एक्स्प्लोर

Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल

Raj Thackeray on Adani group: राज ठाकरे यांनी 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यापासून देशात अदानी समूहाचा झपाट्याने विकास झाल्याचे म्हटले होते. फडणवीसांनी हा दावा खोडून काढला होता.

Raj Thackeray on Adani Group: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत अदानी समूहाच्या 2014 नंतर देशभरात झपाट्याने पसरलेल्या साम्राज्याविषयी भाष्य केले होते. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2014 नंतर भारतीय अर्थव्यवस्था कशी विस्तारत गेली आणि त्याचा फायदा देशातील सर्वच उद्योगसमूहांना कसा झाला, याची आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. मी अदानींचा वकील नाही. पण 2014 नंतर फक्त अदानी (Adani Group) नव्हे तर टाटा, बिर्ला, सन फार्मा, एव्हेन्यू ग्रूप, इन्फोसिस अशा सर्वच उद्योजकांचे उत्पन्न मोठ्याप्रमाणावर वाढल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील सभेत आकडेवारी मांडली. मुळात मला हे कळत नाह की, राज ठाकरे हे अदानीला बोलले तेव्हा भाजपला इतक्या मिरच्या का झोंबल्या? भाजपमध्ये बरेच वकील आहेत, पण अदानींनी या सगळ्यांनाच वकीलपत्र दिले आहे, हे सभेतून कळालं, अशी टिप्पणी संदीप देशपांडे यांनी केली. ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशभरातली उद्योग, प्रकल्प गन पॉईंटवर फक्त अदानींना दिले जात आहेत, त्या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे. हवाई क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या इंडिगो विमान कंपनीने संपूर्ण देशाला कशाप्रकारे वेठीस धरले, हे आपण पाहिले आहे. मग सगळ्याच क्षेत्रात अदानींची मक्तेदारी निर्माण करुन त्यांना देशाला वेठीस धरण्याची संधी का द्यायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे सर्व अदानी समूहाने स्वत:हून ग्रोथ करुन मिळवले असते तर काही समस्या नव्हती. त्यामुळे उलट रोजगारच निर्माण झाले असते. पण दुसऱ्या उद्योगपतींच्या डोक्यावर बंदुका टेकवून त्यांचे उद्योग ताब्यात घेण्यात आले, हे देशासाठी घातक असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

Mumbai Airport Adani: अदानींनी मुंबई विमानतळ कसा मिळवला?, निवडणुकीच्या एक दिवसआधी संदीप देशपांडेंचा धक्कादायक दावा

मुंबई विमानतळ हे जीव्हीके समूहाने उभारले आणि त्याचा विकास केला. पण जीव्हीके समूहावर अचानक ईडीच्या धाडी पडल्या. त्यानंतर जीव्हीके समूहाचा मोठा हिस्सा अदानींकडे गेला आणि मुंबई विमानतळ त्यांच्या ताब्यात आले. जीव्हीके समूहावर ईडीने टाकलेल्या धाडींचे पुढे काय झाले? काय कारवाई झाली, हे कोणाला माहिती आहे का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. देशात किंवा महाराष्ट्रात कोणाचीही मक्तेदारी निर्माण होऊ नये, इतकेच आमचे म्हणणे आहे. मुंबई आणि महाराष्टरातील जमिनी आणि प्रकल्पांमध्ये सर्व उद्योजकांना समान संधी मिळाली पाहिजे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.

Devendra Fadnavis on Adani: गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? फडणवीसांनी सांगितलं कारण

राज ठाकरे सांगतात की, 2014 नंतर पंतप्रधान मोदी यांच्यामुळे अदानींची नेटवर्थ वाढली. मी काही अदानींचा वकील नाही. पण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, 2014 साली भारत हा जगातील 11व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. आता 2026 साल उजाडेपर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. साहजिकच अर्थव्यवस्था वाढल्यानंतर देशभरात अनेक नवे उद्योजक तयार झाले. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ज्या कंपन्या यापूर्वी भांडवली बाजारात सूचिबद्ध (लिस्टेड) होऊ शकल्या नव्हत्या, त्या सूचिबद्ध झाल्या. देशातील प्रस्थापित उद्योगसमूहांनी प्रचंड विस्तार केला. या प्रत्येकाचे उत्पन्न आणि नफा प्रचंड वाढला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील सभेत केला होता.

2014 नंतर टाटा समूहाचे उत्पन्न 664, एचडीएफसी बँकेचे उत्पन्न 377 टक्के, अदानी समूह 686 टक्के, इन्फोसिस 280 टक्के, आदित्य बिर्ला ग्रूप 566 टक्के, भाती ग्रूप 266 टक्के, सन फार्मा 1552 टक्के, हिंदूजा ग्रूप 376 टक्के आणि एव्हेन्यू समूहाचे उत्पन्न 1166 टक्क्यांनी वाढले. सन फार्मा आणि एव्हेन्यू समूह या दोन्ही कंपन्या मुंबईच्या आहेत, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीसांच्या सभेतील 'त्या' एका वाक्यावरुन 'सामना'तून रान उठवलं, थेट महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यालाच हात घातला

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांची निर्दोष मुक्तता, तब्बल 20 वर्षानंतर मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांची निर्दोष मुक्तता, तब्बल 20 वर्षानंतर मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget