एक्स्प्लोर

सरकार अपयशी! मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ; दानवेंचा गंभीर आरोप

Ambadas Danve : राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे टीकास्त्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर केले.

Ambadas Danve On CM Eknath Shinde-Devendra Fadnavis : राज्यातील गुन्हेगारीवरून पुन्हा एकदा विरोधकांकडून सरकार टीका होतांना पाहायला मिळत आहे. तर, राज्यातील वाढते गुन्हे पाहता नागपूर शहरात 332.91 टक्के तर, ठाणे जिल्ह्यात 184.33 टक्के इतके गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ठाणे, नागपूर जिल्हयात गुन्हेगारीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई ठाण्यात पहाटेपर्यंत डान्सबार सुरू असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे टीकास्त्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर केले.
 
 तर, कायद्या सुव्यवस्था राखण्यास सरकारला आलेले अपयश, राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती, विस्कळीत झालेलं जनजीवन आदी मुद्द्यांवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर धारेवर धरले. आताच सरकार हे मूठभर सत्ताधाऱ्यांचे हित राखण्यात व्यस्त आहे असा आरोप दानवे यांनी अंतिम आठवड्यावरील प्रस्तावावर भाषण करताना केला. राज्यात कायद्याचा धाक राहिला नसल्यामुळे दंगलीच्या घटना, दिवसा मुलींवर होत असलेले हल्ले, अत्याचाराच्या घटना यात वाढ झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेतील अभियंतावर हात उगारणाऱ्या सत्ताधारी आमदार यांच्यावर सरकार कारवाई करत नाही. मात्र विरोधी पक्षाच्या आमदारावर कारवाईचा बडगा उचलतो. एकप्रकारे सरकार दुटप्पी भूमिका बजावत असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.

इंग्रजांच्या काळातही झालं नाही अशाप्रकारे या सरकारच्या काळात वारकऱ्यांवर लाठीमार झाला. राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या दंगलीच्या घटना या एकप्रकारे कोणी तरी षड्यंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी करत सरकारच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. महिला लोकप्रतिनिधींवर अश्लील टीका करणे, महापुरुषांचा अवमान करणे अशा कृतीतून काहीजण स्वतःची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा फॅड फोफावल असल्याची टीकाही दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

केंद्राकडून राज्यावर होतेय सापत्न वागणूक

राष्ट्रीय विकासदरात राज्याचे योगदान हे 14 टक्के असताना केवळ राज्याला 7 टक्के निधी देण्यात आला. याउलट उत्तर प्रदेश राज्याचे योगदान हे 7 टक्के असताना केंद्राकडून त्या राज्याला 18 टक्के निधी देण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला 64 हजार कोटी तर उत्तर प्रदेश राज्याला 1 लाख 83  हजार 7  कोटी आले. अशाप्रकारे 15 व्या वित्त आयोगात राज्यावर केंद्राकडून अन्याय व सापत्न वागणूक दिली गेल्याचा आरोप दानवे यांनी केला. केंद्राकडून जितका कर महाराष्ट्र राज्यातून केंद्राला दिला जातो, तितका वाटाही केंद्राकडून दिला जात नाही, एकप्रकारे महाराष्ट्र राज्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केंद्राकडून होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

पोलीस आयुक्तालयाच्या संरक्षणात चालतात भाजप कार्यकर्त्यांचे अवैध धंदे; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरेTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaMahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Embed widget