एक्स्प्लोर

धनगर, मुस्लिमांना आरक्षण कसं मिळत नाही पाहतोच; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

Dhangar-Muslim Reservation : धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे.

Dhangar-Muslim Reservation : मागील 70 वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मनोज जरांगे (Manoj Jarange) यानो सोडवला असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला आता थेट ओबीस आरक्षणाचा (OBC Reservation) लाभ मिळणार असल्याचे देखील बोलले जात आहे. असे असतानाच आता धनगर (Dhangar) आणि मुस्लीम आरक्षणाचा (Muslim Reservation) देखील प्रश्न मार्गी लावणार असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले आहे. एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागल्यावर धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण कसे मिळत नाही हे पाहतोच, असा इशारा देखील जरांगे यांनी सरकराला दिला आहे. 

दरम्यान याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की, "मराठा आरक्षण मराठ्यांसाठी ज्वलंत मुद्दा आहे. एकदा हा प्रश्न सुटला की, धनगर समाजाला आणि मुस्लिमांना आरक्षण कसे देत नाही तेच बघतो. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता थोडा राहिला आहे. एकदा प्रमाणपत्र हातात पडू द्या, त्यानंतर मी मोकळाच आहे. धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मात्र, हा प्रश्न सुटला पाहिजे याबाबत त्यांनी देखील म्हटलं पाहिजे. त्यांनी एकदा म्हटलं, की मग पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही, असे जरांगे म्हणाले. 

रायगडाचरणी नतमस्तक होण्यासाठी आलोय...

मराठा आरक्षणाबाबत सरकारने अध्यादेश काढल्याने मनोज जरांगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी रायगडावर पोहचले आहेत. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "रायगडावर गेल्यानंतर ऊर्जा मिळते आणि विजय प्राप्त होतो. त्यामुळे रायगडाचरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. मी रायगडावर पायी जाणार, राजापुढे शरीराला किंमत नसल्याचे जरांगे म्हणाले. 

मराठ्यांना मागास सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची...

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आणि खुल्या वर्गातील समाजाचा सर्वे केले जात आहे. दरम्यान, यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, "सरकरने मराठा समाज मागास सिद्ध केला पाहिजे. आम्हाला बाकी काही माहीत नाही, सरकार आणि मागासवर्ग आयोगाची समाजला मागास सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. चांगला सर्व्हे करून सत्य परिस्थिती समोर आणायला हवी. काही ठिकाणी अडचणी येत असतील, मात्र याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आत्ता नाही, असेही जरांगे म्हणाले. 

ओबीसी आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात जाणार...

मराठा समाजाच्या मुलांच्या अन्नात माती मिळवण्याच काम छगन भुजबळ करत आहेत. त्यामुळे आमच्या अन्नात त्याने माती कालवण्याचं प्रयत्न करू नये. गाव खेड्यातील ओबीसी बांधवांनी त्याला हे समजून सांगावं. अन्यथा ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हालाही नाईलाजाने याचिका दाखल करून हे आरक्षण रद्द करावे लागणार आहे आणि ते रद्द देखील होणार असल्याचं जरांगे म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

...तर OBC आरक्षणच रद्द होऊ शकते, मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये खळबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget