एक्स्प्लोर

कोरोनाच्या संकट काळात केवळ राजकारण होऊ नये : पंकजा मुंडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ज्या उपाययोजना केल्या आहेत, त्या आयोग्य आहेत असं नाही. मात्र अधित उपाययोजना करणे गरजेचं असून यातून बाहेर पडण्यासाठी जास्तीत जास्त तज्ज्ञ मंडळींशी बोलणे गरजेचं आहे. येत्या काळात रुग्णसंख्या वाढली तर तशी तयारी सरकारकडून होण्यासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

मुंबई : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्यावरचं कोरोनाचं संकट, विधानपरिषद निवडणूक अशा विविध विषयांवर भाष्य केलं. गोपीनाथ गडावर जायला परवानगी मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर एकत्र येऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. लोकांनी एकत्र येऊ नये, त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. जिथे असाल तेथून गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिवादन करा. फेसबूक, सोशल मीडियाच्या माध्यमातून गोपीनाथ गडावरील कार्यक्रम दाखवला जाईल. मुंडे साहेबांच्या आठवणीत स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने दोन दिवे घरात लावा. तसेच कोरानाच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजू लोकांना मदत करा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

राज्यावरील कोरोना संकट आणि राज्य सरकारच्या उपाययोजना यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोरोनाचं मुंबईवर संकट मोठं आहे. मुंबईची लोकसंख्या खुप जास्त आहे. याठिकाणी लोक कमी जागेत खुप दाटीवाटीनं राहतात. झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाशी लढा देण्याचं काम आव्हानात्मक आहे. राज्य सरकारने ज्या उपाययोजना केल्या आहेत, त्या आयोग्य आहेत असं नाही. मात्र अधित उपाययोजना करणे गरजेचं असून यातून बाहेर पडण्यासाठी जास्तीत जास्त तज्ज्ञ मंडळींशी बोलणे गरजेचं आहे. येत्या काळात रुग्णसंख्या वाढली तर तशी तयारी सरकारकडून होण्यासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत. स्थलांतरही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्थलांतरित लोकांची तपासणी झाली पाहिजे. कोरोनामध्ये लोकांचं सहकार्यही तितकच महत्त्वाचं आहे. सरकार आणि लोकांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

केवळ राजकारण करु नये

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या राजकारणवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी सध्या राजकारणात सक्रीय नाही, समजाकारणाकडे मी लक्ष केंद्रीत केलं आहे. केवळ राजकारण करण्याची आता गरज नाही. मात्र विरोधी पक्षाने विरोध करणेही गरजेचं आहे, नाहीतर सत्ताधारी पक्ष काय करत आहे हे समाजासमोर येणार नाही. सरकारी पक्षाने अविचलीतपणे काम करणे आवश्यक आहे. सरकार आणि विरोधक या दोन्ही पक्षांनी आपलं काम केलं पाहिजे, मात्र केवळ राजकारण करु नये.

विधानपरिषदेवर संधी मिळाली नाही म्हणून अपेक्षाभंग झाला नाही

विधानपरिषद निवडणुकीवर बोलताना त्या म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही पंकजा मुंडे मंत्री होणार ही चर्चा होती. विधानपरिषदेत पंकजा मुंडेंना संधी मिळणार ही चर्चा तेव्हापासून सुरु होती. कोणतीही निवडणूक आली की पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा होते. विधानपरिषदेची घोषणा झाली त्यावेळी आम्ही काहीजण दावेदार होतो, त्यामुळे ती चर्चा झाली. मात्र विधानपरिषदेवर संधी मिळाली नाही, यामुळे अपेक्षाभंग अजिबात नाही झाला. कुठली गोष्ट मागणे हे जनतेतून आलेल्या माणसाला अवघड जातं. पण मला काहीही वाटलं नाही आणि मी पक्षाचा निर्णय मान्य केला.

Pankaja Munde EXCLUSIVE | कोरोनाच्या संकट काळात राजकारण करण्याची गरज नाही - पंकजा मुंडे

महत्त्वाच्या बातम्या

Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Virar News: कौटुंबिक आघाताने आयुष्य पूर्णपणे बदलले, आता दिसेल त्याला मारते, नको नको ते करते; विरारमधील महिलेची वेदनादायी कहाणी
कौटुंबिक आघाताने आयुष्य पूर्णपणे बदलले, आता दिसेल त्याला मारते, नको नको ते करते; विरारमधील महिलेची वेदनादायी कहाणी
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
Embed widget