एक्स्प्लोर

Maharashtra and Karnataka Border Dispute : जत तालुक्यातील गावे सोडाच आता बेळगाव खानापूर घ्यायची वेळ आली: शहाजीबापू पाटील

Maharashtra and Karnataka Border Dispute : कर्नाटकाचज्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्याबाबत केलेले विधान अत्यंत चुकीचे असून आता महाराष्ट्रात बेळगाव घ्यायची वेळ आली आहे, असा सणसणीत टोला आमदार शहाजीबापू पाटील यांनी लगावला.

Maharashtra and Karnataka Border Dispute : कर्नाटकाचज्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्याबाबत केलेले विधान अत्यंत चुकीचे असून आता महाराष्ट्रात बेळगाव घ्यायची वेळ आली आहे, असा सणसणीत टोला आमदार शहाजीबापू पाटील यांनी लगावला. जत तालुकाच सोडा राज्यातील कोणत्याही गावाला आता हे शिंदे फडणवीस सरकार पाण्यापासून वंचित ठेवणार नसून जत तालुक्यातील दुष्काळी गावासाठी वारणा खोऱ्यातून 6 टीएमसी पाणी म्हैसाळ योजनेत दिले जाणार असून यामुळे जत तालुक्याचा पाणी प्रश्न पूर्णपणे सुटणार असल्याचे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. 

सांगोला, जत, म्हसवड, आटपाडी वगैरे दुष्काळी पत्त्यासाठी टेम्भू , म्हैसाळ आणि उजनी उपसा सिंचन योजनेचे पाणी आणण्याचे काम सुरु असल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कोणतेही गाव कर्नाटकमध्ये जाण्याचे नाव घेणार नसल्याचे शहाजीबापू यांनी सांगितले. हा छत्रपतींचा महाराष्ट्र असून येथील जनतेला लढायची परंपरा असल्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असली स्वप्ने बघू नयेत, असा टोला शहाजीबापू यांनी लगावला. 14 वर्षांपूर्वी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या भागातील काही गावांनी तत्कालीन काँग्रेस सरकारला आपली अवस्था समजण्यासाठी, असे ठराव केलेला प्रयत्न होता. पण आता बहुतांश भागातील गावांचे प्रश्न सुटू लागले असून उरलेल्या गावांचा पाणीप्रश्न देखील येत्या 2 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडवणार असल्याचा दावा शहाजीबापू यांनी केला.
 
पुन्हा एकदा गुवाहाटीला जायचा निरोप आज सकाळीच मिळाला असून 26 नोव्हेंबरला सकाळी निघणार असून 27 नोव्हेंबरला कामाख्या देवीचे दर्शन घेऊन परत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देवीला नवस हा प्रत्येकाने केलाच असणार पण सगळ्यांनी तो मनात मागितला होता. आता देवीने राज्यात शिंदे सरकार आणल्याने राज्याचे प्रश्न झपाट्याने सुटू लागले असून देवीचे आभार मानण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला जात आहोत, असे शहाजीबापू यांनी सांगितले. आता काय डोंगर काय झाडी होणार नाही आत काय शिंदे-फडणवीस सरकार, काय त्याचा कारभार आणि काय महाराष्ट्र, सगळं एकदम ओके आहे, असा डायलॉगही त्यांनी मारला आहे. संजय राऊत यांच्यावर आता जाहीर सभेतून उत्तर देणार असून हा हातात पेट्रोल डबा घेऊन महाराष्ट्र पेटवत चालला असल्याचा टोला शहाजीबापू यांनी लगावला आहे. 

संबंधित बातमी: 

Maharashtra and Karnataka Border Dispute : महाराष्ट्रात नाक खुपसायचा काय संबंध? कोणाचा बाप आला, तरी आम्ही एक इंच जमीन देणार नाही; शिवसेनेचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget