एक्स्प्लोर

Mahavitaran Scam l शेतकऱ्यांनी वीज बिले भरू नये : रघुनाथदादा पाटील

वीज नियामक आयोगाच्या अहवालातून महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गोलमाल करत गेल्या पाच वर्षात तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलंय. यावर शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी शेतकऱ्यांनी वीज बिले भरू नये, असं आवाहन केलंय.

सांगली : महावितरण वीज कंपनीकडून शेतकऱ्यांकडून वीज बिलाच्या नावाखाली 30 हजार कोटींची लूट केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी वीज बिले भरू नयेत आणि लुटण्यात आलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लाववा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. ते सांगली मध्ये बोलत होते. शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल 33 हजार 856 दशलक्ष युनिट वीज पुरवल्याचे महावितरण सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र 22 हजार 856 दशलक्ष युनिट एवढा शेतकऱ्यांचा वीज वापर असल्याचे वीज नियामक आयोगाच्या चौकशीत स्पष्ट झालंय. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय. महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गोलमाल करत गेल्या पाच वर्षात तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. वीज नियामक आयोगाच्या चौकशीत हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे वाढीव वीज वापर दाखवून महावितरणने शेतकऱ्यांकडून तब्बल 22 हजार कोटी रुपये, तर सरकारकडून सवलतीच्या माध्यमातून आठ हजार 225 कोटी रुपये लाटले आहेत. सरकारच्या अहवालातच या बाबी पुढे आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे. कृषिपंपाच्या मीटर रीडिंगमध्ये महावितरणकडून घोळ, शेतकऱ्यांची 22 हजार कोटींची लूट! शेतकऱ्यांनी शेतीपंपाची वीज बिले भरू नयेत - शेतकऱ्यांनी शेतीपंपाची वीज बिले भरू नयेत, असे आवाहन 1998 मध्ये सांगलीच्या मिरजेत पार पडलेल्या शेतकरी अधिवेशनात शरद जोशी यांनी केले होते. कर कर्जा नही देंगे, बिजली का बिल नही देंगे, अशी घोषणा यावेळी देण्यात आली होती. शेतकरी संघटना याबाबत नेहमीच लढत राहिली आहे. आज शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते, शेतकरी गेली 10 वर्षांपासून वीजे बिले भरत नाहीत. मात्र, तरीही बहुतांश शेतकरी हे वीज बिले भरत राहिले. काँग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतीपंप वीज बिले माफ केल्याची घोषणाबाजी केली होती. काही काळ फक्त याची अंमलबजावणी झाली. मात्र, पुन्हा शेतकऱ्यांनी वीज बिले भरण्यास सुरवात केली. वीज बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग आहे. शेतकरी संघटनेची जी भूमिका होती, ती योग्य होती, हे आता स्पष्ट झाले आहे. आता तरी शेतकऱ्यांनी वीज बिल भरू नये आणि वीज बिलाच्या माध्यमातून लुटण्यात आलेले पैसे परत मिळवण्यासाठी सरकारकडे तगादा लावला पाहिजे, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. Web Exclusive | महावितरणकडून गोलमाल, शेतकऱ्यांना 30 हजार कोटींना लुटले? | ABP MAJHA
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गॅस टंचाईवर मात! भंडाऱ्यातील रेंगेपार कोहळी' गाव ठरलं आदर्श, बायोगॅसच्या मदतीनं भागवली ऊर्जेची गरज 
गॅस टंचाईवर मात! भंडाऱ्यातील रेंगेपार कोहळी' गाव ठरलं आदर्श, बायोगॅसच्या मदतीनं भागवली ऊर्जेची गरज 
महाराष्ट्रात शासकीय नोकरीची मोठी संधी, 571 पदांसाठी मोठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
महाराष्ट्रात शासकीय नोकरीची मोठी संधी, 571 पदांसाठी मोठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
पेट्रोलसाठी बुलढाणा आणि परभणीत हाहाकार! 2 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, अनेक पेट्रोल पंप बंद असल्यानं नागरिकांची तारांबळ
पेट्रोलसाठी बुलढाणा आणि परभणीत हाहाकार! 2 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, अनेक पेट्रोल पंप बंद असल्यानं नागरिकांची तारांबळ
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी

व्हिडीओ

Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report
Sushma Andhare Vs Sheetal Mhatre : फार्म हाऊसला पाणी, राजकीय उणीदुणी Special Report
Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local : पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
Rinku Singh: उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
Income Tax Update : 1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
Embed widget