एक्स्प्लोर

मुंबई, उपनगरात अतिवृष्टीचा इशारा; कोल्हापूर, सांगलीला पुन्हा पुराचा धोका

मुंबईत आजपर्यंतचा सर्वाधिक आणि विक्रमी पाऊस यंदाच्या मोसमात झाला आहे. 2011 मध्ये झालेल्या एकूण 3 हजार मिमी पावसाचा विक्रम मोडत कालच्या (8 सप्टेंबर) रविवारपर्यंत मुंबईत एकूण 3 हजार 286 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईबरोबरच रायगड आणि पालघरमध्येही अतिवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. तर, मुंबईत आजपर्यंतचा सर्वाधिक आणि विक्रमी पाऊस यंदाच्या मोसमात झाला आहे. 2011 मध्ये झालेल्या एकूण 3 हजार मिमी पावसाचा विक्रम मोडत कालच्या (8 सप्टेंबर) रविवारपर्यंत मुंबईत एकूण 3 हजार 286 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खबरदारी म्हणून ग्रामस्थ आणि जनावरांचं स्थलांतर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. संभाव्य धोका ओळखून चिखली गावातल्या ग्रामस्थांनी आपली जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सुरुवात केली आहे. ग्रामस्थांनीही स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच एनडीआरएफची तीन पथके कोल्हापुरातील विविध भागात तैनात केली आहेत. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला कोल्हापूरवर पुराचं संकट घोंगावत असताना , कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे कोल्हापुरातल्या पंचगंगेची पातळी नियंत्रीत राहण्यात मदत होणार आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा वाढलेला जोर पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी कर्नाटक सरकारला अलमट्टीमधून विसर्ग वाढवण्याची विनंती केली होती. त्यानंतर अलमट्टीमधून होणार विसर्ग 50 हजार क्युसेकने वाढवला आहे. सांगलीत एनडीआरएफची पथकं तैनात साताऱ्यातही येत्या तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. कोयना धरणातून वाढलेला विसर्ग पाहता कृष्णा नदीची पाणीपातळी 34 ते 35 फुटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगलीत एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण करण्यात आलं आहे. महाबळेश्वरने चेरापुंजीला मागे टाकलं महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरने यंदा पावसाचे विक्रम मोडले आहेत. महाबळेश्वरने चेरापुंजीसह मौसिनरामलाही मागे टाकलं आहे. आतापर्यंत महाबळेश्वरमध्ये तब्बल 300 इंच पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 4 सप्टेंबर या कालावधीत चेरापुंजीत 240 इंच पाऊस झाला आहे तर मौसिनराम इथे 245 इंच पावसाची नोंद झाली आहे. गडचिरोलीत 300 गावांचा संपर्क तुटला गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचा सर्वात मोठा फटका भामरागड तालुक्याला बसला आहे. भामरागडचा जवळपास 70 टक्के भाग पुराच्या पाण्याने वेढला आहे. तर 300 गावांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे गेल्या तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अहेरी तालुक्यात नाला ओलांडताना 25 जनावरांचा मृत्यू झाला आहे. वर्ध्यात तलावाच्या मुख्य भिंतीला भेगा वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यातील बाऱ्हा गावातल्या तलावाच्या मुख्य भिंतीला भेगा पडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे स्थानिकांसह परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाऱ्हा गावातील 42 कुटुंबातील 150 जणांना स्थलांतर करण्यात आलं आहे. सततच्या पावसामुळे हे तलाव सध्या पूर्ण क्षमतेने भरलं आहे. तर पाटबंधारे विभागाकडून या तलावाची योग्य देखभाल केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget