एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, बारामतीसह 16 मतदारसंघाकडे विशेष लक्ष : देवेंद्र फडणवीस 

तुम्ही विचार करताय त्यापेक्षाही मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलं.

Devendra Fadnavis : तुम्ही विचार करताय त्यापेक्षाही मंत्रीमंडळाचा विस्तार लवकर होईल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलं. सर्वोच्च न्यायालयानं मंत्रीमंडळाचा विस्तार करु नका, असे कुठेही म्हटलं नाही. न्यायालयातील सुनावणीचा आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा कोणाताही संबध नसल्याचे फडणवीस म्हणाले. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चा अनेकजण करत आहेत. यासंबंधी फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, कोण काय म्हणतंय याला काही महत्व नाही. त्यावर उत्तरं द्यायला मी काही रिकामटेकडा नाही. परिस्थिती काय आहे याला राजकारणात महत्व असते असे फडणवीस म्हणाले. तसेच शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. केवळ भावनिक भाषण देऊन जनता सोबत येत नसते असा नाव न घेता टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना जबाबदारी

भाजपने गेल्या सहा महिन्यापासून लोकसभेच्या 16 मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ देखील आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघात आम्हाला चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे तो मतदारसंघ 16 मतदारसंघात आहेत. या मतदारसंघासाठी काही केंद्रीय नेते प्रभारी म्हणून देण्यात आले आहेत. बारामती मतदारसंघाची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना दिली आहे. त्या सप्टेंबरमध्ये बारामतीत येमार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

पुढची लोकसभेची निवडणूक ही शिवसेना आणि भाजप युतीत लढणार

विशेष लक्ष असलेल्या 16 मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांचा देखील मतदारसंघ होता. पण जे लोक आता युतीत आमच्यासोबत आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. पुढची लोकसभेची निवडणूक ही आम्ही शिवसेना आणि भाजप अशा युतीत लढणार आहोत. त्यामुळं जे आमच्यासोबत आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. आमची शक्ती त्यांना निवडून आणण्यासाठी खर्ची घालणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

फडणवीसांचा अजित पवारांना टोला

मंत्रालयाचे सचिवालय झाले असल्याची टीका होत आहे. याबाबत फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले की, माहिती असतानाही राजकाराणासाठी अशी डायलॉगबाजी केली जाते. गेल्या सरकारमध्येही देखील सचिवांना काही अधिकार दिले होते. तसेच आमच्या सरकारमध्येही अनेक मंत्र्यांनी सचिवांना काही अधिकार दिले होते असे फडणवीस म्हणाले. ही महाराष्ट्रात नाही तर देशात परंपरा असल्याचं त्यांनी सांगितले. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळं त्यांना आता बोलावेच लागेल. त्यामुळं त्यांना हे विसरावे लागेल की त्यांचा काळातही 30 ते 32 दिवस पाचच मंत्री होते असा टोला पडणवीसांनी अजित पवारांना लगावला.

भावनिक भाषण देऊन जनता सोबत येत नसते, उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा टोला

ज्यावेळी तुम्ही सत्तेत असता त्यावेळी तुम्ही मराठवाडा, कोकण, विदर्भासाठी काय केलं याच्या आधारवर जनता मूल्यमापन करत असते. केवळ भावनिक भाषण देऊन जनता सोबत येत नसते असा टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावं आम्ही आमच्या पक्षाचं काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या युतीला राज्यातील जनतेनं कौल दिला असल्याचे फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget