एक्स्प्लोर

देशात 'शैक्षणिक आणीबाणी', एक परीक्षा नीट घेता येईना; घोळावरुन ठाकरे, पाटील, चतुर्वेदींचा संताप

पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली.

मुंबई : देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट, युजीसी नेट (UGC NET) परीक्षांवरुन सावळा गोंधळ सुरू आहे. एनटीएमार्फत घेतली जाणारी युजीसी नेट परीक्षा रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने आता परीक्षेला अवघे 12 तास शिल्लक असताना नीट (NEET) पीजी परीक्षाही रद्द केली आहे. त्यामुळे, नीट पीजी परीक्षांची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे नीट-नेट परीक्षांमधील सरकारच्या भोंगळ कारभारावरुन विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल्याही, असे म्हणत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तर, शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) व प्रियंका चतुर्वेदी यांनीही सरकारला लक्ष्य केलं आहे.   

पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ‘देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे’ असे कायम बोलले जाते. मात्र, याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे. अवघ्या 12 तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ? मुळात अशा प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी. मात्र, केंद्र शासनाला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचे असल्याने या अडचणी उद्भवत आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच,  या अनागोंदीमुळे उद्विग्न उद्या काही तरुण तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असेही त्यांनी म्हटले. 

शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या परीक्षांवरुन सुरू असलेल्या गोंधळावरुन शिवसेने नेते आदित्य ठाकरे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही भूमिका मांडली आहे. देशात शिक्षण आणीबाणी लावण्यात आलीय, असे म्हणत प्रियंका चतुर्वेदींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तर, वन नेशन वन इलेक्शनच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला एक परीक्षा नीट घेता येईना, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून देशभरात सुरू असलेल्या सीईटी, नीट आणि नेट परीक्षांतील घोळावर भाष्य केलं. काल CET च्या परीक्षांसंदर्भात उत्तर द्यायला डायरेक्टर होते, पण त्यांच्याकडे उत्तर नव्हते. विद्यार्थ्यांचे पैसे रिफंड होणार का, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी अद्याप उत्तरपत्रिका हातात का नाही देत, असेही म्हटले. तसेच, नीट परीक्षांबाबत जो कोणी चूक आहे, त्यावर कारवाई व्हायलाच हवी, पण होईल असं मला वाटत नाही, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले. 

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा

"मी म्हणेन की या देशात शैक्षणिक आणीबाणी लागू आहे, ज्याप्रमाणे परीक्षा रद्द केल्या जात आहेत, एका पाठोपाठ एक परीक्षा रद्द होत आहेत, पेपर पुढे ढकलले जात आहेत. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदारी घेत नाहीत. देशातील NEET परीक्षांच्या चौकशीला त्यांनी नकार दिला आहे. केवळ एनटीए अध्यक्षांची बदली करुन काम झालं का, संपूर्ण शिक्षण विभाग यास जबाबदार असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा'', अशी मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.  

एनटीए महासंचालकांची हकालपट्टी

एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) च्या वतीने घेण्यात आलेल्या नीटच्या निकालानंतर झालेल्या गोंधळावरुन कारवाईला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने शनिवारी रात्री एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांची तडकाफडकी हकालपट्टी करून त्यांच्या जागी प्रदीप सिंह खरोला यांची हंगामी नियुक्ती केली आहे, तर नीटमधील कथित अनियमिततेची चौकशी सीबीआयकडे सोपविली जाईल, असे शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी रात्री सांगितले.

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
Ladki Bahin Yojana EKYC : दररोज 4  ते 5 लाख महिलांची ई-केवायसी, एक कोटी लाडक्या बहिणींनी केली ई-केवायसी, मुदतवाढ मिळणार का?
दररोज 4 ते 5 लाख महिलांची ई-केवायसी, एक कोटी लाडक्या बहिणींनी केली ई-केवायसी, मुदतवाढ मिळणार का?
अमोलदादा मला दत्तक घ्या, मी मिटकरी आडनाव लावायला तयार; लग्नाळू तरुणाचे आमदार मिटकरींनाही पत्र
अमोलदादा, मला दत्तक घ्या, मी मिटकरी आडनाव लावायला तयार; लग्नाळू तरुणाचे आमदार मिटकरींनाही पत्र
Embed widget