एक्स्प्लोर

Swatantryaveer Gaurav Divas : महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Swatantryaveer Gaurav Divas : महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली.

Swatantryaveer Gaurav Divas : महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याबाबत घोषणा केली. 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचा जन्मदिवस दिवस आहे. याचं औचित्य साधून 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनातर्फे 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा केला जाणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन जाहीर केलं. या निमित्ताने सरकराकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. स्वातंत्र्यवीर गौरव दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी ठेवला होतो, जो सरकारने स्वीकारला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा होणार!

मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान असून त्यांना अभिवादन करण्यासाठी 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती,धैर्य,प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती."

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारचा हा निर्णय म्हणजे काँग्रेसला उत्तर आणि उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा आणखी एक प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे.

स्वातंत्र्यवीरांवरुन राजकारण पेटलं

दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यांच्या देशभक्तीवरुन वाद निर्माण झाले आहेत. सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती आणि सेल्युलर जेलमधून सुटल्यानंतर ते पेन्शनवर होते, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते. त्यानंतर भाजप पक्ष आक्रमक झाला. भाजपने राज्यभरात स्वातंत्र्यवीर गौरव यात्रा काढली. तसंच ठाकरे गटावरही हल्लाबोल केला होता. ठाकरे गटावर हल्लाबोल करत भाजपने वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत कसे राहू शकता, असा सवाल भाजपने विचारला होता. त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलं. तर राहुल गांधींनी अशी वक्तव्ये करणं टाळावं असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget