एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंचे चटर फटर काहीही बोलतात, महाराष्ट्र अशांत करण्याचे षडयंत्र सुरु, बदलापूर घटनेवरुन चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

बदलापूरमध्ये घडलेली घटना (Badlapur Incident) ही संवेदनशील आहे. पण या घटनेवर राजकारणी राजकीय पोळ्या भाजत असल्याचे मत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी व्यक्त केले.

Chitra Wagh : बदलापूरमध्ये घडलेली घटना (Badlapur Incident) ही संवेदनशील आहे. पण या घटनेवर राजकारणी राजकीय पोळ्या भाजत असल्याचे मत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी व्यक्त केले. या घटनेनंतर सरकारनं जे जे करायला हवं होतं, ते सगळं सरकारने केलं आहे. 1965 साली या शाळेची स्थापना झाली होती. या शाळेत फक्त भाजपची माणसे नाहीत, RSS ची माणसं नाहीयेच, तर बाकी सगळ्या पक्षाची सुद्धा माणसं असल्याचे वाघ म्हणाल्या. जनार्दन घोरपडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. हे सुद्धा या शाळेचे अध्यक्ष होते. इतर सुद्धा या संस्थेत उबाठाचे लोक आहेत. पण उद्धव ठाकरे म्हणतात की ही शाळा भाजपची होती असे वाघ म्हणाल्या. उद्धव ठाकरेंचे चटर फटर काहीही बोलतात. त्यांना काही माहिती नसते असंही वाघ म्हणाल्या. 

बदलापूरमधील लोकांना, पालकांना मी भेटले होते. ते म्हणाले साडेदहा वाजेपर्यंत आम्ही तिथे आंदोलन करत होतो. त्यानंतर झुंडीच्या झुंडी तिथे आल्या होत्या. तिथे लाडकी बहीण नको असे फ्लेक्स दिसले. हे कसे दिसले हे कळत नाही. आता उज्वल निकम सरकारी वकील नको असे विरोधक म्हणतात. आता लोकं म्हणतात त्यांचा आग्रह असतो की उज्वल निकम वकील आम्हाला हवेत असेही चित्रा वाघ म्हणाल्या. 'बदलापूर घटना ये तो बस विरोधको के लिए बहाणा है, लाडकी बहीण योजना पर निशान है', घाटकोपर घटनेवर विरोधकांचे राजकारण होत असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. 

आधी उज्वल निकम चालायचे आता का नको?

उद्धव ठाकरेंच्या काळात काँग्रेसचा काळात उज्वल निकम यांनी केस घेतल्या होत्या. आधी उज्वल निकम चालायचे आता मग का नको? कपिल सिब्बल चालतात मग उज्वल निकम का चालत नाहीत? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. उद्धव ठाकरेंचे चटर फटर काहीही बोलतात. त्यांना काही माहिती नसते. उज्वल निकम का नको? का घाबरताय? असा सवाल देखील वाघ यांनी केला.  

महाराष्ट्र अशांत कसा करायचा? याचं षडयंत्र सुरु

शक्ती कायद्याचं काय झालं विचारताय. त्याची एक प्रोसेस असते. राष्ट्र्पती यांच्याकडे हा कायदा पाठवला. त्यात काही बदल सुचवले, त्यानुसार काही बदल केले जातील आणि कायदा आणला जाईल असे वाघ म्हणाल्या. महाराष्ट्र अशांत कसा करायचा? बदनाम कसा करायचा? याच षडयंत्र हे करत असल्याचा आरोप वाघ यांनी विरोधकांवर केला. 

सुप्रिया सुळेंसह उद्धव ठाकरेंवर टीका

नाना पटोले म्हणतात, या घटनेची धग जाणवयाला हवी. प्रणिती शिंदे म्हणतात आंदोलकांनी आग लावायला पाहिजे होती. सुप्रिया सुळे यांचे सुळे दाखवायचे वेगळे आणि आतले वेगळे आहेत. सुप्रिया सुळे यांनी सुरक्षेसाठी निर्भया पथकतील गाड्या त्यांचं सरकार असताना वापरल्या आणि आता सुप्रिया ताई म्हणतात मला सुरक्षा नको असेही वाघ म्हणाल्या. साकीनाका घटना आठवत असेल, नांदेडची घटना, डोंबिवलीची घटना, चंद्रपूरची घटना, दिशा सालियनची घटना याची संशयची सुई आदित्य ठाकरेंवर होती. हे सगळं त्यांच्या सरकारमध्ये झाल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. मी या सगळ्यांबद्दल महा अधिवेशन बोलवावं अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती. पण त्यांनी सरकार असताना काही केलं नाही असे वाघ म्हणाल्या. 

महत्वाच्या बातम्या:

उद्याचा महाराष्ट्र बंद संस्कृती विरुद्ध विकृती, दुपारी दोन वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा; उद्धव ठाकरेंचे आवाहन

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
Sanjay Gaikwad: बुलढाण्यात खूप मोठं 'ऑपरेशन टायगर' होणार, राज्यात सर्वात मोठा शिवसेनेचा बालेकिल्ला बुलढाणा होणार; संजय गायकवाडांचा दावा
बुलढाण्यात खूप मोठं 'ऑपरेशन टायगर' होणार, राज्यात सर्वात मोठा शिवसेनेचा बालेकिल्ला बुलढाणा होणार; संजय गायकवाडांचा दावा
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget