एक्स्प्लोर

Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल

Raj Thackeray on Adani group: राज ठाकरे यांनी 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यापासून देशात अदानी समूहाचा झपाट्याने विकास झाल्याचे म्हटले होते. फडणवीसांनी हा दावा खोडून काढला होता.

Raj Thackeray on Adani Group: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत अदानी समूहाच्या 2014 नंतर देशभरात झपाट्याने पसरलेल्या साम्राज्याविषयी भाष्य केले होते. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2014 नंतर भारतीय अर्थव्यवस्था कशी विस्तारत गेली आणि त्याचा फायदा देशातील सर्वच उद्योगसमूहांना कसा झाला, याची आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. मी अदानींचा वकील नाही. पण 2014 नंतर फक्त अदानी (Adani Group) नव्हे तर टाटा, बिर्ला, सन फार्मा, एव्हेन्यू ग्रूप, इन्फोसिस अशा सर्वच उद्योजकांचे उत्पन्न मोठ्याप्रमाणावर वाढल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील सभेत आकडेवारी मांडली. मुळात मला हे कळत नाह की, राज ठाकरे हे अदानीला बोलले तेव्हा भाजपला इतक्या मिरच्या का झोंबल्या? भाजपमध्ये बरेच वकील आहेत, पण अदानींनी या सगळ्यांनाच वकीलपत्र दिले आहे, हे सभेतून कळालं, अशी टिप्पणी संदीप देशपांडे यांनी केली. ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशभरातली उद्योग, प्रकल्प गन पॉईंटवर फक्त अदानींना दिले जात आहेत, त्या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे. हवाई क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या इंडिगो विमान कंपनीने संपूर्ण देशाला कशाप्रकारे वेठीस धरले, हे आपण पाहिले आहे. मग सगळ्याच क्षेत्रात अदानींची मक्तेदारी निर्माण करुन त्यांना देशाला वेठीस धरण्याची संधी का द्यायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे सर्व अदानी समूहाने स्वत:हून ग्रोथ करुन मिळवले असते तर काही समस्या नव्हती. त्यामुळे उलट रोजगारच निर्माण झाले असते. पण दुसऱ्या उद्योगपतींच्या डोक्यावर बंदुका टेकवून त्यांचे उद्योग ताब्यात घेण्यात आले, हे देशासाठी घातक असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

Mumbai Airport Adani: अदानींनी मुंबई विमानतळ कसा मिळवला?, निवडणुकीच्या एक दिवसआधी संदीप देशपांडेंचा धक्कादायक दावा

मुंबई विमानतळ हे जीव्हीके समूहाने उभारले आणि त्याचा विकास केला. पण जीव्हीके समूहावर अचानक ईडीच्या धाडी पडल्या. त्यानंतर जीव्हीके समूहाचा मोठा हिस्सा अदानींकडे गेला आणि मुंबई विमानतळ त्यांच्या ताब्यात आले. जीव्हीके समूहावर ईडीने टाकलेल्या धाडींचे पुढे काय झाले? काय कारवाई झाली, हे कोणाला माहिती आहे का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. देशात किंवा महाराष्ट्रात कोणाचीही मक्तेदारी निर्माण होऊ नये, इतकेच आमचे म्हणणे आहे. मुंबई आणि महाराष्टरातील जमिनी आणि प्रकल्पांमध्ये सर्व उद्योजकांना समान संधी मिळाली पाहिजे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.

Devendra Fadnavis on Adani: गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? फडणवीसांनी सांगितलं कारण

राज ठाकरे सांगतात की, 2014 नंतर पंतप्रधान मोदी यांच्यामुळे अदानींची नेटवर्थ वाढली. मी काही अदानींचा वकील नाही. पण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, 2014 साली भारत हा जगातील 11व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. आता 2026 साल उजाडेपर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. साहजिकच अर्थव्यवस्था वाढल्यानंतर देशभरात अनेक नवे उद्योजक तयार झाले. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ज्या कंपन्या यापूर्वी भांडवली बाजारात सूचिबद्ध (लिस्टेड) होऊ शकल्या नव्हत्या, त्या सूचिबद्ध झाल्या. देशातील प्रस्थापित उद्योगसमूहांनी प्रचंड विस्तार केला. या प्रत्येकाचे उत्पन्न आणि नफा प्रचंड वाढला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील सभेत केला होता.

2014 नंतर टाटा समूहाचे उत्पन्न 664, एचडीएफसी बँकेचे उत्पन्न 377 टक्के, अदानी समूह 686 टक्के, इन्फोसिस 280 टक्के, आदित्य बिर्ला ग्रूप 566 टक्के, भाती ग्रूप 266 टक्के, सन फार्मा 1552 टक्के, हिंदूजा ग्रूप 376 टक्के आणि एव्हेन्यू समूहाचे उत्पन्न 1166 टक्क्यांनी वाढले. सन फार्मा आणि एव्हेन्यू समूह या दोन्ही कंपन्या मुंबईच्या आहेत, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीसांच्या सभेतील 'त्या' एका वाक्यावरुन 'सामना'तून रान उठवलं, थेट महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यालाच हात घातला

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget