एक्स्प्लोर

Mahavitaran Scam l शेतकऱ्यांनी वीज बिले भरू नये : रघुनाथदादा पाटील

वीज नियामक आयोगाच्या अहवालातून महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गोलमाल करत गेल्या पाच वर्षात तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलंय. यावर शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी शेतकऱ्यांनी वीज बिले भरू नये, असं आवाहन केलंय.

सांगली : महावितरण वीज कंपनीकडून शेतकऱ्यांकडून वीज बिलाच्या नावाखाली 30 हजार कोटींची लूट केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी वीज बिले भरू नयेत आणि लुटण्यात आलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लाववा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. ते सांगली मध्ये बोलत होते. शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल 33 हजार 856 दशलक्ष युनिट वीज पुरवल्याचे महावितरण सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र 22 हजार 856 दशलक्ष युनिट एवढा शेतकऱ्यांचा वीज वापर असल्याचे वीज नियामक आयोगाच्या चौकशीत स्पष्ट झालंय. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय. महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गोलमाल करत गेल्या पाच वर्षात तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. वीज नियामक आयोगाच्या चौकशीत हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे वाढीव वीज वापर दाखवून महावितरणने शेतकऱ्यांकडून तब्बल 22 हजार कोटी रुपये, तर सरकारकडून सवलतीच्या माध्यमातून आठ हजार 225 कोटी रुपये लाटले आहेत. सरकारच्या अहवालातच या बाबी पुढे आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे. कृषिपंपाच्या मीटर रीडिंगमध्ये महावितरणकडून घोळ, शेतकऱ्यांची 22 हजार कोटींची लूट! शेतकऱ्यांनी शेतीपंपाची वीज बिले भरू नयेत - शेतकऱ्यांनी शेतीपंपाची वीज बिले भरू नयेत, असे आवाहन 1998 मध्ये सांगलीच्या मिरजेत पार पडलेल्या शेतकरी अधिवेशनात शरद जोशी यांनी केले होते. कर कर्जा नही देंगे, बिजली का बिल नही देंगे, अशी घोषणा यावेळी देण्यात आली होती. शेतकरी संघटना याबाबत नेहमीच लढत राहिली आहे. आज शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते, शेतकरी गेली 10 वर्षांपासून वीजे बिले भरत नाहीत. मात्र, तरीही बहुतांश शेतकरी हे वीज बिले भरत राहिले. काँग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतीपंप वीज बिले माफ केल्याची घोषणाबाजी केली होती. काही काळ फक्त याची अंमलबजावणी झाली. मात्र, पुन्हा शेतकऱ्यांनी वीज बिले भरण्यास सुरवात केली. वीज बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग आहे. शेतकरी संघटनेची जी भूमिका होती, ती योग्य होती, हे आता स्पष्ट झाले आहे. आता तरी शेतकऱ्यांनी वीज बिल भरू नये आणि वीज बिलाच्या माध्यमातून लुटण्यात आलेले पैसे परत मिळवण्यासाठी सरकारकडे तगादा लावला पाहिजे, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. Web Exclusive | महावितरणकडून गोलमाल, शेतकऱ्यांना 30 हजार कोटींना लुटले? | ABP MAJHA
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातची 10 तास चौकशी, SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर
भोंदू अशोक खरातची 10 तास चौकशी, SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर
Sanjay Raut : ऑपरेशन तुतारी करण्याआधी अशोक खरातच्या ऑपरेशन मुतारीचं काय करणार ते सांगा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
ऑपरेशन तुतारी करण्याआधी अशोक खरातच्या ऑपरेशन मुतारीचं काय करणार ते सांगा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक, मंत्री जयकुमार रावलांचे लेखी आश्वासन 
बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक, मंत्री जयकुमार रावलांचे लेखी आश्वासन 
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक

व्हिडीओ

Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   
कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच क्रॅश
Bacchu kadu: बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
Tamil Nadu NDA Seat Sharing : तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
Rahul Gandhi : इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, इराणच्या मीडियाकडून ट्रम्प यांची खिल्ली, नेमकं काय घडलं?
ट्रम्प म्हणाले 5 दिवस ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, इराणच्या मीडियाकडून खिल्ली, इराणच्या मीडियात काय चर्चा?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
Embed widget