एक्स्प्लोर

विजेसाठी ग्रामस्थांचा भर पावसात रात्री रोहित्राजवळ ठिय्या, १२ दिवसापासून खांबाळा गाव अंधारात

Hingoli News: नव्याने आणलेले रोहित्र बसवताच ते जळाले असून महावितरणने याकडे पूर्णपणे दूर्लक्ष केले. वसमतच्या खंबाळा गावात ग्रामस्थांनी शनिवारी रात्री भरपावसात ठिय्या आंदोलन केले.

Hingoli News: हिंगोली जिल्ह्यातील खांबाळा गावामध्ये वीजपुरवठा होत नसल्याने आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी विद्युत रोहित्राजवळ रात्री ठिय्या आंदोलन केले आहे. वसमत तालुक्यातील खांबाळा गावांमध्ये मागील बारा दिवसापासून वीज पुरवठा होत नसून नागरिकांना भर पावसाळ्यात अंधारात राहण्याची वेळ आली आहे.

खांबाळा गावात दहा ते बारा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. नव्याने आणलेले रोहित्र बसवताच ते जळाले असून महावितरणने याकडे पूर्णपणे दूर्लक्ष केले असून संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी रात्री महिला व लहान मुलांसह थेट रोहित्राजवळच भरपावसात ठिय्या आंदोलन केले.

महावितरणणे रोहित्र बसवले खरे..

वसमत तालुक्यातील खांबाळा येथील रोहित्र गत १० ते १२ दिवसांपूर्वी जळाले होते. महावितरणकडे नवीन रोहित्र बसविण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली होती. रोहित्रासाठी रक्कम मोजावी लागेल, असे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगताच ग्रामस्थांनी रक्कम जमा करून १० जुलै रोजी नवीन रोहित्र आणले व बसविण्यात आले.

अभियंत्याकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच

परंतु, वीजपुरवठा सुरळीत करताच नव्याने बसवण्यात आलेले रोहित्रही जळाले. त्यामुळे दुसरे रोहित्र बसवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र, याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दरम्यान, जोपर्यंत अभियंत्याकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

यादरम्यान वसमत तालुक्यातील वापटी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे अभियंता राजू नंद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी बोलण्याचे टाळले, असेही आंदोलकांनी सांगितले.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे दूर्लक्ष

महावितरणचे अधिकारी व अभियंता यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांनी फोन उचलले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावात मागील १० ते १२ दिवसांपासून अंधार आहे.  त्यामुळे ग्रामस्थांनी भ्ज्ञरपावसात टॉर्च सुरु करत रोहित्राखालीच आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. या आंदोलनात महिला व लहान मुलांना घेऊन नागरिक आंदोलनास जमले होते.

महावितरणकडून बीलाची वसूली दर महिन्याला अगदी १०० टक्के होत असते. मात्र, गाव १२ दिवसांपासून अंधारात असल्याचे सांगण्यात आल्यानंतर खंबाळावासींनी महावितरणविरोधात आंदोलन सुरु केलं आहे.

हेही वाचा:

हिंगोलीत काँग्रेसचं पारडं जड! विधानपरिषद निवडणूकीत आमदार प्रज्ञाताईंच्या विजयाने काँग्रेसला प्रतिनिधित्व

20 तारखेला पुन्हा उपोषण, त्याच दिवशी मोठी घोषणा; मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा संभाजीनगरमध्ये समारोप

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Nashik Crime News: चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget