एक्स्प्लोर

अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं!

भूसंपादनाचं प्रकरण आता चांगलच तापलं आहे. वडवणी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी रेल्वेमार्गाचं काम बंद पाडत आंदोलन केलं.

बीड : भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाचं काम बंद पाडलं. भूसंपादनाचं प्रकरण आता चांगलच तापलं आहे. वडवणी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी रेल्वेमार्गाचं काम बंद पाडत आंदोलन केलं. केवळ 1300 रुपये प्रति गुंठा दराने खरेदी वडवणीच्या दत्तात्रय पतंगे यांची 15 एकर शेती आहे. शेती हे त्यांच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन आहे. मात्र, आता साडे पाच एकर क्षेत्रावरून रेल्वेचा मार्ग जाणार आहे आणि या साडेपाच एकराचे त्यांना 1300 रुपये गुंठ्या प्रमाणे पैसे मिळाले आहेत. तर या जमिनीचा भाव एकरी पंधरा लाख रुपय असल्याचा दावा त्यांनी केला. 1800 कोटी रुपये खर्च करुन नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचं काम युद्धपातळीवर चालू आहे. नगर ते बीड आणि बीड ते परळी असे दोन टप्प्यात हे काम चालू आहे.  या रेल्वेमार्गात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन करण्यात आलं आणि त्याचा मोबदला कावडी मोल भावाने देण्यात आल्याचा आरोप करत या शेतकऱ्यांनी वडवणी जवळ बाहेगव्हाण गावच्या शिवारातून जाणारं रेल्वेमार्गाचं काम बंद पाडलं. वडवणी तालुक्यातील या शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळत असल्याने या शेतकऱ्यांनी अनेक वेळा सरकार दरबारी खेटा मारल्या. मंत्र्यांना निवेदनं देखील दिली, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून विकास करत असल्याचा दावा सरकार करत आहे. तर दुसरीकडे शेतकरी आपली जमीन वाचवण्यासाठी सरकार दरबारी न्याय मागत आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप मान्य झाल्या नसल्याने शेतकरी आंदोलन करू लागले आहेत. बीडपासून ते परळीपर्यंतच्या शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जुन्या कायद्याप्रमाणेच जमीन अधिगृहण बाहेगव्हाणचे विठ्ठल मस्के यांच्या संपूर्ण आठ एकर शेतीतून हा मार्ग जात असल्याने ते पूर्णतः भूमीहीन झाले आहेत. मात्र, अजूनही त्यांची प्रकल्पगृस्त म्हणून नोंद केलेली नाही. निजाम काळातल्या कायद्याप्रमाणे जमिनीचं अधिगृहण केलं आणि त्याच जुन्या कायद्याचा आधार घेऊन सरकारने नवीन अधिगृहण निर्णय डावलून आमची फसवणूक केल्याचं ते सांगतात. सध्या या शिवारात अप्पर कुंडलीकाचं पाणी येणार असून या जमिनीच्या किंमती वाढल्या आहेत. सरकारने मात्र नोंद करताना अशा अनेक गोष्टींची नोंद देखील केलेली नाही. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्यासाठी हा रेल्वेमार्ग राजकीय प्रतिष्ठेचा विषय आहे. म्हणूनच येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बीडला रेल्वे पोहोचण्याचे संकेत मिळत असले तरी बीडहून परळीकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गात मात्र या शेतकरी आंदोलनामुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर आता कसा तोडगा काढला जातो, ते पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget