एक्स्प्लोर

मुंबई, उपनगरात अतिवृष्टीचा इशारा; कोल्हापूर, सांगलीला पुन्हा पुराचा धोका

मुंबईत आजपर्यंतचा सर्वाधिक आणि विक्रमी पाऊस यंदाच्या मोसमात झाला आहे. 2011 मध्ये झालेल्या एकूण 3 हजार मिमी पावसाचा विक्रम मोडत कालच्या (8 सप्टेंबर) रविवारपर्यंत मुंबईत एकूण 3 हजार 286 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईबरोबरच रायगड आणि पालघरमध्येही अतिवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. तर, मुंबईत आजपर्यंतचा सर्वाधिक आणि विक्रमी पाऊस यंदाच्या मोसमात झाला आहे. 2011 मध्ये झालेल्या एकूण 3 हजार मिमी पावसाचा विक्रम मोडत कालच्या (8 सप्टेंबर) रविवारपर्यंत मुंबईत एकूण 3 हजार 286 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खबरदारी म्हणून ग्रामस्थ आणि जनावरांचं स्थलांतर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. संभाव्य धोका ओळखून चिखली गावातल्या ग्रामस्थांनी आपली जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सुरुवात केली आहे. ग्रामस्थांनीही स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच एनडीआरएफची तीन पथके कोल्हापुरातील विविध भागात तैनात केली आहेत. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला कोल्हापूरवर पुराचं संकट घोंगावत असताना , कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे कोल्हापुरातल्या पंचगंगेची पातळी नियंत्रीत राहण्यात मदत होणार आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा वाढलेला जोर पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी कर्नाटक सरकारला अलमट्टीमधून विसर्ग वाढवण्याची विनंती केली होती. त्यानंतर अलमट्टीमधून होणार विसर्ग 50 हजार क्युसेकने वाढवला आहे. सांगलीत एनडीआरएफची पथकं तैनात साताऱ्यातही येत्या तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. कोयना धरणातून वाढलेला विसर्ग पाहता कृष्णा नदीची पाणीपातळी 34 ते 35 फुटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगलीत एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण करण्यात आलं आहे. महाबळेश्वरने चेरापुंजीला मागे टाकलं महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरने यंदा पावसाचे विक्रम मोडले आहेत. महाबळेश्वरने चेरापुंजीसह मौसिनरामलाही मागे टाकलं आहे. आतापर्यंत महाबळेश्वरमध्ये तब्बल 300 इंच पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 4 सप्टेंबर या कालावधीत चेरापुंजीत 240 इंच पाऊस झाला आहे तर मौसिनराम इथे 245 इंच पावसाची नोंद झाली आहे. गडचिरोलीत 300 गावांचा संपर्क तुटला गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचा सर्वात मोठा फटका भामरागड तालुक्याला बसला आहे. भामरागडचा जवळपास 70 टक्के भाग पुराच्या पाण्याने वेढला आहे. तर 300 गावांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे गेल्या तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अहेरी तालुक्यात नाला ओलांडताना 25 जनावरांचा मृत्यू झाला आहे. वर्ध्यात तलावाच्या मुख्य भिंतीला भेगा वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यातील बाऱ्हा गावातल्या तलावाच्या मुख्य भिंतीला भेगा पडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे स्थानिकांसह परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाऱ्हा गावातील 42 कुटुंबातील 150 जणांना स्थलांतर करण्यात आलं आहे. सततच्या पावसामुळे हे तलाव सध्या पूर्ण क्षमतेने भरलं आहे. तर पाटबंधारे विभागाकडून या तलावाची योग्य देखभाल केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Embed widget