले नाही.

बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आता कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले याच हॉस्पिटलमध्ये वार्ड क्रमांक सातमध्ये रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान प्लांटमधून होणारा ऑक्सिजन सप्लाय कॉक कुणीतरी बंद केला आणि यानंतर व्हेंटिलेटरवर असणाऱ्या एका रुग्णांचा मृत्यू झालाय.

Corona India | ऑक्सिजन अभावी दिल्लीत 20 तर अमृतसरमध्ये 5 रुग्णांचा मृत्यू

यासंदर्भात बीड सिव्हिल हॉस्पिटलचे आरएमओ डॉक्टर सुखदेव राठोड यांनी सांगितले की प्लांटमधून येणाऱ्या ऑक्सिजन सोबतच जम्बो सिलेंडर आम्ही रुग्णांना लावत असतो आणि ते सिलेंडर चालू होते, ही घटना घडल्याचे जरी खरे असले तरी रुग्णाचा मृत्यू ऑक्सिजन कमी पडल्यामुळे झाला नाही. कारण, ती घटना घडल्यानंतर बऱ्याच काळाने रूग्ण दगावला असल्याचे राठोड यांनी सांगितलय.

एकूणच बीडच्या आरोग्य प्रशासनाने काही काळापुरता ऑक्सिजन सप्लाय बंद झाला असल्याचे मान्य केले एवढेच नाही तर या संदर्भात चौकशी अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. मात्र, अशा प्रकारचा हलगर्जीपण आरोग्य प्रशासन कसं काय खपवून घेते याविषयी मात्र आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget