एक्स्प्लोर

महाराष्ट्राचे माजी मंत्री हुसेन दलवाई यांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  

Hussein Dalwai : हुसेन मिस्त्रिखान दलवाई हे गेल्या 20 ते 22 वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. परंतु, राजकीय नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध आजपर्यंत कायम होते.

Hussein Dalwai : महाराष्ट्राचे माजी कायदामंत्री मंत्री आणि रत्नागिरीचे माजी खासदार हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) यांचे आज सायंकाळी निधन झाले आहे. 99 व्या वर्षी दलवाई यांनी अखेरचा श्वास घेतला. हुसेन मिस्त्रिखान दलवाई हे गेल्या 20 ते 22 वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. परंतु, राजकीय नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध आजपर्यंत कायम होते. हुसेन मिस्त्रिखान दलवाई यांचा उल्लेख सिनियर असा केला जातो. ते चिपळून मधील उक्ताडचे रहिवासी होते.   

हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) हे खेड विधानसभा मतदार संघातून विधानसभेवर 1962 पासून निवडून येत. त्यांचा जन्म चिपळूणमध्ये झाला. त्यांनी आपले लॉचे शिक्षण देखील चिपळूनमध्ये पूर्ण केले. वकिली मुंबईत आणि आमदारकी खेडमध्ये असे त्रिस्थळी असलेले दलवाई चिपळूण ही आपली आई आहे आणि खेड ही मावशी आहे असं सांगत. असे सांगत असताना ते दोन्ही तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांसोबत जिव्हाळ्याचं नातं ठेवत. खेड आणि चिपळूण दरम्यान आज जी लोटे-परशुराम ही औद्योगिक वसाहत दिसते ती दलवाई यांनी राज्याचे तत्कालीन कामगार मंत्री नरेंद्र तिडके यांच्याकडे हट्ट धरून मंजूर करून घेतलेली आहे. आज खेड तालुका पाण्याने समृध्द आहे. त्याला कारणीभूत ठरलेला नातूनगरचा जलप्रकल्प दलवाई यांनीच मंजूर करून घेतला आणि तालुक्यातील बराच भाग सुजलाम झाला. खेड तालुक्यात आज असलेली मध्यम व लघु धरणे दलवाई यांच्या काळात झालेली किंवा त्यांनी आखणी केलेली आहेत.  

हुसैन दलवाई यांनी 1962  ते 1978 असा दीर्घकाळ महाराष्ट्र विधानसभेत खेड मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. 1977 ते 1978 या वर्षी ते महाराष्ट्राचे कायदामंत्री होते. मे 1984 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली आणि राज्यसभा सदस्यत्वाचा साडेपाच वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांना डिसेंबर 1984 मध्ये लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि त्या निवडणुकीत ते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.

आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते  यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मोठा उठाव झाला. त्यासाठीच्या सर्व बैठका दलवाई यांच्या मुंबईतील ओव्हल मैदानासमोरच्या एम्प्रेस कोर्ट या निवासस्थानी होत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व नेते तेथे एकत्र येत. त्यानंतरच्या काळात शंकरराव चव्हाण यांच्या जागी वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात दलवाई यांना मंत्री केले. त्यानंतर बॅ. अ. र. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याचेही विभाजन झाले. त्यावेळी हुसेन मिस्त्रिखान दलवाई राज्यसभेवर निवडून गेले व नंतर स्वेच्छेने निवृत्त झाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Vidhan Parishad Election 2026: माघार नाट्यावर एका दिवसांत 150 कोटी रुपये खर्च, विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ
माघार नाट्यावर एका दिवसांत 150 कोटी रुपये खर्च, विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ
Jayant Patil : अहिल्यानगरमधील 'हायव्होल्टेज ड्रामा'नंतर प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार, तनपुरेंच्या प्रश्नावर उठून जाणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना जयंत पाटील यांनी सुनावलं, म्हणाले....
अहिल्यानगरमधील 'हायव्होल्टेज ड्रामा'नंतर प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार, तनपुरेंच्या प्रश्नावर उठून जाणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना जयंत पाटील यांनी सुनावलं, म्हणाले....
Bal Mane Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंच्या उमेदवाराची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; आज 2 स्टेटस ठेवले, म्हणाले, रिव्हेंज इज जस्ट...
ठाकरेंच्या उमेदवाराची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; आज 2 स्टेटस ठेवले, म्हणाले, रिव्हेंज इज जस्ट...

व्हिडीओ

Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Embed widget