प्राध्यापक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल! नवीन फॉर्म्युला काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्राध्यापक भरती कार्यपद्धतीमध्ये बदल केला आहे. यामध्ये 75-25 ऐवजी 60-40 चा फॉर्म्युला भरती प्रक्रियेमध्ये असणार आहे.
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्राध्यापक भरती कार्यपद्धतीमध्ये बदल केला आहे. यामध्ये 75-25 ऐवजी 60-40 चा फॉर्म्युला भरती प्रक्रियेमध्ये असणार आहे. मात्र, प्राध्यापक भरती प्रक्रियेत उमेदवाराला गुणदान देताना विद्यापीठाची एनआयआरएफ आणि परदेशी क्रमवारी बघून गुण देण्याला अभाविपने विरोध केला आहे. उत्सव व तंत्र शिक्षण विभागामध्ये जवळपास पाच हजार प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे ही भरती करत असताना यावेळी 60-40 फॉर्म्युला ठेवण्यात आला आहे. शैक्षणिक व संशोधन गुणवत्तेला 60 टक्के गुण असतील तर अध्यापन कौशल्य चाचणीला 20 टक्के आणि मुलाखत कामगिरीला 20 टक्के गुण असणार आहेत.
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रँकिंग काय आहेत? हे पाहून गुणदान केले जाणार
नियमांमध्ये शैक्षणिक व संशोधन गुणवत्तेच्या 60 टक्के गुणदान करत असताना उमेदवार कोणत्या विद्यापीठात पदवी पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी केली आहे आणि त्या विद्यापीठाची NIRF /QS यांसारखे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रँकिंग काय आहेत? हे पाहून गुणदान केले जाणार आहे. या सगळ्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विरोध केला असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्र निर्माण होत असून विद्यापीठाची सध्याची क्रमवारी लक्षात घेऊन गुण देणे हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचं असल्याचं संघटनेचे म्हणणं आहे. प्रत्येक वर्षी विद्यापीठाची क्रमवारी ही बदलत असते त्यासोबतच विद्यापीठाच्या रँकिंगवरून उमेदवाराची बुद्धिमत्ता आणि कौशल्य तपासणे पूर्णपणे चुकीचा असल्याचा सुद्धा संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळं या सगळ्यावर वाद निर्माण होण्यापेक्षा उच्चतंत्र शिक्षण विभागाने या संबंधी स्पष्टता आणावी अशी मागणी अभाविपने केली आहे.
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता असावी यासाठी नवीन कार्यपद्धती
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, निष्पक्षता आणि संतुलन असावे यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून सुधारित कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. 6 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी रद्द करून परिशिष्ट-अ मधील नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आलेत. हा निर्णय कुलपती तथा राज्यपाल यांच्या निर्देशानुसार घेण्यात आलेत. या नव्या कार्यपद्धतीनुसार सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक या तिन्ही पदांसाठी एकात्मिक मूल्यमापन प्रणाली लागू असेल. यात उमेदवारांच्या शैक्षणिक आणि संशोधन गुणवत्तेला ६० टक्के, अध्यापन कौशल्य मूल्यमापनाला २० टक्के आणि मुलाखत कामगिरीला २० टक्के देऊन अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI























