एक्स्प्लोर

Maharashtra and Karnataka Border Dispute : जत तालुक्यातील गावे सोडाच आता बेळगाव खानापूर घ्यायची वेळ आली: शहाजीबापू पाटील

Maharashtra and Karnataka Border Dispute : कर्नाटकाचज्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्याबाबत केलेले विधान अत्यंत चुकीचे असून आता महाराष्ट्रात बेळगाव घ्यायची वेळ आली आहे, असा सणसणीत टोला आमदार शहाजीबापू पाटील यांनी लगावला.

Maharashtra and Karnataka Border Dispute : कर्नाटकाचज्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्याबाबत केलेले विधान अत्यंत चुकीचे असून आता महाराष्ट्रात बेळगाव घ्यायची वेळ आली आहे, असा सणसणीत टोला आमदार शहाजीबापू पाटील यांनी लगावला. जत तालुकाच सोडा राज्यातील कोणत्याही गावाला आता हे शिंदे फडणवीस सरकार पाण्यापासून वंचित ठेवणार नसून जत तालुक्यातील दुष्काळी गावासाठी वारणा खोऱ्यातून 6 टीएमसी पाणी म्हैसाळ योजनेत दिले जाणार असून यामुळे जत तालुक्याचा पाणी प्रश्न पूर्णपणे सुटणार असल्याचे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. 

सांगोला, जत, म्हसवड, आटपाडी वगैरे दुष्काळी पत्त्यासाठी टेम्भू , म्हैसाळ आणि उजनी उपसा सिंचन योजनेचे पाणी आणण्याचे काम सुरु असल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कोणतेही गाव कर्नाटकमध्ये जाण्याचे नाव घेणार नसल्याचे शहाजीबापू यांनी सांगितले. हा छत्रपतींचा महाराष्ट्र असून येथील जनतेला लढायची परंपरा असल्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असली स्वप्ने बघू नयेत, असा टोला शहाजीबापू यांनी लगावला. 14 वर्षांपूर्वी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या भागातील काही गावांनी तत्कालीन काँग्रेस सरकारला आपली अवस्था समजण्यासाठी, असे ठराव केलेला प्रयत्न होता. पण आता बहुतांश भागातील गावांचे प्रश्न सुटू लागले असून उरलेल्या गावांचा पाणीप्रश्न देखील येत्या 2 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडवणार असल्याचा दावा शहाजीबापू यांनी केला.
 
पुन्हा एकदा गुवाहाटीला जायचा निरोप आज सकाळीच मिळाला असून 26 नोव्हेंबरला सकाळी निघणार असून 27 नोव्हेंबरला कामाख्या देवीचे दर्शन घेऊन परत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देवीला नवस हा प्रत्येकाने केलाच असणार पण सगळ्यांनी तो मनात मागितला होता. आता देवीने राज्यात शिंदे सरकार आणल्याने राज्याचे प्रश्न झपाट्याने सुटू लागले असून देवीचे आभार मानण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला जात आहोत, असे शहाजीबापू यांनी सांगितले. आता काय डोंगर काय झाडी होणार नाही आत काय शिंदे-फडणवीस सरकार, काय त्याचा कारभार आणि काय महाराष्ट्र, सगळं एकदम ओके आहे, असा डायलॉगही त्यांनी मारला आहे. संजय राऊत यांच्यावर आता जाहीर सभेतून उत्तर देणार असून हा हातात पेट्रोल डबा घेऊन महाराष्ट्र पेटवत चालला असल्याचा टोला शहाजीबापू यांनी लगावला आहे. 

संबंधित बातमी: 

Maharashtra and Karnataka Border Dispute : महाराष्ट्रात नाक खुपसायचा काय संबंध? कोणाचा बाप आला, तरी आम्ही एक इंच जमीन देणार नाही; शिवसेनेचा हल्लाबोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Embed widget