एक्स्प्लोर

Bigamous Marriages Act: काय आहे द्विभार्या प्रतिबंधक कायदा? जाणून घ्या दोषीला होणारी शिक्षा आणि दंड...

सोलापूरचा (Solapur) तरुण आणि जुळ्या बहिणी यांच्या विवाह सोहळ्याबाबत ऐकल्यानंतर हिंदू पुरुष दोन स्त्रियांसोबत लग्न करु शकतो का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. हिंदू विवाह कायद्यात याबाबत काय सांगितलं आहे, ते जाणून घेऊयात...

Bigamous Marriages Act: गेल्या काही दिवसांपासून सोलापूरचा (Solapur) तरुण आणि जुळ्या बहिणी यांच्या लग्न सोहळ्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. सोलापूरच्या अतुल नावाच्या तरुणानं कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींसोबत विवाह केला. त्यानंतर त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. जुळ्या बहिणींसोबत लग्न करणं अतुलला महागात पडलं आहे. या विवाहाची महिला आयोगाने दखल घेतली असून याबाबतची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी महिला आयोगाने केली. तसेच भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलिस ठाण्यात या विवाहाच्या विरोधात NCR दाखल झाला आहे. पत्नी किंवा पत्नीच्या हयातीत लग्न करणाऱ्यांना शिक्षा होते का? तसेच हिंदू विवाहित पुरुष हा दुसरं लग्न करु शकतो का?  असे प्रश्न अनेकांना पडले असतील. त्याबाबत जाणून घेऊयात...

द्विभार्या प्रतिबंधक कायदा

द्विभार्या प्रतिबंधक कायदा म्हणजे Bombay prevention of hindu bigamous marriages act 1946. हा एक स्वतंत्र कायदा आहे. या कायद्याअंतर्गत  हिंदू विवाहित पुरुष, पहिल्या पत्नीपासून विभक्त न होता दुसरं लग्न करू शकत नाही. जरी हिंदू पुरुषानं पहिली पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न केलं तर त्याच्या दुसऱ्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळत नाही. 

काय आहे भारतीय दंड संहितेचा कलम 494? 

भारतीय दंड संहितेच्या कलम 494 नुसार, पती किंवा पत्नीच्या हयातीत पुनर्विवाह करणे हा दंडनीय गुन्हा आहे. भारतीय दंड संहितेच्या या कलमात अशा गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. काही धर्मांच्या कायद्यात असे करणे गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही, त्यामुळे हे कलम त्या धर्माच्या लोकांना लागू होत नाही. हा जामीनपात्र, अदखलपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यात कारावासाच्या शिक्षेबरोबरच आर्थिक शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार, एखादी महिला तिच्या पतींनं दुसरे लग्न केले तर त्या विरोधात तक्रार दाखल करु शकतात. 

शिक्षा आणि दंड

भारतीय दंड संहितेच्या कलम 494 अन्वये एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास, अशा व्यक्तीला न्यायालयाने जास्तीत जास्त 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद आहे. दोषीला ठोठावण्यात येणारा दंड हा कोर्ट ठरवतो.

कोण करु शकतं तक्रार? 

द्विभार्या प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पहिलं लग्न लपवलं म्हणून महिला तक्रार करु शकते. तसेच पहिलं लग्न झालेली महिला देखील तक्रार करु शकते. 

दुसरं लग्न करण्यासाठी नियम काय? 

पहिलं लग्न झालेल्या व्यक्तीला जर दुसरं लग्न करायचे असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीला पहिल्या पती/पतीला 1955 च्या हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोट घेणे अनिवार्य आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

उच्चशिक्षित जुळ्या बहिणींचं एकाच मुलाशी लग्न, अकलूजमध्ये धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा

Solapur News : एकाच मांडवात दोघींशी विवाह करणं नवरदेवाच्या अंगलट, अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल 

प्रियांका कुलकर्णी या एबीपी माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget