एक्स्प्लोर

चिपळूणकरांच्या मदतीला नाम फाउंडेशन; वाशिष्टी आणि शिव नद्या होणार 'गाळमुक्त'

Chiplun News : चिपळूणकरांच्या मदतीला नाम फाउंडेशन संस्था आल्यानं नद्या गाळ मुक्त होत आहेत. त्यामुळे चिपळूणकर नक्कीच मोकळा श्वास घेणार यात शंका मात्र नाही. 

Chiplun News : 22 जुलै हा दिवस आठवला तर चिपळूणकरांच्या अंगावर काटा आणणारा दिवस. त्या दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूणात महापूर आला आणि सारच या महापुरात उध्वस्त झालं. पूर ओसरल्यावर चिपळूणकरांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले. अनेक प्रश्नांना,अडचणींना सामना देत चिपळूणकर कसेबसे सावरत आहेत. त्यात चिपळूणकरांच्या मदतीला आली ती नाम फाउंडेशन संस्था. या संस्थेच्या वतीनं नद्यांचा गाळ दिवसरात्र काढला जात आहे. 

एकीकडे धोधो पडणारा पाऊस तर दुसरीकडे शहरातून वाहणाऱ्या नद्यांना येणारा महापूर. या महापुराचे पाणी शहरात शिरले आणि बघता बघता क्षणांतच सार शहर,वस्ती पुराच्या पाण्यात गेले. पुराच्या पाण्याची पातळी 10 फुट उंच असल्यानं घरं, दुकानं पाण्यात गेली. रात्रभर या पाण्याचा सामना तेथील लोकांना करावा लागला. 

पुराचं पाणी ओसरल्यावर चिपळूणकर एकटवले आणि आपल्या शहरातून वाहणाऱ्या नद्यांचा गाळ काढून टाकावा या मागणीसाठी विविध उपोषण,आंदोलनेही केली. जवळपास महिनाभर या मागणीसाठी चिपळूणकर साखळी उपोषणाला बसले. त्याचे पडसाद अधिवेशनातही उमटले. त्यानंतर सरकारला जाग आली आणि सरकारनं गाळ काढण्यासाठी मदत जाहीर केली. ज्या चिपळूणकरांच्या मागण्या होत्या, त्या म्हणाव्या तितक्या पुर्ण झाल्या नाहीत. 2005 च्या पुरानंतर या नद्यांचा गाळ काढलेला नाही. मागणी करूनही गाळ गाळ काढलेला नाही. या नद्यांचा जर वेळेत गाळ काढला असता तर ही परिस्थिती चिपळूणकरांवर आली नसती.

चिपळूणच्या बचावसमितीचे उपोषण सुरु असताना अभिनेते नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशन या संथेनं दखल घेऊन या दोन्ही नद्यांचा गाळ उपसासाठी पुढाकार घेतला आणि स्वतः नाना पाटेकर यांनी 4 जानेवारीला चिपळुणात येऊन गाळ उपसाचा शुभारंभ केला. आज चिपळूणमध्ये शिव नदीचा गाळ काढण्याचं काम दिवस रात्र सुरु आहे. अजूनही या कामासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्री वाढवण्यात येणार आहेत. तीन आठवड्यात शिवनदीचा 70 टक्के गाळ उपसा करुन झाला आहे. अनेक वर्ष नद्यांमध्ये साचलेला गाळ काढला जात आहे. त्यामुळे नद्या मुक्तपणे वाहू लागल्या आहेत. चिपळूणात आलेल्या नाना पाटेकर यांनी चिपळूणकरांना आव्हान केलं आहे की, आपणही पुढे या आपण दोघे मिळून गाळ काढुया. आणि चिपळूणला पुरमुक्त करुया. 

यापूर्वी चिपळूणचे लोकप्रतिनिधी गाळ काढण्याचा शुभारंभ करायचे. परंतु नारळ फोडल्यावर दुसऱ्या दिवशी मशिनरी जाग्यावर नसायच्या. नाम संथेचं चार मशिन सध्या गाळ काढण्यासाठी कार्यरत आहेत. नद्यांचा गाळ काढल्यानं नदीकाठच्या रहिवाशांनी मोकळा श्वास घेतला आहे. आमच्या घराशेजारी वाहणारी नदी पुर्णपणे गाळानं भरली होती. त्यामुळे पुराचे पाणी नदीपात्राबाहेर येऊन आमच्या घरात पाणी शिरलं. पण आता नाम फाउंडेशननं गाळ काढल्यानं पाणी नदीपात्राबाहेर येण्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल. 

महामार्गावरील कामथे धरण ते शहरातील वाशिष्टी नदी हे जवळपास साडेसात किलोमीटर नदी पात्रातील गाळ उपश्याचं काम दिवसरात्र सुरु असल्यामुळं येणाऱ्या काही दिवसांत शिवनदी गाळमुक्त झालेली दिसणार आहे. गाळ काढण्याच्या कामाला याआधीच पाटबंधारे विभागानं सुरुवात केली पाहिजे होती. ती न करता सरकारी आदेशाची वाट बघत बसल्यानं चिपळूण आंदोलनाला उतरलं, अशा परिस्थितीत नद्या गाळ मुक्त करण्यासाठी चिपळूणकरांच्या मदतीला नाम फाउंडेशन संस्था आल्यानं नद्या गाळ मुक्त होत आहेत. त्यामुळे चिपळूणकर नक्कीच मोकळा श्वास घेणार यात शंका मात्र नाही. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
Tejasswi Prakash Karan Kundrra :  तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 June 2024 : 10 AM: ABP MajhaMaharashtra Assembly Monsoon Session : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यताAlandi Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजलीABP Majha Headlines :  10:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
Tejasswi Prakash Karan Kundrra :  तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Embed widget