एक्स्प्लोर

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी पदभार स्वीकारला, प्रशासकीय कामात हस्तक्षेप होणार नसल्याची दिली ग्वाही

राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम त्यांनी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांचे आभार मानले.

मुंबई : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कठीण काळात गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलीस दलाचे सक्षमीकरण करणे ही महत्वाची बाब आहे. स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न राहील. तसेच प्रशासकीय कामात माझ्याकडून हस्तक्षेप होणार नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. 

एकीकडे कोरोनाचं संकट असताना याच महिन्यात गुढी पाडवा आहे, रमजान आहे, महावीर जयंती आहे, आंबेडकर जयंती आहे. प्रत्येक वर्गाच्या अपेक्षा असतात. कोरोनाचा अंदाज पहिला तर या महिन्यातील परिस्थिती आव्हानात्मक असणार आहे.  गृह विभागाकडून महिलांनाही मोठ्या अपेक्षा असतात. त्या देखील पूर्ण करण्याचा पोलीस दलाकडून प्रयत्न केला जाईल, असं दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं. 

शरद पवारांचे मानले आभार

गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रथम शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांचे आभार मानले.  त्यांनी विश्वासाने जबाबदारी टाकली आहे, ती जबाबदारी पार पाडण्याचं काम करायचं आहे. काम अवघड आहे, आव्हानात्मक आहे, पण ते चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न राहील, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार

मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा जो निर्णय दिला आहे त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाणार आहे. तसेच एनआयए आणि सीबीआय चौकशीला सरकार पूर्ण सहकार्य करेल, असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. 

गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार?

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ठरलेल्या सिस्टमनुसार होतील

पोलील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भात जी सिस्टम ठरलेली आहे, त्यानुसार काम होईल. वेगवेगळ्या स्तरावर बदल्यांसाठी विविध अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले असतात, त्यानुसार बदल्यांचे निर्णय  घेतले जातील, पोलीस भरती, शक्ती कायदा, पोलिसांना घरे ही कामं प्राधान्याने करायची आहेत, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. 

इतर बातम्या

Maharashtra Politics | सरकारमधील तिसरी विकेट नेमकी कुणाची? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर चर्चेला सुरुवात

परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणी फैसला देताना हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

IndraJeet Sawant on Waghnakh | लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीत? सावंतांचा सवालNashik Railway | मुंबईत मुसळधार! पावसाचा नाशिक रेल्वे प्रवाशांना फटका; ट्रेन तासभर उशिरानेRaigad Fort | पावसाचा कहर! रायगड किल्ला 31 जुलैपर्यंत पर्यटकांसाठी बंद ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा दुपारी चारच्या बातम्या ABP Majha 08 Jully 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
Pangong Lake in eastern Ladakh : लडाखजवळ चिनी सैन्याने गोळा केली शस्त्रास्त्रे; सॅटेलाईट फोटोंवरून उघड, बंकर सुद्धा बांधले
लडाखजवळ चिनी सैन्याने गोळा केली शस्त्रास्त्रे; सॅटेलाईट फोटोंवरून उघड, बंकर सुद्धा बांधले
कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी
कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी
विधान परिषद निवडणुकीत एमआयएम कोणाच्या बाजूने, मविआ की महायुती? आमदार फारुख शाहांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
विधान परिषद निवडणुकीत एमआयएम कोणाच्या बाजूने, मविआ की महायुती? आमदार फारुख शाहांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
राजकारण करण्याची वेळ नाही, लोकांना मदत करणं गरजेचं, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स सज्ज, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 
राजकारण करण्याची वेळ नाही, लोकांना मदत करणं गरजेचं, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स सज्ज, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 
Embed widget