एक्स्प्लोर

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी 26 जानेवारीच्या ग्रामसभेत ठराव करा, किसानपुत्र आंदोलनाचं आवाहन

महाराष्ट्रात 26 जानेवारी 2020 रोजी प्रत्येक गावात ग्रामपंचायतमध्ये सभा घेतली जाते. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी ठराव मांडून तो पारित करावा, असं आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने करण्यात येत आहे.

मुंबई : महाराष्ट्रात रोज 43 शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या घडत असताना त्याकडे राजकीय नेत्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांना सुखाने आणि सन्मानाने जगण्याचं स्वातंत्र्य हवे आहे. मात्र ही व्यवस्था बांडगुळाच्या हातात असल्याने त्यांचे जगणे कठीण झाले आहे. सिलिंग, आवश्यक वस्तू यासारख्या जाचक शेतकरी विरोधी कायद्याने त्यांच्या पायात बेड्या टाकल्या आहेत, न्यायबंदी लादली आहे. हे सर्व कोणाला माहिती करुन घ्यायचे नाही, अशी एकूण परिस्थिती आहे. शेतमालाचे भाव व कर्जमाफीत घुटमळत असलेल्या शेतकरी बांधवांना कायद्याच्या बेडीतून बाहेर काढण्यासाठी कायदे रद्द करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात 26 जानेवारी 2020 रोजी प्रत्येक गावात ग्रामपंचायतमध्ये सभा घेतली जाते. शहरात शिक्षण घेत असलेले व व्यवसाय, रोजगार निमित्ताने काम करत असलेल्या किसानपुत्रांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत सभेत 26 जानेवारी 2020 रोजी 'शेतकरी विरोधी (सिलिंग, आवश्यक वस्तू आदी) कायदे रद्द करण्यासाठी ठराव मांडून तो पारित करावा, असं आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने करण्यात येत आहे.

1. कमाल जमीन धारणा कायदा, 2. आवश्यक वस्तू कायदा 3. जमीन अधिग्रहण कायदा हे कायदे शेतकरी विरोधी कायदे आहे. हे कायदे रद्द होण्यासाठी किसानपुत्र आंदोलन शेतकरीपुत्रांना गेली अनेक वर्षापासून आव्हान करत आहे. शेतकरी आत्महत्या प्रती शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अमर हबीब हे गेली अनेक वर्ष यासंदर्भात आपली भूमिका मांडत आहेत. शेतकऱ्यांचे खरे दुखणे हे कायद्यात आहे. यासाठी किसानपुत्र आंदोलन लढा देत आहे. जोपर्यंत कायदे रद्द होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यासाठी प्रत्येक किसानपुत्रांने शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी लढा दिला पाहिजे.

शेतकऱ्याला मुळात स्वातंत्र्य नसल्याने स्वतः पिकवलेला मालाचा भाव मिळण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागतो, ही खुप मोठी शोकांतिका आहे. त्यासाठी शहरातील किसानपुत्रांनी आपल्या गावात शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी ठराव मंजूर करावा, असं आव्हान किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने करण्यात येत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
PMC Election 2026: पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, शहर सरचिटणीस अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात; आमदार अन् शहराध्यक्षांवर सनसनाटी आरोप, म्हणाले, गिरीश महाजन...
नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, शहर सरचिटणीस अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात; आमदार अन् शहराध्यक्षांवर सनसनाटी आरोप, म्हणाले, गिरीश महाजन...
Embed widget