![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या लेव्हलचे नेते समजायचे, तर निवडणुकीत का पडले?; गिरीश महाजनांचा खडसेंवर निशाणा
भाजप नेते (BJP Leader) आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर थेट टीका केली आहे.
!['स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या लेव्हलचे नेते समजायचे, तर निवडणुकीत का पडले?; गिरीश महाजनांचा खडसेंवर निशाणा BJP Leader MLA Girish Mahajan Allegation on NCP Eknath Khadse in Jalgaon updates 'स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या लेव्हलचे नेते समजायचे, तर निवडणुकीत का पडले?; गिरीश महाजनांचा खडसेंवर निशाणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/27/97a826c68d45bb001609fa98472540fd_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : भाजप नेते (BJP Leader) आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर थेट टीका केली आहे. स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या लेव्हलचे नेते समजत होते, तर निवडणुकीत का पडले याचे आत्मपरीक्षण खडसेंनी करावे, असे म्हणत महाजन यांनी खडसेंवर निशाणा केला आहे. ईडीच्या मुद्यावर बोलतानाही महाजन यांनी खडसेंना चिमटा घेतला. ते म्हणाले की, तुम्ही काहीही केलेले नाही तर ईडीच्या चौकशीला सामोरे जावे. ईडी विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यात काहीही तथ्य नसेल तर तुम्हाला ईडी वाजत गाजत परत पाठवेल, असेही गिरीश महाजन यांनी म्हटलं.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जळगावात भाजपचा 1 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारच्या विरोधात धडक मोर्चा काढणार असल्याचे गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. गिरीश महाजन यांनी यावेळी शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, आर्यन खान व समीर वानखेडे प्रकरण, नवाब मलिकांचे आरोप अशा विषयांवर गिरीश महाजन यांनी टीका केली.
ड्रग्ज प्रकरणावर बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटलं की, राज्यात सर्वसामान्य जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना अख्खे मंत्रिमंडळ एका व्यक्तीला वाचवण्यासाठी ताकद लावतेय, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचं ते म्हणाले.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपचा घात केल्याचीही गिरीश महाजन यांनी टीका केली. विधानसभेत जसा दगा दिला तसाच प्रकार जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपसोबत घडल्याचेही त्यांनी सांगितले.
ड्रग्ज प्रकरणावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, एखादा अधिकारी चांगले काम करत असेल तर करू द्या ना, या प्रकरणात जे काही कायद्याने असेल ते होईल, पण एका माणसाला वाचविण्यासाठी सर्व मंत्रिमंडळ का टाहो फोडत आहे. नवाब मलिक हे मंत्री असताना सनदी अधिकाऱ्यांच्या बाबतीत चुकीचे आरोप प्रत्यारोप करत आहेत, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)