जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत, त्यांना सद्बुद्धी मिळो; मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र
आजचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. लवकरच संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येत जाऊन दर्शन घेणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

ठाणे : अवघ्या भारतवर्षाची प्रदीर्घ काळची प्रतीक्षा अखेर संपली. अयोध्येत (Ayodhya) राममंदिरात (Ram Mandir) प्रभू श्रीराम विराजमान झाले. मंत्रघोषात प्रभू श्रीरामाचे गाभाऱ्यात विधिवत पूजन करण्यात आलं. ठाण्यात कोपिनेश्वर मंदिरातून मुख्यमंत्री शिंदेंनी (CM Eknath Shinde) तर नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) लाईव्ह सोहळा पाहिला. राममंदिराला लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळासह भेट देणार आहे. आजचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. ते ठाण्यत बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आजचं निमंत्रण खरं तर मलाही होतं. मात्र एकट्याने दर्शन घेण्याऐवजी अख्खं मंत्रिमंडळ दर्शनाला जाणार आहे. महाराष्ट्राचे अयोध्या आणि रामलल्लाचं एक वेगळं नातं आहे. आपल्याच महाराष्ट्रातील पंचवटीत त्यांचा वनवास होता. चंद्रपुरातून मंदिरासाठी लाकूड गेले आहे. आजचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. लवकरच संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येत जाऊन दर्शन घेणार आहे.
बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत, ज्यांनी राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळो,अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे, त्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे. सर्वांनी या सोहळ्यात शामील झालं पाहिजे. काही लोकं प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत मात्र जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत.
अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा : पंतप्रधान
"अयोध्येमध्ये श्री रामाच्या अभिषेकचा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग होणं माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. जय सिया राम", अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत.
आज कारसेवकांचे आत्मे सुखावले : राज ठाकरे
आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आहेत. 32 वर्षांनी शरयू नदी हसली, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर दिली आहे.
संपूर्ण देशाचं स्वप्न आज पूर्ण
संपूर्ण देशाचं स्वप्न आज पूर्ण झालं. अखंड भारत ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आज याचि देही, याचि डोळा अवघ्या देशानं अनुभवला. न भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्ण सोहळ्यात प्रभू श्रीरामाची अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
हे ही वाचा :
जय सिया राम! 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान, पंतप्रधान मोदींकडून विधीवत प्रतिष्ठापना
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
महत्त्वाच्या बातम्या






















