एक्स्प्लोर

मुंबई, उपनगरात अतिवृष्टीचा इशारा; कोल्हापूर, सांगलीला पुन्हा पुराचा धोका

मुंबईत आजपर्यंतचा सर्वाधिक आणि विक्रमी पाऊस यंदाच्या मोसमात झाला आहे. 2011 मध्ये झालेल्या एकूण 3 हजार मिमी पावसाचा विक्रम मोडत कालच्या (8 सप्टेंबर) रविवारपर्यंत मुंबईत एकूण 3 हजार 286 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईबरोबरच रायगड आणि पालघरमध्येही अतिवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. तर, मुंबईत आजपर्यंतचा सर्वाधिक आणि विक्रमी पाऊस यंदाच्या मोसमात झाला आहे. 2011 मध्ये झालेल्या एकूण 3 हजार मिमी पावसाचा विक्रम मोडत कालच्या (8 सप्टेंबर) रविवारपर्यंत मुंबईत एकूण 3 हजार 286 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खबरदारी म्हणून ग्रामस्थ आणि जनावरांचं स्थलांतर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. संभाव्य धोका ओळखून चिखली गावातल्या ग्रामस्थांनी आपली जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सुरुवात केली आहे. ग्रामस्थांनीही स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच एनडीआरएफची तीन पथके कोल्हापुरातील विविध भागात तैनात केली आहेत. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला कोल्हापूरवर पुराचं संकट घोंगावत असताना , कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे कोल्हापुरातल्या पंचगंगेची पातळी नियंत्रीत राहण्यात मदत होणार आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा वाढलेला जोर पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी कर्नाटक सरकारला अलमट्टीमधून विसर्ग वाढवण्याची विनंती केली होती. त्यानंतर अलमट्टीमधून होणार विसर्ग 50 हजार क्युसेकने वाढवला आहे. सांगलीत एनडीआरएफची पथकं तैनात साताऱ्यातही येत्या तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. कोयना धरणातून वाढलेला विसर्ग पाहता कृष्णा नदीची पाणीपातळी 34 ते 35 फुटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगलीत एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण करण्यात आलं आहे. महाबळेश्वरने चेरापुंजीला मागे टाकलं महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरने यंदा पावसाचे विक्रम मोडले आहेत. महाबळेश्वरने चेरापुंजीसह मौसिनरामलाही मागे टाकलं आहे. आतापर्यंत महाबळेश्वरमध्ये तब्बल 300 इंच पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 4 सप्टेंबर या कालावधीत चेरापुंजीत 240 इंच पाऊस झाला आहे तर मौसिनराम इथे 245 इंच पावसाची नोंद झाली आहे. गडचिरोलीत 300 गावांचा संपर्क तुटला गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचा सर्वात मोठा फटका भामरागड तालुक्याला बसला आहे. भामरागडचा जवळपास 70 टक्के भाग पुराच्या पाण्याने वेढला आहे. तर 300 गावांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे गेल्या तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अहेरी तालुक्यात नाला ओलांडताना 25 जनावरांचा मृत्यू झाला आहे. वर्ध्यात तलावाच्या मुख्य भिंतीला भेगा वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यातील बाऱ्हा गावातल्या तलावाच्या मुख्य भिंतीला भेगा पडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे स्थानिकांसह परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाऱ्हा गावातील 42 कुटुंबातील 150 जणांना स्थलांतर करण्यात आलं आहे. सततच्या पावसामुळे हे तलाव सध्या पूर्ण क्षमतेने भरलं आहे. तर पाटबंधारे विभागाकडून या तलावाची योग्य देखभाल केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget