एक्स्प्लोर

अतिभव्य कालेश्वरम-मेडिगड्डा सिंचन बंधाऱ्याचं उद्या लोकार्पण, कसा आहे प्रकल्प?

21 जून रोजी कालेश्वरम-मेडिगड्डा सिंचन बंधाऱ्याचं लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याला तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या तीन राज्यांचे मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित असतील.

गडचिरोली : तेलंगणा सरकारने गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र सीमेवरील गोदावरी संगमावर कालेश्वरम-मेडिगड्डा सिंचन बंधारा उभारला आहे. या अतिभव्य सिंचन बंधाऱ्याचं उद्या म्हणजेच 21 जून रोजी लोकार्पण होणार आहे. मागास आणि नक्षलग्रस्त म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात अनेक बारमाही नद्या आहेत. शिवाया 80 टक्के क्षेत्रावर जंगल असल्याने वार्षिक पर्जन्यमानही 1300 मिमी आहे. जिल्ह्यातील गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांच्या संगमस्थळी असलेल्या मेडिगड्डा गावाजवळ तेलंगणा सरकारने मेडिगड्डा-कालेश्वरम सिंचन बंधारा बांधला आहे. कसा आहे कालेश्वरम-मेडिगड्डा सिंचन प्रकल्प? - या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च तब्बल 80 हजार कोटी रुपये आहे. - प्रकल्पाला पहिली मंजुरी 2017 मध्ये मिळाली आणि त्याचं लोकार्पण जून 2019 रोजी - या प्रकल्पाच्या 7 टप्प्यांपैकी एकाचं काम पूर्ण झालं आहे. - प्रकल्पामुळे तेलंगणातील एक कोटी एकर जमिनीला सिंचन होणार आहे. - महाराष्ट्राच्या सीमेपासून हैदराबादच्या पुढे 1832 किमीच्या जलवाहिन्या तसं कालवे असतील. - या मार्गात येणारी सर्व खेडी तसंच शहांना दहा टीएमसी पाणी संरक्षित असेल. - तर हैदराबाद आणि सिकंदराबाद या शहरांसाठी 30 टीएमसी पाणीसाठा संरक्षित केला जाईल. - उद्योगासाठी 16 टीएमसी पाणीसाठा सुरक्षित करण्यात आला आहे. - या बंधाऱ्याच्या मार्गातील मोठे जलाशय, तलाव आणि कालवे यामधील एकूण पाणीसाठा 141 टीएमसी असेल महाराष्ट्रातून वाहून जाणाऱ्या पाण्यावर बंधारा गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेला हा अतिभव्य बंधारा खरंतर महाराष्ट्रातून वाहून जाणाऱ्या पाण्यावर बांधण्यात आला आहे. मेडिगड्डा धरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील 562 एकर जमीन संपादित केली आहे. तेलंगणा सरकारने आपल्या जनतेच्या सिंचन आणि तृष्णातृप्तीसाठी जमीन मालकांना वाट्टेल ती रक्कम मोबदला म्हणून दिली आहे. महाराष्ट्राच्या आक्षेपानंतर बंधाऱ्याची उंची कमी केली महाराष्ट्राच्या आक्षेपानंतर बंधाऱ्याची उंची 102 मीटरऐवजी 100 मीटर निर्धारित करण्यात आली आहे. बंधाऱ्याला एकूण 85 वक्राकार दारे आहेत. हैदराबादला पाणी पोहोचेपर्यंत सर्व प्रमुख चार टप्प्यात भव्य पंपाद्वारे पाणी पुढच्या टप्प्यात टाकलं जाणार आहे. प्रकल्पाच्या 13074 हेक्टर एकूण बुडीत क्षेत्रापैकी 1227 हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रात आहे. सुधारित मान्यतेनुसार महाराष्ट्रातील एकही गाव यात बुडीत राहणार नाही. याचा मोठा लाभ तेलंगणा राज्याला आहे. मात्र गोदावरी तंटा लवादानुसार महाराष्ट्राला आपल्या पाणीवापराचे अधिकार अबाधित आहेत. बंधाऱ्याचा फायदा मासेमारी, पर्यटन, नौकानयन असे अधिकार दोन्ही राज्यांना असतील. या बंधाऱ्याच्या प्रत्यक्ष नियंत्रणासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत दोन्ही राज्याच्या जलसंपदा विभागाचे उच्चाधिकारी आहेत. बंधाऱ्याच्या बॅक वॉटरचा फायदा सिरोंचा तालुक्याला अपेक्षित आहे. यात पेंटीपाका, रंगय्यापल्ली, टेकडा, आणि रेगुंठा उपसा जलसिंचन योजनेद्वारे सिंचन प्रस्तावित आहे. या भागातील नळयोजनाना पाणी आणि शहरातील भूजल पातळी वाढ असेही लाभ अपेक्षित आहेत. गडचिरोलीतील वर्षानुवर्षे रखडलेले सिंचन प्रकल्प पण बंधाऱ्याला जवळ असलेल्या सिरोंचा भागाला पुराच्या वेळी बंधाऱ्यातील पाणीसंचयाचा धोका होईल का? यावर प्रशासन तसंच लोकप्रतिनिधींनी मौन बाळगलं आहे. गडचिरोलीत कारवाफा, चेन्ना, तुलतुली तर चंद्रपूर जिल्ह्यात गोसेखुर्द, हुमन, भेंडाळा, दिंडोरा हे सिंचन प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. मेडिगड्डा-कालेश्वरम सिंचन बंधाऱ्यामुळे तेलंगणातील लोकांचा पाणीप्रश्न मिटणार असता तरी महाराष्ट्रातील जनतेचा गरजा कशा भागणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. फडणवीसही लोकापर्णाला उपस्थित राहणार 21 जून रोजी कालेश्वरम-मेडिगड्डा सिंचन बंधाऱ्याचं लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याला तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या तीन राज्यांचे मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित असतील. कोणालाही न जुमानता के चंद्रशेखर राव यांचं काम तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कृष्णा खोरे गोसेखुर्द पेक्षा कितीतरी पटीने मोठा असलेला प्रकल्प अवघ्या दोन वर्षात साठ टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाला आहे. स्वत:च्या राज्यात चंद्रशेखर राव यांनी सगळे नियम धाब्यावर बसवून, जंगलाची पर्वा न करता, केंद्रीय वन खात्याच्या परवानगीशिवाय हे काम केलं. हरित लवादने दंडही ठोठावला, परंतु पर्वा केली नाही. त्यामुळे तेलंगणाच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते कौतुकास पात्र ठरले आहेत. दरम्यान या प्रकल्पामुळे तेलंगणातील जनतेची तहान भागणार असली तर यामुळे सिरोंचा तालुका कायमचा पुराच्या खाईत जाण्याची भीती वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
Embed widget