एक्स्प्लोर

Amravati Violence : अमरावतीत हिंसाचारानंतर संचारबंदी, इंटरनेट सेवा तीन दिवस बंद राहणार

शहर पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी सांगितले की, हिंसाचाराला चिथावणी देणार्‍या अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा तीन दिवस बंद ठेवली जाईल.

अमरावती: महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये 'बंद' दरम्यान हिंसाचाराच्या ताज्या घटनांनंतर शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आला असून पुढचे तीन दिवस इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली. शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याबाबत माहिती दिली. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. अमरावतीमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.

त्रिपुरामधील घटनेच्या निषेधार्थ काल झालेल्या हिंसाचारानंतर अमरावतीमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र या बंदलाही हिंसक वळण लागलंय. सकाळी दहाच्या सुमारास जमाव मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला. या जमावाने काही वेळातच दगडफेक आणि घोषणाबाजी सुरु केली. जमावाने यावेळी दुकानांना लक्ष्य केलं. दुकानांवर दगडफेक करत तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जमावाला नियंत्रित करण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

तीन दिवस इंटरनेट सेवा बंद

शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले की, हिंसाचाराला चिथावणी देणार्‍या अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा तीन दिवस बंद ठेवली जाईल. अमरावतीतील राजकमल चौक परिसरात शनिवारी सकाळी शेकडो लोक बाहेर पडले आणि अनेकांनी भगवे झेंडे हातात घेतले होते.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की जमावात उपस्थित काही लोकांनी राजमकाल चौक आणि इतर ठिकाणी दगडफेक केली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या दगडफेकीच्या घटनांनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये शहरात संचारबंदी लागू केली.

संचारबंदी कालावधीत कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही.  तसेच, पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नये. तसेच या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये  कारवाई करण्यात येईल. हा आदेश आजपासून संपूर्ण अमरावती शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे. 

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी  म्हटलं आहे की, कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये. अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल. याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी शांतता राखावी. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. तसेच गृहमंत्री स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

विनाकारण घराबाहेर पडू नका! संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 गुन्हा भविष्यात अडचणीचा ठरणार

Amravati violence Update : अमरावतीत बंदला हिंसक वळण, दगडफेकीनंतर पोलिसांकडून जमावावर लाठीचार्ज

त्रिपुरा हिंसाचाराच्या विरोधात राज्यातील आंदोलनांना हिसंक वळण, काही ठिकाणी मोर्चादरम्यान दगडफेक, शांततेचं आवाहन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad & Ujjwal Nikam: संतोष देशमुख खटल्यातील आरोपींकडून D2 ऑपरेशन सुरू, उज्वल निकमांचा कडाडून विरोध, कोर्टात नेमकं काय घडलं ?
संतोष देशमुख खटल्यातील आरोपींकडून D2 ऑपरेशन सुरू, उज्वल निकमांचा कडाडून विरोध, कोर्टात नेमकं काय घडलं ?
Mumbai Cable Robbery: मुंबईत चक्रावणारी चोरी, जमिनीतून एमटीएनलची 1 कोटीची केबल काढली, राजकीय नेत्याशी कनेक्शन
मुंबईत चक्रावणारी चोरी, जमिनीतून एमटीएनलची 1 कोटीची केबल काढली, राजकीय नेत्याशी कनेक्शन
मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये; उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडेंची ठाम भूमिका
मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये; उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडेंची ठाम भूमिका
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज-उद्धव भेटीत पहिला धमाका, महापालिका युतीची अधिकृत चर्चा, कोणकोणत्या मनपात युती?
राज-उद्धव भेटीत पहिला धमाका, महापालिका युतीची अधिकृत चर्चा, कोणकोणत्या मनपात युती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad & Ujjwal Nikam: संतोष देशमुख खटल्यातील आरोपींकडून D2 ऑपरेशन सुरू, उज्वल निकमांचा कडाडून विरोध, कोर्टात नेमकं काय घडलं ?
संतोष देशमुख खटल्यातील आरोपींकडून D2 ऑपरेशन सुरू, उज्वल निकमांचा कडाडून विरोध, कोर्टात नेमकं काय घडलं ?
Mumbai Cable Robbery: मुंबईत चक्रावणारी चोरी, जमिनीतून एमटीएनलची 1 कोटीची केबल काढली, राजकीय नेत्याशी कनेक्शन
मुंबईत चक्रावणारी चोरी, जमिनीतून एमटीएनलची 1 कोटीची केबल काढली, राजकीय नेत्याशी कनेक्शन
मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये; उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडेंची ठाम भूमिका
मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये; उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडेंची ठाम भूमिका
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज-उद्धव भेटीत पहिला धमाका, महापालिका युतीची अधिकृत चर्चा, कोणकोणत्या मनपात युती?
राज-उद्धव भेटीत पहिला धमाका, महापालिका युतीची अधिकृत चर्चा, कोणकोणत्या मनपात युती?
Solapur Crime: जिच्या नादापायी बीडच्या उपसरपंचाने आयुष्य संपवलं ती पूजा गायकवाड कोण?
जिच्या नादापायी बीडच्या उपसरपंचाने आयुष्य संपवलं ती पूजा गायकवाड कोण?
Beed Crime News: बीडमध्ये हुंडाबळी; सासरच्या मंडळींकडून वारंवार जाच, विहिरीत आढळला नवविवाहितेचा मृतदेह, दोन महिन्यातच शेवट, शरीरावर अनेक जखमा अन्...
बीडमध्ये हुंडाबळी; सासरच्या मंडळींकडून वारंवार जाच, विहिरीत आढळला नवविवाहितेचा मृतदेह, दोन महिन्यातच शेवट, शरीरावर अनेक जखमा अन्...
Pune: डोक्यावर हेल्मेट नाही, सिग्नल तोडला तरी काळजी नको, पुण्यात वाहतूक दंडात मोठी सूट, नेमकं काय होणार?
डोक्यावर हेल्मेट नाही, सिग्नल तोडला तरी काळजी नको, पुण्यात वाहतूक दंडात मोठी सूट, नेमकं काय होणार?
Samruddhi Expressway :  समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; तपासात धक्कादायक कारण समोर, त्या रात्री नेमकं काय घडलं?
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; तपासात धक्कादायक कारण समोर, त्या रात्री नेमकं काय घडलं?
Embed widget