एक्स्प्लोर

Hasan Mushrif: युती अचानक का झाली? कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय का घ्यावा लागला, ईडी आरोपांचे काय? मुश्रीफ काय काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडीची कागल नगरपालिकेत झालेली अनपेक्षित युती ही गैरसमज, दबाव आणि संघर्षाच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठीची पावले असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Hasan Mushrif: कागलमध्ये अनपेक्षित राजकीय पलटीनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः खुलासा करत “ईडीचा संभ्रम दूर झाला, त्यामुळेच आघाडी शक्य झाली,” असा थेट उल्लेख करून नवी राजकीय खळबळ उडवली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडीची कागल नगरपालिकेत झालेली अनपेक्षित युती ही गैरसमज, दबाव आणि संघर्षाच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठीची पावले असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. त्यांनी स्पष्ट केले की उद्या 18 डिसेंबर रोजी मटकरी हॉलमध्ये ते आणि समरजितसिंह घाटगे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा जाहीर करणार आहेत. “आता आपली जबाबदारी एकच राष्ट्रवादी आणि छत्रपती शाहू आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करणे. बाकी मन मोकळं पत्रकार परिषदेतच करीन.”

स्वत:च्या, संजयबाबांच्या कार्यकर्त्यांशीही चर्चा नाही

मुश्रीफ यांनी प्रसिध्दीपत्रकातून स्वीकारले की ही युती इतक्या अचानक झाली की स्वतःच्या कार्यकर्त्यांपासून ते मित्र मानल्या जाणाऱ्या माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या कार्यकर्त्यांशीही चर्चा होऊ शकली नाही. “यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे ते स्पष्टपणे म्हणाले. परंतु या आघाडीच्या मूळ कारणांबाबत मुश्रीफ यांनी केलेला सर्वात ठळक आणि लक्षवेधी उल्लेख म्हणजे ‘ईडीच्या भीतीचा काहीसा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये होता, पण चर्चा केल्यानंतर तो दूर झाला’.  मुश्रीफ म्हणाले की, ही आघाडी कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर कागल शहर–तालुका विकासासाठी, निरर्थक संघर्ष संपवण्यासाठी आणि जनतेला जास्तीत जास्त देण्यासाठी करण्यात आली आहे. तसेच समरजितसिंह घाटगे यांच्यासोबतची ही नवीन जोडी केवळ राजकारणासाठी नव्हे, तर भविष्यातील स्थैर्यासाठी असल्याचेही त्यांनी सूचित केले.

ही आघाडी कोणाचाही विश्वासघात करणार नाही

इतकेच नव्हे तर, कागलमध्ये अशी राजकीय पुनरावृत्ती पहिल्यांदाच होत नसून, शामराव भिवाजी पाटील, सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंहराजे घाटगे यांच्यापासून ते स्वतः आणि संजयबाबा घाटगे यांनीही पूर्वी अशाच टोकाच्या संघर्षानंतर तालुक्याच्या हितासाठी हातमिळवणी केल्याची आठवण त्यांनी करून दिली. युती अचानक का झाली? कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय का घ्यावा लागला? या प्रश्नांवर पडदा टाकत मुश्रीफ यांनी आश्वासन दिले की, “ही आघाडी कोणाचाही विश्वासघात करणार नाही. उलट कार्यकर्त्यांना जादा दिलासा मिळेल, यासाठी मी स्वतः शिर्षस्थ नेतृत्वाशी बोलणार आहे.”

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Embed widget