एक्स्प्लोर

'राज्यात रोज सरासरी सहा शेतकरी आत्महत्या, सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं', भाजपचा आरोप

राज्यात जानेवारी ते जून या सहा महिन्यात तब्बल 1 हजार 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. रोज सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप भाजपने केला आहे.

नागपूर : राज्यात जानेवारी ते जून या सहा महिन्यात तब्बल 1 हजार 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. रोज सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 50 हजार कोटींचा पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. रोज कोरोनाचं वाढतं संकट, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या याचीच चर्चा होत असताना राज्यात गेल्या सहा महिन्यात तब्ब्ल 1 हजार 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 1 जानेवारी ते 30 जून या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात एक हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून राज्य सरकार गप्प असल्याचा आरोप ही बावनकुळे यांनी केला.  50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे गेले सहा महिने राज्य सरकारने प्रचंड दुर्लक्ष केले आहे. त्यातच कोरोनाचा संकट आल्याने सर्वच बाजारपेठा संकटात आल्या. कोरोना संकटाच्या काळात जसं इतर बाजारपेठांवर संकट कोसळलं. तसंच शेतमाल आणि भाजीपाल्याच्या बाजारपेठांवर ही संकट कोसळलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना गेले अनेक महिने कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे नैराश्यात असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे जीवन संपवल्याचे बावनकुळे म्हणाले. राज्य सरकारने त्वरित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी ही बावनकुळे यांनी केली आहे. रोज सरासरी सहा शेतकऱ्यांची आत्महत्या  गेल्या सहा महिन्यात राज्यात 1 हजार 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सरासरीने रोज सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं यामुळे उघड झालं आहे. मार्च महिन्याच्या अखेरपासून कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा सर्वाधिक फटका राज्यातील शेतमालाच्या बाजारपेठेला परिणामी शेतकऱ्यांना बसला आहे. खासकरून फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. अजून ही फळे आणि भाजीपाला शहरातील बाजारापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. परिणामी मालाची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचे पॅकेज आणावे अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget