एक्स्प्लोर

पीक विमा स्वीकारण्यास कंपन्याचा नकार; शेतकऱ्यांसमोर अस्मानी सोबतच सुलतानी संकट

सध्या अवकाळी पावसाने राज्यात हाहाकार उडवून दिला आहे. जवळजवळ 70 लाख हेक्टर पिकांचे यामध्ये नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात असतानाच आता सुलतानी संकटही त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.

बीड : अवकाळी पावसाने राज्यात हाहाकार उडवला असतानाच शेतकऱ्यांसमोर अस्मानी सोबतच सुलतानी संकट उभे राहिले आहे. कारण या काळात जे पिकांचे नुकसान झालंय त्या पिकांना पीक विमा कसा मिळणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे राज्यातल्या प्रमुख 10 जिल्ह्यातील पीक विमा घेण्यासाठी कोणतीही कंपनी तयार होत नाही. त्यामुळं या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभं राहिलं आहे. चंद्रपूरचे धान असो की सिंधुदुर्गचे भात, बीडचा कापूस असो की सोयाबीन, परतीच्या पावसाने हे सगळे पीक मातीमोल केले. मराठवाड्यात तर पावसाळ्याच्या तोंडावर मोठा दुष्काळ पडला होता. याही संकटात शेतकऱ्याने मोठ्या हिमतीने पेरणी केली. मात्र, अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं केलं. शेतकऱ्यांचं नुकसान एवढं मोठं आहे की त्यासोबत कोणतीही मदत तोडकी पडेल. मात्र हक्काचा पीक विमासुद्धा आता या शेतकऱ्यांना भरता येणार नाही. काय आहे पीक विमा कंपनीचे आडमुठे धोरण? एकूण राज्यामध्ये 6 क्लस्टरमध्ये वेगवेगळ्या कंपनीमार्फत पीक विम्याचं काम केलं जातं. सोलापूर, लातूर, हिंगोली, वाशिम, भंडारा, बीड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी एक क्लस्टर बनवण्यात आले आहे. या क्लस्टरसाठी सुरुवातीला 9 सप्टेंबरला निविदा मागवण्यात आल्या पण कोणतीही कंपनी पुढे आली नाही. नंतर 3 ऑक्टोबरला फेर निविदा मागवण्यात आल्या. तिथेही प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा 5 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली. मात्र अद्याप कोणतीही कंपनी या क्लस्टरचा विमा घेण्यासाठी पुढे आलेली नाही विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या याच 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोठा फायदा झालेला आहे. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी पावसाची अवकृपा यामुळे शेतकरी नेहमीच संकटात असतो. अशावेळी शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोठा आधार असतो. अशा परिस्थितीमध्ये जर पीक विमा उतरवण्यासाठी कोणतीही कंपनी समोर येत नसेल तर सरकारने आपल्या कंपन्यांमार्फत पीक विमा उतरवावा, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत. 3 जानेवारी 2016 ला नरेंद्र मोदी सरकारने देशात पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली होती. त्यानंतर देशभरातील एकूण 17 कंपन्यांना पीक विम्याचे वाटप करण्याचे काम देण्यात आले होते. याच योजनेतून बाहेर पडून पश्चिम बंगाल सरकारने पश्चिम बंगाल राज्यापुरती मर्यादित एक पीक विमा योजना काढली आहे. आता जर खासगी कंपन्या पीक विमा स्वीकारण्यासाठी पुढे येत नसतील तर पश्चिम बंगाल सरकारचा आदर्श महाराष्ट्र सरकार आपल्या डोळ्यासमोर ठेवणार का हाच एक प्रश्न आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Embed widget