एक्स्प्लोर

कोकणातील एक गाव सात दिवस सुट्टीवर, ग्रामस्थांनी गुराढोरांसह गाव सोडलं!

गांगो देवाने हुकूम दिल्यानंतर गावपळण सुरु केली जाते. गावपळण सुरु झाल्यानंतर कुणीही गावात जात नाहीत. कारण या दिवसांच्या कालावधीत गांगेश्वर देवाबरोबर इतर देवतांची सभा भरते, असा ग्रामस्थांचा समज आहे.

सिंधुदुर्ग : आतापर्यंत तुम्ही पूर्ण गाव सुट्टीवर गेल्याचं कधी ऐकलंय का? नाही ना! मग आम्ही तुम्हाला कोकणातील एक अशा गावाची ओळख करुन देणार आहोत, जे वर्षातून एकदा सात दिवसांच्या सुट्टीवर जातं. तेही अगदी माणसांबरोबरच गुराढोरांसह. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावातील लोक गुराढोरांसह सात दिवस वेशीबाहेर झोपड्या बांधून वास्तव्य करतात. 80 ते 90 उंबरठे असलेल्या या गावाची लोकसंख्या सुमारे 400च्या वर आहे. मात्र सध्या हे गाव या लोकांच्या गावपळण प्रथेमुळे सुट्टीवर आहे. गेली चारशे वर्षांपासून गावपळणीची परंपरा येथील लोकं पाळत आले आहेत. म्हणूनच आपले घरदार सोडून गावाच्या वेशीबाहेर आलेल्या या लोकांनी आभाळाच्या छायेखालीच सात दिवसांसाठी आपला संसार थाटला आहे. कोकणातील एक गाव सात दिवस सुट्टीवर, ग्रामस्थांनी गुराढोरांसह गाव सोडलं! सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्री. गांगेश्वर देवाच्या हुकुमाने ही गावपळण होते. गावपळण दरवर्षी पौष महिन्यात कडाक्याच्या थंडीमध्ये होते. ही गावपळण म्हणजे गांगो देवाचे वार्षिक समजतात. पौष महिन्यामध्ये होत असलेली ही गावपळण पाच, तीन किंवा सात दिवसांची असते. तीन दिवस झाल्यानंतर गांगोला कौल लावून देवाने हुकूम दिल्यानंतर शिराळेवासीय गावात परततात. कोकणातील एक गाव सात दिवस सुट्टीवर, ग्रामस्थांनी गुराढोरांसह गाव सोडलं! आता पूर्ण गावच वेशीबाहेर गेलंय म्हटल्यावर गावातील शाळा आणि अंगणवाडीही सहाजिकच याच ठिकाणी भरणार. विशेष म्हणजे विद्यार्थी दशेतील गावच्या पोरांना ही गावपळणीची प्रथा मजेशीर आणि त्यानिमित्ताने सहलीचा आनंद देणारी असते. महाराष्ट्राला उत्सव आणि परंपरांचा मोठा वारसा लाभलेला आहे. मात्र आजच्या आधुनिकतेच्या युगात श्रद्धेला अंधश्रद्धेचे ग्रहण लागू न देण्याची खबरदारी घेतल्यास परंपरा टिकवणं आणि त्यांचा आनंद घेणं निरंतर शक्य होईल. कोकणातील एक गाव सात दिवस सुट्टीवर, ग्रामस्थांनी गुराढोरांसह गाव सोडलं! गांगो देवाने हुकूम दिल्यानंतर गावपळण सुरु केली जाते. गावपळण सुरु झाल्यानंतर कुणीही गावात जात नाहीत. कारण या दिवसांच्या कालावधीत गांगेश्वर देवाबरोबर इतर देवतांची सभा भरते, असा ग्रामस्थांचा समज आहे. त्यामुळे गावात कोणाचाही आवाज होता कामा नये. तीन दिवसानंतर परत गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जातो. त्यानंतर गावभरणी होते. जोपर्यंत गांगोचा हुकूम होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेर राहतात. त्यामुळे तीन, पाच, सात दिवसांची ही गावपळण असते. दरवर्षी गावपळण होणारी जिल्ह्यात एकमेव शिराळे गाव आहे. शिराळेवासियांचा आपल्या श्री.देव गांगेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. देवाचा हुकूम घेऊन ग्रामस्थ गाव सोडतात. परत हुकूम घेऊन गावात परततात. शिराळे गावात 80 कुटुंब असून सुमारे 400 लोकसंख्या असणारं गाव आहे. तळकोकणात कुठे कुठे गावपळण परंपरा? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात वायंगणी, आचरा आणि चिंदर, देवगड येथे मुणगे, वैभववाडीमध्‍ये शिराळे येथे आदी गावांमध्ये ‘गावपळण’ पाळली जाते. काही ठिकाणी दरवर्षी तर काही ठिकाणी तीन, पाच वर्षांनी गावपळण केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Kolhapur Asmita Katkar Death Case: मुलाचे कपडे घेतलेले, पण मुलगी झाली; 52 हजारांचा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला, अस्मिताच्या आई-वडिलांचे हादरवणारे आरोप
मुलाचे कपडे घेतलेले, पण मुलगी झाली; 52 हजारांचा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला, अस्मिताच्या आई-वडिलांचे हादरवणारे आरोप
CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत शरद पवार यांनाही टाकले मागे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत शरद पवार यांनाही टाकले मागे
Anil Patil on Sharad Pawar Eknath Shinde Meeting: शरद पवार-शिंदेंच्या भेटीमुळे संशयाचे धुके; अजित पवारांच्या पक्षातील आमदाराने थेट 2014 अन् 2017 च्या 'त्या' चर्चांची करून दिली आठवण; म्हणाले...
शरद पवार-शिंदेंच्या भेटीमुळे संशयाचे धुके; अजित पवारांच्या पक्षातील आमदाराने थेट 2014 अन् 2017 च्या 'त्या' चर्चांची करून दिली आठवण; म्हणाले...

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
Beed News: आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
Bollywood Song Story: माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतील दुर्दैवी घटना
मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, 15 वारकरी जखमी
Embed widget