एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेंच्या आग्रहानेच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, चंद्रकांत पाटलांचा दावा 

Deputy CM Devendra Fadnavis : फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदावरुन राज्यात तर्क वितर्क सुरु झाले आहेत.

Deputy CM Devendra Fadnavis : अखेर गुरुवारी राज्यात शिंदेशाहीला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी उप मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदावरुन राज्यात तर्क वितर्क सुरु झाले आहेत. गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला आपण मंत्रिमंडळात नसणार, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर भाजप (BJP) हायकमानकडून ऐनवेळी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यांनी शपथ देखील घेतली. त्यानंतर भाजपमधील अंतर्गत कलहाबाबातच्या चर्चा सुरु झाल्या. यावर आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलेय. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, सामान्य हिंदुत्वासाठी लढणाऱ्या आनंद दिघेंचे विचार जपणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकत होते पण हिंदुत्वासाठी आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. प्रशासनाची आवश्यकता असल्याने एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आग्रह केला. त्यानंतर पक्ष श्रेष्ठींशी बोलले, आम्ही निर्णय पक्ष श्रेष्ठीना विचारतो. एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्रिपद स्विकारले. 

देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झालेले पहिलं उदाहरण नाही. प्रशासनाची आवश्यकता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत सहभागी व्हावं लागले, असे पाटील म्हणाले. पक्षाचा आदेश आमच्यासाठी सर्वस्व असतो. जे आपल्या मंत्रिमंडळात होते त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी मोठे मन लागते. ते मोठे मन देवेंद्र फडणवीस यांनी दाखवल्याचं पाटील यांनी सांगितले.  

देवेंद्र फडणवीस अजूनही नाराज  ?
फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नसल्याचे तसेच मंत्रिमंडळाबाहेर राहण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी फडणवीस यांना विनंती करत मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देवेंद्र फडणीस यांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी दोनदा फोन केल्याचे बोलण्यात आले. दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत देवेंद्र फडणीस मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून समावेश होत असल्याचे सांगितले. त्यामुळे या सत्ता नाट्यानंतर भाजपमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून आले. दरम्यान, भाजप कार्यालयाच्या बाहेर जो फलक लावण्यात आला आहे त्यावर अमित शहा यांचाच फोटो नाही. त्यामुळेही चर्चा सुरु झाली आहे. देवेंद्र फडणीस यांचे दिल्लीतून पंख कापण्यात आले की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियामध्ये देवेंद्र फडणीस यांना का रोखण्यात आलं? याची चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांची महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिली नव्हती. त्या अनुषंगानेच त्यांची प्रत्येक वाटचाल सुरू होती. मात्र, आता यामध्ये भाजप सरकार स्थापन होऊनही मुख्यमंत्रि पदापासून दूर ठेवण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या 
Maharashtra Government formation : ते पुन्हा आले, पण उपमुख्यमंत्री म्हणून; मोदी, शहांच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी
maharashtra government formation : बेसावध राहू नका! राज ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांना सल्लावजा शुभेच्छा
...त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो; राज ठाकरेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget