एक्स्प्लोर

Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल

Raj Thackeray on Adani group: राज ठाकरे यांनी 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यापासून देशात अदानी समूहाचा झपाट्याने विकास झाल्याचे म्हटले होते. फडणवीसांनी हा दावा खोडून काढला होता.

Raj Thackeray on Adani Group: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत अदानी समूहाच्या 2014 नंतर देशभरात झपाट्याने पसरलेल्या साम्राज्याविषयी भाष्य केले होते. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2014 नंतर भारतीय अर्थव्यवस्था कशी विस्तारत गेली आणि त्याचा फायदा देशातील सर्वच उद्योगसमूहांना कसा झाला, याची आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. मी अदानींचा वकील नाही. पण 2014 नंतर फक्त अदानी (Adani Group) नव्हे तर टाटा, बिर्ला, सन फार्मा, एव्हेन्यू ग्रूप, इन्फोसिस अशा सर्वच उद्योजकांचे उत्पन्न मोठ्याप्रमाणावर वाढल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील सभेत आकडेवारी मांडली. मुळात मला हे कळत नाह की, राज ठाकरे हे अदानीला बोलले तेव्हा भाजपला इतक्या मिरच्या का झोंबल्या? भाजपमध्ये बरेच वकील आहेत, पण अदानींनी या सगळ्यांनाच वकीलपत्र दिले आहे, हे सभेतून कळालं, अशी टिप्पणी संदीप देशपांडे यांनी केली. ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशभरातली उद्योग, प्रकल्प गन पॉईंटवर फक्त अदानींना दिले जात आहेत, त्या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे. हवाई क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या इंडिगो विमान कंपनीने संपूर्ण देशाला कशाप्रकारे वेठीस धरले, हे आपण पाहिले आहे. मग सगळ्याच क्षेत्रात अदानींची मक्तेदारी निर्माण करुन त्यांना देशाला वेठीस धरण्याची संधी का द्यायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे सर्व अदानी समूहाने स्वत:हून ग्रोथ करुन मिळवले असते तर काही समस्या नव्हती. त्यामुळे उलट रोजगारच निर्माण झाले असते. पण दुसऱ्या उद्योगपतींच्या डोक्यावर बंदुका टेकवून त्यांचे उद्योग ताब्यात घेण्यात आले, हे देशासाठी घातक असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

Mumbai Airport Adani: अदानींनी मुंबई विमानतळ कसा मिळवला?, निवडणुकीच्या एक दिवसआधी संदीप देशपांडेंचा धक्कादायक दावा

मुंबई विमानतळ हे जीव्हीके समूहाने उभारले आणि त्याचा विकास केला. पण जीव्हीके समूहावर अचानक ईडीच्या धाडी पडल्या. त्यानंतर जीव्हीके समूहाचा मोठा हिस्सा अदानींकडे गेला आणि मुंबई विमानतळ त्यांच्या ताब्यात आले. जीव्हीके समूहावर ईडीने टाकलेल्या धाडींचे पुढे काय झाले? काय कारवाई झाली, हे कोणाला माहिती आहे का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. देशात किंवा महाराष्ट्रात कोणाचीही मक्तेदारी निर्माण होऊ नये, इतकेच आमचे म्हणणे आहे. मुंबई आणि महाराष्टरातील जमिनी आणि प्रकल्पांमध्ये सर्व उद्योजकांना समान संधी मिळाली पाहिजे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.

Devendra Fadnavis on Adani: गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? फडणवीसांनी सांगितलं कारण

राज ठाकरे सांगतात की, 2014 नंतर पंतप्रधान मोदी यांच्यामुळे अदानींची नेटवर्थ वाढली. मी काही अदानींचा वकील नाही. पण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, 2014 साली भारत हा जगातील 11व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. आता 2026 साल उजाडेपर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. साहजिकच अर्थव्यवस्था वाढल्यानंतर देशभरात अनेक नवे उद्योजक तयार झाले. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ज्या कंपन्या यापूर्वी भांडवली बाजारात सूचिबद्ध (लिस्टेड) होऊ शकल्या नव्हत्या, त्या सूचिबद्ध झाल्या. देशातील प्रस्थापित उद्योगसमूहांनी प्रचंड विस्तार केला. या प्रत्येकाचे उत्पन्न आणि नफा प्रचंड वाढला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील सभेत केला होता.

2014 नंतर टाटा समूहाचे उत्पन्न 664, एचडीएफसी बँकेचे उत्पन्न 377 टक्के, अदानी समूह 686 टक्के, इन्फोसिस 280 टक्के, आदित्य बिर्ला ग्रूप 566 टक्के, भाती ग्रूप 266 टक्के, सन फार्मा 1552 टक्के, हिंदूजा ग्रूप 376 टक्के आणि एव्हेन्यू समूहाचे उत्पन्न 1166 टक्क्यांनी वाढले. सन फार्मा आणि एव्हेन्यू समूह या दोन्ही कंपन्या मुंबईच्या आहेत, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीसांच्या सभेतील 'त्या' एका वाक्यावरुन 'सामना'तून रान उठवलं, थेट महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यालाच हात घातला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh and Parambir Singh: अनिल देशमुख अन् परमबीर सिंह एकाच व्यासपीठावर, एकमेकांकडे ढुंकूनही पाहिलं नाही, नेमकं काय घडलं?
अनिल देशमुख अन् परमबीर सिंह एकाच व्यासपीठावर, एकमेकांकडे ढुंकूनही पाहिलं नाही, नेमकं काय घडलं?
Baramati bypoll election: काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरेंची शिवसेना कात्रीत! बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ?
काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरेंची शिवसेना कात्रीत! बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ?
Nashik Accident News: दिंडोरी दुर्घटनेनंतर नरहरी झिरवाळांना स्थानिकांचा घेराव; 'त्या' 9 जणांच्या मृत्यूंना जबाबदार कोण? सवाल विचारत वाचला तक्रारींचा पाढा
दिंडोरी दुर्घटनेनंतर नरहरी झिरवाळांना स्थानिकांचा घेराव; 'त्या' 9 जणांच्या मृत्यूंना जबाबदार कोण? सवाल विचारत वाचला तक्रारींचा पाढा
Baramati Vidhansabha Bypoll: बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाल्या...
बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाल्या...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चेपॉकवर पंजाबी 'ताबा'! पुन्हा एकदा पंजाबी वादळात चेन्नई एक्स्प्रेसची सपशेल धुळदाण; विक्रम असा केला की थेट ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे पडली!
चेपॉकवर पंजाबी 'ताबा'! पुन्हा एकदा पंजाबी वादळात चेन्नई एक्स्प्रेसची सपशेल धुळदाण; विक्रम असा केला की थेट ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे पडली!
Kolhapur Bailgada Sharyat: कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
Yuvraj Singh: बापानं वारंवार टोकलं अन् शेवटी लेकानं सावरलं, युवराजला थेट धोनी आणि कपिल देवची माफी मागावी लागली; नेमकं इतकं घडलं तरी काय?
बापानं वारंवार टोकलं अन् शेवटी लेकानं सावरलं, युवराजला थेट धोनी आणि कपिल देवची माफी मागावी लागली; नेमकं इतकं घडलं तरी काय?
नाही म्हणजे नाही! इकडं लढाऊ विमाने पडत असल्याने अमेरिकेला धडकी भरली असतानाच तिकडं इराणचा ट्रम्पना आणखी एक गर्भित इशारा; चौफेर कोंडीने लष्करी रसद तोडण्याची तयारी
नाही म्हणजे नाही! इकडं लढाऊ विमाने पडत असल्याने अमेरिकेला धडकी भरली असतानाच तिकडं इराणचा ट्रम्पना आणखी एक गर्भित इशारा; चौफेर कोंडीने लष्करी रसद तोडण्याची तयारी
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
Nagpur PNG Connection: नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
NCP Sunetra Pawar Letter: सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?
सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या 'त्या' पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?
Nashik Accident News: रात्रीच्या अंधारात कार खोल विहिरीत बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
रात्रीच्या अंधारात कार खोल विहिरीत बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget