एक्स्प्लोर

देशात आधीच इतकी रोगराई, एकाची भर पडली तर काय फरक पडतो : राज ठाकरे

जीवघेण्या कोरोनासंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत औरंगाबादेत तिथीनुसार शिवजयंती साजरी केली.

औरंगाबाद : देशात आधीच इतकी रोगराई, त्यात आणखी एकाची भर पडली तर काय फरक पडतो, असं वक्तव्य जीवघेण्या कोरोनासंदर्भात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते औरंगाबादेत तिथीनुसार शिवजयंती साजरी केली गेली. महाराष्ट्रात वर्षाचे 365 दिवस शिवजयंती साजरी व्हायला हवी असं मत यावेळी राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादमध्ये मनसेचा तिथीनुसार शिवजयंती सोहळा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते शिवपूजन पार पडलं. यावेळी फेटा बांधून राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आला. सर्व सण तिथीनुसार साजरे होतात, त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असल्याचे राज यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, देशात आधीच इतकी रोगराई, त्यात आणखी एकाची भर पडली तर काय फरक पडतो. कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहेच, पण महाराष्ट्रात कोरोनाच्या फारशा काही केसेस नाहीत. कुणीही दगावलेलं नाही. असं असताना प्रशासनाकडून अनेक गोष्टींवर बंदी घातली जातेय. परवानगी नाकारली जातेय. कशासाठी लोकांना विनाकारण घाबरवत आहात? असा सवालही राज ठाकरे यांनी काल, बुधवारी केला होता. Coronavirus | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 9; राज्यात एकूण 12 कोरोनाग्रस्त राज ठाकरे म्हणाले की, काळजी घेणं हे प्रत्येकाचं काम आहे याबद्दल दुमत नाही. पण कोरोनाच्या नावानं ज्या प्रकारे आव आणला जातोय, त्याला काही अर्थ नाही. आपल्याकडं इतर अनेक प्रकारची रोगराई आहे. माझ्या माहितीनुसार देशात दिवसाला 400 लोकं टीबीनं मरतात. वर्षाकाठी हा आकडा दीड लाखांच्या आसपास आहे. इतकी रोगराई इथं आधीच असताना कोरोनावरून एवढा गोंधळ का माजवला जातोय? नाशिकला 144 कलम लावलंय. कशासाठी लोकांना घाबरवताय? पोलिसांना याची नेमकी किती माहिती आहे, असा सवाल राज यांनी केला. #CoronaVirus | महाराष्ट्रातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचं नाव सांगून शिवजयंतीला परवानगी नाकारत असाल तर संभाजीनगरच्या निवडणुका अवघ्या 25-30 दिवसांवर आल्यात. त्या पुढं ढकलणार आहात का? कारण, हा एक-दोन दिवसांचा आजार नाही. अजून त्यावर औषध सापडलं नाही. मग निवडणुकांवरही निर्णय घ्या, असंही राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय

व्हिडीओ

Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
Uddhav Thackeray : दोन चार गद्दार फोडल्यानं शिवसेना संपत नसते, कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही : उद्धव ठाकरे
कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंचा नागपूरमधून थेट इशारा
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
Embed widget