एक्स्प्लोर

भन्नाट उपक्रम... नक्षलग्रस्त भागात पहिला पुल कम बंधारा लोकार्पित, गडचिरोलीत दळणवळण अन सिंचनाची सांगड

गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात अतिदुर्गम भागात पोहोचण्यास बारमाही नाल्यांवर पुल नसल्याने अडचण होते. जिल्ह्याच्या विविध भागात अशा पद्धतीने योजनांचा कल्पक वापर करत रस्ते आणि सिंचन यांची सांगड घालण्याची गरज आहे.

गडचिरोली: राज्यातील नक्षलग्रस्त- संवेदनशील जिल्हा असलेल्या गडचिरोलीत दळणवळणाच्या समस्या आजही आ वासून उभ्या आहेत. त्या दूर करण्यासाठीच्या प्रयत्नात बारमाही पाणी असलेल्या नाल्यांवर पुलांची निर्मिती केली जात आहे. मात्र केवळ पुल न उभारता सार्वजनिक बांधकाम विभागाने याला बंधारे वजा पुल अशी संकल्पना राबविल्याने रस्ते संपर्क व सिंचन या दोन्ही क्षेत्रात लाभ होत आहे. याप्रकारचा पहिला पुल नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील करेमरका येथे लोकार्पित करण्यात आला.

गडचिरोली जिल्हा हा निसर्गानं भरभरून वनसंपदा दिलेला जिल्हा मात्र या जिल्ह्याला निसर्गाच्या वरदानासह नक्षल चळवळीची काळी किनार आहे. नक्षल चळवळ नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील बारमाही पाणी असलेल्या नदी नाल्यांवर पुलांची निर्मिती करून बारमाही रस्ते संपर्क स्थापित करण्याच्यादृष्टीने प्रशासन प्रयत्नशील आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अशा छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असणाऱ्या धानोरा तालुक्यातल्या करेमरका या गावाजवळ एक स्थानिक नाला वर्षातील सहा महिने संपर्कात अडचण ठरत होता.

या नाल्यामुळे परिसरातील नागरिकांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटायचा. आरोग्य यंत्रणेपुढे मोठी समस्या उभी राहायची. विद्यार्थ्यांना तालुका मुख्यालय जाण्यासाठी पाण्यातून वाट काढावे लागायची. तर भर पावसाळ्यात तर सगळंच ठप्प व्हायचं. अडचणी बघून अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यावर मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने चार कोटींहून अधिक रुपये किंमतीच्या पुलाची निर्मिती सुरू केली. मात्र विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा केवळ पूल न राहता बंधारेवजा पूल असावा अशी संकल्पना मांडली.

भन्नाट उपक्रम... नक्षलग्रस्त भागात पहिला पुल कम बंधारा लोकार्पित, गडचिरोलीत दळणवळण अन सिंचनाची सांगड

त्यानुसार मागच्या वर्षी या पुलाच्या व बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली. पुलाची निविदा खर्चापेक्षा कमी किमतीत स्वीकारली गेल्याने शासकीय निधीची बचत झाली. त्यातूनच हा सुंदर बंधारा साकारला गेला. बांधकाम विभागाने या भागात बारमाही रस्ते संपर्क स्थापित केलाच आहे. याशिवाय या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी या प्रकल्पाने मदत मिळणार आहे. 3 कोटी 65 लक्ष रुपयांचा पूल तर 40 लाख रुपयांचा बंधारा बांधून सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागातील नागरिकांची मोठी सोय केली आहे.

हा गडचिरोली जिल्ह्यातील पहिला असा बंधारेवजा पूल आहे. सुमारे दहा गावांना या पाण्याच्या सिंचनाचा लाभ होणार असून चार किलोमीटरपर्यंत पाणी सध्या साचले आहे. करेमरका-ढवळी -जपतलाई या गावांसह अनेक गावातील पाणी पातळी या प्रकल्पाने वाढणार आहे. याशिवाय रोजगार- शिक्षण -आरोग्य यासाठी या गावांमधून तालुका व जिल्हा स्थानी जाणाऱ्या नागरिकांना आता विनाअडसर जाता येणार आहे.

यामुळेच सिंचन -शेती व जीवनमान उंचावण्यास हा बंधारेवजा पूल लाभकारक ठरणार आहे. हा पुल आता पर्यटनासाठी महत्वाचा ठरत आहे. पुल पाहण्यासाठी लोकांची गर्दी ही सुरू झाली आहे. हा साधा पुल नसून हिरव्यागार घनदाट जंगलाने व्यापलेला  परिसरात हा टू-इन-वन पुल प्लस बंधारा असल्याने नागरिक याकडे आकर्षित होत आहेत.

भन्नाट उपक्रम... नक्षलग्रस्त भागात पहिला पुल कम बंधारा लोकार्पित, गडचिरोलीत दळणवळण अन सिंचनाची सांगड

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 48 किलोमीटर वर हा पुल-बंधारा आहे. त्यामुळे गडचिरोली शहरात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम पर्यटनस्थळ असणार आहे. आजही गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात अतिदुर्गम भागात पोहोचण्यास बारमाही नाल्यांवर पुल नसल्याने अडचण होते. एखादा रुग्ण पुल नसल्याने, साधन नसल्याने दगावतो. तर एखादी महिला बाळंत होण्याआधीच आपले बाळ गमावते. अशा स्थितीत जिल्ह्यातील पुलांचे महत्त्व समजते. जिल्ह्याच्या विविध भागात अशा पद्धतीने योजनांचा कल्पक वापर करत रस्ते संपर्क आणि सिंचन यांची सांगड घातली जाण्याची गरज आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Embed widget