एक्स्प्लोर

राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर 21 हजारांचं कर्ज !

मुंबई :  तुम्ही कोणत्याही बँकेचं, संस्थेचं अथवा सावकाराकडूनही कर्ज घेतलं नसलं तरीही तुमच्या डोक्यावर 21 हजार रुपयांचं कर्ज आहे. देशाचे नियंत्रक आणि महालेखापाल अर्थात 'कॅग'ने आपल्या अहवालात ही माहिती प्रसिद्ध केली आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकावर 21 हजार 125 रुपयांचं कर्ज आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2010-11 साली प्रत्येकावरील कर्जाचा आकडा 17 हजार 275 रुपये होता.   राज्यातील खर्चाचा लेखाजोखा मांडणारा 'कॅग'चा रिपोर्ट आज विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालानुसार गेल्या काही वर्षात सिंचनासाठी मूळ किंमतीच्या दुप्पट खर्च झाला. एवढं करुनही अनेक सिंचन प्रकल्प हे अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यावर 'कॅग'नेही शिक्कामोर्तब केलं. या सगळ्या सिंचन प्रकल्पामुळे राज्यावर कर्जाचा बोजाही वाढला आहे.  CAG राज्यावर वाढता बोजा   राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत असल्याने, राज्यातील प्रत्येक नागरिकावर असलेले कर्जाचे उतरदायित्वही वाढत आहे.   कॅगच्या अहवालानुसार राज्यावरील कर्जाचा बोजा 2 लाख 20 हजार 950 कोटी इतका आहे. या कर्जावरील व्याजापोटी 23 हजार 965 कोटी रुपये अदा करावे लागतात. व्याजाचा हा बोजा मागील 5 वर्षात 53 टक्क्यांनी वाढला आहे.   50 टक्के कर्जाची परतफेड पुढील सात वर्षात?   राज्यावरील एकूण कर्जाच्या 50 टक्के कर्जाची पुढील सात वर्षात परतफेड करायची आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर पुढील काही वर्षात मोठा बोजा येण्याची चिन्हं आहेत. कॅगच्या अहवालानुसार 2018 ते 2020 या कालावधीत 42 हजार 552 कोटीची परतफेड करावी लागणार आहे, तर 2020 ते 2022 मध्ये 42 हजार 160 कोटी रुपयांची पतरफेड सरकारला करावी लागणार आहे.   त्यामुळे या निर्णायक वर्षात मुदत संपेल अशी कोणतीही अतिरिक्त कर्जे सरकारने घेऊ नये, तसेच विचारपूर्वक कर्ज परतफेडीचे धोरण आखावे, अशी सूचना 'कॅग'ने आपल्या अहवालात केली आहे.   'कॅग'चे ताशेरे   राज्यातील 401 सिंचन योजनांवर मूळ खर्चापेक्षा दुप्पट खर्च झाल्याचे ताशेरे 'कॅग'ने आपल्या अहवालात ओढले आहेत.   या 401 सिंचन प्रकल्पांवर 44 हजार कोटींचा वाढीव खर्च झाल्याची बाब 'कॅग'च्या अहवालात समोर आली आहे. तसेच राज्यात एकूण 515 प्रकल्प हे अपूर्णावस्थेत आहेत. यातील 85 प्रकल्प मागील 30 वर्षांपासून अपूर्णावस्थेत असून त्यांचे काम 30 वर्ष उलटून गेले तरी पूर्ण होऊ शकलेले नाही.   *20 वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या सिंचन प्रकल्पांची संख्या 61 इतकी आहे.   *15 वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या प्रकल्पांची संख्या 101 इतकी आहे.   * राज्यातील प्रलंबित 515 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 97 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.   आता सरकारने सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 30 ते 40 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र या रकमेतूनही हे सर्व प्रकल्प पूर्ण होऊ शकणार नाहीत, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.     कोणतेही नियोजन न करता सिंचन प्रकल्पांचे काम कशा पद्धतीने हाती घेतले जाते, त्याचे एक उदाहरण कॅगने आपल्या अहवालात दिले आहे. - नंदुरबारमधील एक प्रकल्प जमिनीची उपलब्धता नसताना सुरू करण्यात आला. -1988 साली हा प्रकल्प 7 कोटी रुपये खर्च करून पूर्ण करायचा होता. मात्र 27 वर्ष झाले तरी हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही आणि या प्रकल्पावर 81 कोटी रुपये खर्च झाले होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज पाच तासांचा मेगा ब्लॉक; मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 25 मिनिटं उशिरा
Maharashtra Live News Updates: मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज पाच तासांचा मेगा ब्लॉक; मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 25 मिनिटं उशिरा
Mumbai Crime News: मुंबईच्या मेट्रो स्टेशनवर संतापजनक घटना; लिफ्टमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य; नराधमाने मुलीला एकटं पाहिलं अन्...
मुंबईच्या मेट्रो स्टेशनवर संतापजनक घटना; लिफ्टमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य; नराधमाने मुलीला एकटं पाहिलं अन्...
Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil: एका दिवसांत मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं; आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
एका दिवसांत जरांगेंनी उपोषण मागे घेतलं; आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
IPL 2026 RCB vs GT : आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने,फायनल कोणं जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं...
आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने, मॅच कोण जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं... 
Kolhapur Success Story: जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Embed widget