एक्स्प्लोर

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा, राष्ट्र प्रथम मंत्रासह विस्तार, रविंद्र चव्हाणांकडून गौरवशाली प्रवासाचा आढावा

BJP Foundation Day : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षाच्या 46 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत ‘राष्ट्र प्रथम’ विचारधारेचा पुनरुच्चार केला.

मुंबई : भारतीय जनता पक्षाने 6 एप्रिल रोडी 47 व्या वर्षात पदार्पण केलं. 6 एप्रिल 1980 रोजी स्थापन झालेल्या पक्षाने 46 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या निमित्ताने भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक्स पोस्टद्वारे पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेत कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

रवींद्र चव्हाण यांनी नमूद केलं की, विचारधारेच्या भक्कम मुळांवर उभा असलेला आणि कार्यकर्त्यांच्या संघर्षातून घडलेला भाजप आज विशाल वटवृक्ष बनला आहे. 6 एप्रिल 1980 रोजी रोवलेलं बीज आज 25 कोटींहून अधिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीने देशभर विस्तारलं आहे.

सामान्य कार्यकर्त्यापासून नेतृत्वापर्यंतचा प्रवास

रवींद्र चव्हाण यांनी आपल्या प्रवासाचा उल्लेख करत सांगितलं की, सामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष हा प्रवास केवळ भाजपसारख्या संघटनेतच शक्य आहे. भाजयुमो उपाध्यक्ष, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष असा प्रवास करताना पक्षाच्या विचारधारेने कार्यकर्ते घडवले, तर कार्यकर्त्यांनीही पक्ष घडवला, असं त्यांनी म्हटलं.

जनसंघाच्या काळात श्यामा प्रसाद मुखर्जी, दीन दयाळ उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या नेत्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन बहुसंख्य समाजाला केंद्रस्थानी ठेवण्याचं काम केलं. त्यांची दूरदृष्टी आजही मार्गदर्शक असल्याचं चव्हाण यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रातील भाजपच्या प्रवासात उत्तमराव पाटील, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या नेत्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. या नेत्यांनी संघटना तळागाळात नेऊन मजबूत केली, असं त्यांनी सांगितलं.

जातीय राजकारणाला उत्तर

भाजपवर कधी ‘शेटजी-भटजी’ पक्ष अशी टीका झाली होती. मात्र गेल्या 46 वर्षांत महाराष्ट्रात 11 बहुजन समाजातील प्रदेशाध्यक्ष देत भाजपने त्या टीकेला उत्तर दिलं आहे. पक्षाने समाजातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं असल्याचं चव्हाण यांनी नमूद केलं.

भाजप ही केवळ निवडणूक लढवणारी संघटना नसून विचारधारेवर उभी असलेली चळवळ आहे. ‘भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व’ हा विचार तळागाळात पोहोचवण्यात पक्ष यशस्वी ठरला आहे. ‘राष्ट्र प्रथम’ हीच पक्षाची मूलभूत भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. यात महाराष्ट्राचा 1 ट्रिलियन डॉलरचा वाटा सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हे कार्यकर्त्यांचं कर्तव्य असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. ‘अंत्योदय’च्या भावनेतून काम केल्यासच ‘विकसित भारत’चं स्वप्न पूर्ण होईल, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Rahul Gandhi PM Modi house: पंतप्रधान मोदींच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी राहुल गांधींनी कसा तयार केला सिक्रेट प्लॅन? वाचा इनसाईड स्टोरी
पंतप्रधान मोदींच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी राहुल गांधींनी कसा तयार केला सिक्रेट प्लॅन? वाचा इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Ajit Pawar and Sunetra Pawar: रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
Rahul Gandhi: एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
Ajit Pawar Birth Anniversary : दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: मिठी मारली, पाठ थोपटली...; अभिजीत दीपके हात पकडून उद्धव ठाकरेंना मंचावर घेऊन आले, Photo
मिठी मारली, पाठ थोपटली...; अभिजीत दीपके हात पकडून उद्धव ठाकरेंना मंचावर घेऊन आले, Photos
Embed widget