एक्स्प्लोर

हवामान बदलामुळे शेतीवर विपरित परिणाम; सोयाबीन, कापूस, गहू आणि हरभऱ्याचे मोठे नुकसान : रिसर्च 

उशिरा सुरू होणारा पावसाळा, अधूनमधून पडणारा दुष्काळ आणि पाऊस यामुळे सोयाबीन आणि कापसाच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. तसेच हरभरा लागवडीत शेंगा भरण्याच्या दरम्यान तापमानात अचानक वाढ दिसून येईल.

मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाला, मात्र पेरण्या केल्यानंतर ऐनवेळी पावसाने दडी मारल्याने राज्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकटओढवलं आहे. हवामान बदलामुळे शेतीवर विपरित परिणाम होत असल्याचं एका अभ्यासात समोर आलं आहे. ज्यात सोयाबीन, कापूस, गहू आणि हरभऱ्यासारख्या पिकाचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटीजने हा अहवाल मांडला आहे. 

जुलै महिन्यात धो-धो पाऊस पडतो,  मात्र, प्रत्यक्ष पावसाच्या दिवसांत घट आली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपून पेरणीची लगबग सुरू केली होती. पाऊस वेळेवर येईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे.  पावसाअभावी तालुक्यातील पिके सुकण्यास, करपण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे. 

राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील काही भाग अवर्षणग्रस्त स्थितीत आहे, असं अहवालात मांडण्यात आलं आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, नांदेड, धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या पर्जन्यमानआणि तापमान यांच्या आकडेवारीचे 30 वर्षाचे परीक्षण यामध्ये करण्यात आले आहे. त्याचसोबत 2050 वर्षांपर्यंतचे पूर्वनुमानही यात लावण्यात आले आहेत. 

उशिरा सुरू होणारा पावसाळा, अधूनमधून पडणारा दुष्काळ आणि पाऊस यामुळे सोयाबीन आणि कापसाच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. तसेच हरभरा लागवडीत शेंगा भरण्याच्या दरम्यान तापमानात अचानक वाढ दिसून येईल. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा अंदाज ह्या अभ्यासात वर्तवण्यात आल्याचं रिसर्चर रोमित सेन सांगतात. 

आज पाऊस आणि उद्या ऊन अशामुळे पिकांवर परिणाम होतो आहे. खरीपाच्या मधोमध पडणाऱ्या मुसळधारेमुळे बुरशीजन्य रोग, कीटकांचा धोका संभवतो. अशात अचूक माहिती देणारी अॅग्रो वेदर स्टेशन जिल्ह्यात असली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊशकतो. वेदर स्टेशनच्या मार्फत पेरणी कधी करायची या विषयीचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर किती प्रमाणात करावा याविषयी देखील शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यास शेतकऱ्यांना मदत होईल, असा हा अभ्यास सांगतो. 

‘हवामान बदलाचा परिणाम शेती क्षेत्रावर होत असून त्यात सातत्याने यामध्ये वाढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत. यापुढे परिणामआणखी भीषण रूप धारण करतील आणि त्यातून अन्नसुरक्षा धोक्यात येईल. हवामान बदलाच्या अनुषंगाने शेतीमधून शाश्वत उत्पन्नासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा धान्यासाठी दुस-या देशातून आयातीसाठी हात पसरावे लागतील’, अशी भीतीशेती अभ्यासक दीपक चव्हाण व्यक्त करतात. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget