एक्स्प्लोर

Jalgaon on Coronavirus | जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी! कोरोना बाधित रुग्णांमध्ये निम्याने घट, सोबतचं बरे होणांऱ्यामध्येही वाढ

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधीत होण्याच्या प्रमाणात निम्याने घट झाल्याचे समोर आले आहे. सोबतचं बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर जळगावकरांना दिलासा देणारी बातमी ठरली आहे.

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने लाखांचा आकडा पार केला आहे तर सतराशेच्या पुढे रुग्ण हे कोरोनाने मृत्यू पावले आहे. असे असताना कोरोनाच्या वेगाने आलेल्या दुसऱ्या साथीने प्रशासनाच्या आणि जनतेच्या मनात चांगलीच भीती निर्माण केल्याचं पाहायला मिळत होते. मात्र, मागील आठवडाभराचा विचार करता बाधीत होणाऱ्या रुग्ण संख्येत दिवसागणिक घट होत असल्याने आणि बाधित होणाऱ्या एवढेच रुग्ण बरे होऊन परत जात असल्याने प्रशासन आणि जनतेच्या दृष्टीने मोठा दिलासा देणारी बातमी ठरली आहे.
     
जळगाव जिल्हा हा कोरोनाच्या बाबतीत सुरुवातीपासून हॉटस्पॉट ठरला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तर कोरोनाचा मृत्यूदर हा तेरा टक्क्यापर्यंत इतका जाऊन पोहोचला असल्याने  केवळ देश पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर देखील जळगाव चर्चेचा विषय बनले होते. त्यानंतर मात्र प्रशासनाने सर्वच पातळीवर प्रयत्न करून मृत्यूदर कमी करण्यात यश मिळविल्याने प्रशासन आणि जनतेत काहीशी बेफिकिरी दिसून आल्याचं दिसून आल्याच समोर आले होते. त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या लाटेचे रूपांतर केव्हा समूह संसर्गात झाले हे कोणालाही कळले नव्हते.

सध्या जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर कोरोनाची दुसरी लाट ही उच्च पातळीवर असल्याचं पाहायला मिळत असल्याने आणि रोज साधारणपण बाराशे नवे रुग्ण आणि पंधरा बधितांचा मृत्यू असं समीकरण बनल्याने संपूर्ण जिल्हाभरात भीतीचं वातावरण पसरले असल्याचं दिसून येत होते. मात्र, गेल्या आठवड्याचा जर विचार केला तर दिवसागणिक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता काही प्रमाणात कमी होत असल्याचं समोर आल्याने जळगावकरांच्या दृष्टीने दिलासा देणारी बातमी आहे.

गेल्या आठवडाभरापासून अकराशे ते बाराशे नवीन बाधित रुग्ण समोर येत असले तरी त्यात बाधित होण्याच्या प्रमाणात घट झाल्याचे प्रशासनाने म्हटलं आहे. मागच्या महिन्यात बाराशे बाधित रुग्ण हे पाच ते सहा हजार चाचण्यांमध्ये येत होते. तेवढेच नवीन बाधित रुग्ण आता आठ ते दहा हजार चाचण्यांत येत असल्याने बाधित होण्याचा दर हा वीस टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर आला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणपण जवळपास तेवढेच असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीने दिलासा देणारी बातमी ठरली आहे. अजूनही पुढील काही काळात दुसऱ्या लाटेचा जोर ओसरला जाईल, अशी शक्यताही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget