एक्स्प्लोर

बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी! अद्याप टँकरचा एकही प्रस्ताव नाही, मुबलक पाणीसाठा शिल्लक 

Beed News Update : बीड जिल्हावासियांसाठी यंदा आनंदाची बातमी आहे. कारण बीडमध्ये या वर्षी मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे अद्याप टँकरचा एकही प्रस्ताव प्रशासनाकडे आला नाही.  

Beed News Update : दरवर्षी उन्हाळा आला की बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात होते. एप्रिल-मे मध्ये तर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. परंतु, या वर्षी बीड वासियांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा अद्यापपर्यंत बीड जिल्ह्यात टँकरचा एकही प्रस्ताव आलेला नाही. मागच्या वर्षी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढली. याचाच परिणाम म्हणजे बीड जिल्ह्यात अद्याप कोठेही टँकरची मागणी झालेली नाही. 

उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी उपाय योजना करण्यात बीड जिल्हा प्रशासन व्यस्त असायचे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा आराखडा मांडला जायचा. मात्र,  मागच्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील पाणीसाठा चांगल्या स्थितीत आहे.

दुष्काळी बीड जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासूनच पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था प्रशासनाला करावी लागते. यंदा मात्र एप्रिलच्या मध्यापर्यंत टँकर मागणीसाठीचा एकही प्रस्ताव स्थानिक पातळीवरून जिल्हा प्रशासनाकडे आलेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी उद्भवलेला नाही.  

बीड जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून चर्चेत असतो. मागील दहा वर्षात दुष्काळी उपाययोजनांवर शासनाला या भागात अतिरिक्त पैसा खर्च करून गावोगावच्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर उपलब्ध करावे लागले. साधारण दोन ते तीन वर्षाआड बीड जिल्ह्यात उन्हाळ्यात हीच स्थिती अनुभवावी लागते. कमी पर्जन्यमान, शेतीसाठी उपलब्ध नसलेले पाणी आणि या विवंचनेतून होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा विषय ही तितकाच गंभीर आहे.  

यंदा मात्र, जिल्हा प्रशासनाला एप्रिल महिना मध्यावर आलेला असतानाही पाण्यासाठी एकही टँकर गाव, वाडी, वस्ती, तांड्यावर पाठवावे लागलेला नाही. बीड जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिकच पाऊस झाला.  त्यामुळे गोदावरी आणि कृष्णा खोर्‍याअंतर्गतच्या 144 प्रकल्पांमध्ये मोठा पाणी साठा उपलब्ध झाला. आता उन्हाळा सुरू झाल्याने बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होत आहे. त्यामुळे पिण्यासाठीच्या पाण्याच्या उपशामुळे प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला असला तरी तो समाधानकारक आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत जिल्ह्यात यंदा पिण्यासाठी गावोगावी टँकर सुरू करण्याची वेळ येणार नाही. 

जिल्ह्यात 52.53 टक्के पाणीसाठा उपलब्ध

पावसामुळे बीड जिल्ह्यातील गोदावरी व कृष्णा खोर्‍याअंतर्गतच्या 144 प्रकल्पांमध्ये सध्या 52.53 टक्के उपलब्ध झाला आहे. माजलगाव या मोठ्या प्रकल्पात 328 दलघमी (दशलक्ष घनमीटर) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच केज तालुक्यातील मांजरा या दुसर्‍या मोठ्या प्रकल्पातही सध्या 176.963 दलघमी पाणीसाठा आहे. या दोन प्रकल्पात मिळून 63.31 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यातील बीड व परळी विभागातील 16 मध्यम प्रकल्पात 51.37 टक्के तर 126 लघु प्रकल्पात 32.32 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात सर्व 144 प्रकल्पांच्या एकूण पाणीसाठ्याची टक्केवारी सद्यस्थितीत 52.53 टक्के इतकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने तुर्तास तरी पाण्याची अडचण नाही. 

महत्त्वाच्या बातम्या

Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
Embed widget