एक्स्प्लोर

चार आठवड्यात फूड सेफ्टी कमिशन स्थापन करा, अन्यथा मुख्य सचिवांवर कारवाई : हायकोर्ट

साल 2013 मध्ये फूड सेफ्टी कमिशनसंदर्भातील कायदा तयार करण्यात आला आहे, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी का नाही झाली? असा सवाल करत येत्या चार आठवड्यात कमिशनची स्थापना करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबई : साल 2013 मध्ये फूड सेफ्टी कमिशनसंदर्भातील कायदा तयार करण्यात आला आहे, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी का नाही झाली? असा सवाल करत येत्या चार आठवड्यात कमिशनची स्थापना करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. तसेच चार आठवड्यात या आदेशांची पूर्तता न झाल्यास राज्याच्या मुख्य सचिवांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाईची नोटीस काढू, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. अलका कांबळे यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठयापुढे सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान "सरकारी योजना, चिल्ड्रन होम, कारागृह, आश्रमशाळा, विकास प्रकल्प, इ. सार्व काही हायकोर्टानेच पाहायचं का? मग सरकार आणि त्यांनी नेमलेले प्रशासकीय अधिकारी करतात काय?," असा उद्विग्न सवाल हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी उपस्थित केला. दोन महिन्यांपूर्वी याचसंदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आयोग निश्चित करण्याचे आदेश सरकारला दिले होते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या तरतुदीनुसार राज्य अन्न आयोग निर्माण करणं राज्य सरकारला बंधनकारक आहे. सार्वजनिकरित्या ज्या अन्न घटकांचे वितरण केले जाते, त्याबाबत निश्‍चित मार्गदर्शक तत्वे असणं अत्यावश्यक आहे. मात्र राज्य सरकारनं अद्याप याबाबत कार्यवाही केली नसल्यामुळे हायकोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली. कार्यव्यस्ततेमुळे न्यायालय आयोगावर नियंत्रण करु शकणार नाही, मात्र सरकारने यावर तातडीने कार्यवाही करायला हवी, असे मत न्यायालयाने यापूर्वीच व्यक्त केले आहे. दुष्काळ, पूर अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अन्न सुरक्षा आयोगाची प्रामुख्याने आवश्‍यकता असते. महाराष्ट्रासह बिहार, मध्यप्रदेश आदी भागात दुष्काळ पडला होता. त्यावेळी याची उणीव प्रकर्षाने जाणवली होती. गरीब गरजू नागरिकांना या आयोगामुळे आवश्‍यक अन्न घटक मिळण्यास सहाय्य मिळू शकेल, असे याचिकादारांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Rain: मोठी बातमी: मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, पुढच्या तीन-चार दिवसांत...
मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, पुढच्या तीन-चार दिवसांत...
Maharashtra Weather: विदर्भात उष्णतेचा प्रकोप! चंद्रपुरातील ब्रह्मपुरीत देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद; तर उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी, हवामान विभागाचा अंदाज काय?
विदर्भात उष्णतेचा प्रकोप! चंद्रपुरातील ब्रह्मपुरीत देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद; तर उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी, राज्यासाठी हवामान विभागाचा अंदाज काय?
Maharashtra Live blog updates: राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईच्या नरिमन पॉईंटमधील एअर इंडियाची इमारत 1600 कोटींना विकत घेणार
Maharashtra Live blog updates: राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईच्या नरिमन पॉईंटमधील एअर इंडियाची इमारत 1600 कोटींना विकत घेणार
Maharashtra School: ...तर शाळा 15 जून नव्हे 26 जूनपासून सुरु होणार, महायुती सरकारमधील मंत्र्याचे महत्त्वपूर्ण संकेत
...तर शाळा 15 जून नव्हे 26 जूनपासून सुरु होणार, महायुती सरकारमधील मंत्र्याचे महत्त्वपूर्ण संकेत

व्हिडीओ

Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Playoffs: आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?
आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?
Devendra Fadnavis on Petrol Diesel: देशात तिसऱ्यांदा पेट्रोलचे भाव वाढले, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, देवेंद्र फडणवीसांचा जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश
पेट्रोल-डिझेलची भाववाढ, शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, फडणवीसांनी ती गोष्ट हेरली, म्हणाले, काहीतरी गडबड
सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल
Crime News: नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
Petrol Diesel Shortage : महाराष्ट्रात इंधन टंचाई, विदर्भ, मराठवाड्यात डिझेलसाठी रात्रभर शेतकऱ्यांच्या रांगा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली, ट्रॅक्टरवरतीच जागून काढली रात्र
महाराष्ट्रात इंधन टंचाई, विदर्भ, मराठवाड्यात डिझेलसाठी रात्रभर शेतकऱ्यांच्या रांगा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली, ट्रॅक्टरवरतीच जागून काढली रात्र
Nagpur Crime : उपराजधानी नागपुरात कायद्याचे तीन तेरा, 48 तासात तीन भयावह घटनांचा थरार; गृहमंत्र्याचा गृहजिल्हा हादरला!
उपराजधानी नागपुरात कायद्याचे तीन तेरा, 48 तासात तीन भयावह घटनांचा थरार; गृहमंत्र्याचा गृहजिल्हा हादरला!
Embed widget