एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंचे चटर फटर काहीही बोलतात, महाराष्ट्र अशांत करण्याचे षडयंत्र सुरु, बदलापूर घटनेवरुन चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

बदलापूरमध्ये घडलेली घटना (Badlapur Incident) ही संवेदनशील आहे. पण या घटनेवर राजकारणी राजकीय पोळ्या भाजत असल्याचे मत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी व्यक्त केले.

Chitra Wagh : बदलापूरमध्ये घडलेली घटना (Badlapur Incident) ही संवेदनशील आहे. पण या घटनेवर राजकारणी राजकीय पोळ्या भाजत असल्याचे मत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी व्यक्त केले. या घटनेनंतर सरकारनं जे जे करायला हवं होतं, ते सगळं सरकारने केलं आहे. 1965 साली या शाळेची स्थापना झाली होती. या शाळेत फक्त भाजपची माणसे नाहीत, RSS ची माणसं नाहीयेच, तर बाकी सगळ्या पक्षाची सुद्धा माणसं असल्याचे वाघ म्हणाल्या. जनार्दन घोरपडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. हे सुद्धा या शाळेचे अध्यक्ष होते. इतर सुद्धा या संस्थेत उबाठाचे लोक आहेत. पण उद्धव ठाकरे म्हणतात की ही शाळा भाजपची होती असे वाघ म्हणाल्या. उद्धव ठाकरेंचे चटर फटर काहीही बोलतात. त्यांना काही माहिती नसते असंही वाघ म्हणाल्या. 

बदलापूरमधील लोकांना, पालकांना मी भेटले होते. ते म्हणाले साडेदहा वाजेपर्यंत आम्ही तिथे आंदोलन करत होतो. त्यानंतर झुंडीच्या झुंडी तिथे आल्या होत्या. तिथे लाडकी बहीण नको असे फ्लेक्स दिसले. हे कसे दिसले हे कळत नाही. आता उज्वल निकम सरकारी वकील नको असे विरोधक म्हणतात. आता लोकं म्हणतात त्यांचा आग्रह असतो की उज्वल निकम वकील आम्हाला हवेत असेही चित्रा वाघ म्हणाल्या. 'बदलापूर घटना ये तो बस विरोधको के लिए बहाणा है, लाडकी बहीण योजना पर निशान है', घाटकोपर घटनेवर विरोधकांचे राजकारण होत असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. 

आधी उज्वल निकम चालायचे आता का नको?

उद्धव ठाकरेंच्या काळात काँग्रेसचा काळात उज्वल निकम यांनी केस घेतल्या होत्या. आधी उज्वल निकम चालायचे आता मग का नको? कपिल सिब्बल चालतात मग उज्वल निकम का चालत नाहीत? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. उद्धव ठाकरेंचे चटर फटर काहीही बोलतात. त्यांना काही माहिती नसते. उज्वल निकम का नको? का घाबरताय? असा सवाल देखील वाघ यांनी केला.  

महाराष्ट्र अशांत कसा करायचा? याचं षडयंत्र सुरु

शक्ती कायद्याचं काय झालं विचारताय. त्याची एक प्रोसेस असते. राष्ट्र्पती यांच्याकडे हा कायदा पाठवला. त्यात काही बदल सुचवले, त्यानुसार काही बदल केले जातील आणि कायदा आणला जाईल असे वाघ म्हणाल्या. महाराष्ट्र अशांत कसा करायचा? बदनाम कसा करायचा? याच षडयंत्र हे करत असल्याचा आरोप वाघ यांनी विरोधकांवर केला. 

सुप्रिया सुळेंसह उद्धव ठाकरेंवर टीका

नाना पटोले म्हणतात, या घटनेची धग जाणवयाला हवी. प्रणिती शिंदे म्हणतात आंदोलकांनी आग लावायला पाहिजे होती. सुप्रिया सुळे यांचे सुळे दाखवायचे वेगळे आणि आतले वेगळे आहेत. सुप्रिया सुळे यांनी सुरक्षेसाठी निर्भया पथकतील गाड्या त्यांचं सरकार असताना वापरल्या आणि आता सुप्रिया ताई म्हणतात मला सुरक्षा नको असेही वाघ म्हणाल्या. साकीनाका घटना आठवत असेल, नांदेडची घटना, डोंबिवलीची घटना, चंद्रपूरची घटना, दिशा सालियनची घटना याची संशयची सुई आदित्य ठाकरेंवर होती. हे सगळं त्यांच्या सरकारमध्ये झाल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. मी या सगळ्यांबद्दल महा अधिवेशन बोलवावं अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती. पण त्यांनी सरकार असताना काही केलं नाही असे वाघ म्हणाल्या. 

महत्वाच्या बातम्या:

उद्याचा महाराष्ट्र बंद संस्कृती विरुद्ध विकृती, दुपारी दोन वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा; उद्धव ठाकरेंचे आवाहन

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget