एक्स्प्लोर
Advertisement
अक्कलकोटजवळ जयंती एक्सप्रेसच्या इंजिनला आग, रेल्वे वाहतूक विस्कळीत
सोलापूर: सोलापूरजवळ अक्कलकोट तिलाटी स्टेशनदरम्यान कन्याकुमारी-मुंबई जयंती एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र, वेळीच ही आग विझवण्यात रेल्वे यंत्रणेला यश आल्यानं मोठी जीवितहानी टळली.
रेल्वे इंजिनला आग लागल्यानं जयंती एक्सप्रेस अक्कलकोट तिलाटी स्थानकादरम्यान थांबवण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या एक्सप्रेसच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या अन्य गाड्यांवर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.
हुसेन सागर, यशवंतपूर, बसव एक्सप्रेस गाड्या उशीराने धावत असून मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस सुद्धा उशिराने धावणार असल्याची माहिती समजते आहे. दरम्यान, होटगी स्टेशनवर जयंती एक्सप्रेसचं इंजिन बदलून लोहमार्ग खुला करुन रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
टेलिव्हिजन
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion