एक्स्प्लोर

'मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाहीत': देवेंद्र फडणवीस 

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसं न झाल्यानं पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर पुढे येऊ लागला आहे

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर पार पडला. या विस्तारात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रीतम मुंडे यांच्या जागी भागवत कराड यांना संधी मिळाली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली आणि पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर पुढे येऊ लागला आहे.  डॉ.प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्याऐवजी भाजपनं वर्षभरापूर्वी राज्यसभेवर घेतलेल्या वंजारी समाजातील डॉ.भागवत कराड यांची वर्णी लावली. यामुळं मुंडे भगिनी नाराज असल्याचं बोललं जाऊ लागलं.

यावर भाजपकडून प्रतिक्रिया आली असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे भगिनी नाराज नसल्याचं म्हटलं आहे. नाशिकमध्ये याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की,  मंत्रिमंडळ विस्तारावरून मुंडे भगिनी नाराज,हे कोण म्हणतं? निर्णय पक्ष वरीष्ठ स्तरावरून घेतो.  मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका,त्या नाराज नाहीत, असं ते म्हणाले. तसंच  नारायण राणे हे त्यांच्या कार्यक्षमतेमुळे मंत्रिमंडळात असल्याचंही ते म्हणाले. 

अनेकदा सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाची मदत लागते, त्यासाठी आम्ही तयार: देवेंद्र फडणवीस

राज्यकारभार करताना अनेकदा सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाची मदत लागते, त्यासाठी आम्ही तयार आहोत असं देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये परिवहन बससेवा लोकार्पण कार्यक्रमात म्हणाले. यावेळी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.  मनपाने बस चालू केल्यानं माझ्या दारापाशी, माझ्या मतदारसंघात बस अली पाहिजे असा हट्ट नगरसेवक धरतात. कारण त्यामुळे मतं मिळतात. मीही तेच केलं, पण मनपाने असा निर्णय घेतल्याने हा त्रास वाढतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, कोरोना काळात सर्वच परिवहन वाहतूक व्यवस्था तोट्यात गेल्या. तोट्यात जाणारी बस मनपाला परवडणार का? डिझेल खूप महाग झाले आहे. त्यामुळे डिझेल बस बंद करा आणि त्या ठिकाणी इथेनॉल आणा असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगतात. आपली शहरं ही वाढती आहेत, त्यामुळे शहरांच्या समस्यांही वाढत असतात. त्यामुळे आपण शांत बसून चालत नाही असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी नाशिक मनपा प्रशासनाला दिला. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
Embed widget