एक्स्प्लोर

ऐकावं ते नवलंच! जमिनीचा अधिक मावेजा मिळण्यासाठी रात्रीतून उभारली आमराई! महामार्गाची दिशा बदलल्याचाही आरोप 

Aurangabad Paithan Highway News : बड्या लोकांच्या जमिनींसाठी राष्ट्रीय महामार्गाची दिशा बद्दलल्याचा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

Aurangabad News Updates : बहुप्रतिक्षित औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाची अधिसूचना निघाल्यानंतर बडे बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर आणि राजकारणी शेत जमिनीतून अधिक मावेजा मिळावा म्हणून सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे या बड्या लोकांच्या जमिनींसाठी राष्ट्रीय महामार्गाची दिशा बद्दलल्याचा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. शिवाय अधिक मावेजा लाटण्यासाठी जमीन धारकांनी जी जमीन रस्त्यात जाणार आहे, त्यावर ती आमराई उभी केली आहे.
 
विशेष म्हणजे ही आमराई चार-पाच दिवसात उभी राहिली आहे. एवढ्या तातडीने आंबे लावण्याचं कारण शासनाकडून रस्त्यासाठी जमीन अधिग्रहित करताना अधिक मावेजा लाटण्याचं. काही दिवसापूर्वीच औरंगाबाद पैठण या चार पदरी रस्त्यासाठी जमीन अधिग्रहणासाठी नोटिफिकेशन निघालं. बडे बिल्डर आणि नेतेमंडळींनी जमिनीचा शोध घेऊन विकत घ्यायला सुरुवात झाली.औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर, उद्योजक आणि राजकारण्यांनी जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत. त्याच जमिनींमधून महामार्ग टाकण्याचा प्रकार घडला आहे. 

जमीन जाणार तिथून आंब्याची झाड का लावली?

आंब्याची झाड अधिग्रहित करत असताना मावेजा अधिक मिळतो.
झाडांचे पैसे देतांना झाडाचं आत्ताच असलेलं वय आणि भविष्यात किती काळ त्याचं फळ मिळू शकतं आणि त्यावेळी त्याची काय किंमत असेल हे सगळं पकडून मावेजा दिला जातो.
त्यामुळे कधीकधी जमिनीच्या पैशापेक्षा झाडाचे पैसे अधिक मिळतात.
 
'बड्या लोकांच्या फायद्यासाठी वळवला!'

गेवराई तांडा येथील गावकऱ्यांनी थेट रस्त्या बड्या लोकांच्या फायद्यासाठी वळवला असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे रस्त्याच्या मावेजासाठी कसे घोटाळे सुरू आहेत, हे समोर आले आहे. औरंगाबाद-पैठण मार्गावर सर्वात छोटे असलेल्या गेवराई तांडा गावासाठी बायपास देण्यात आलाय. तो बायपास गावातील एकाही शेतकऱ्याच्या जमिनीतून जाणार नाही. उलट धनदांडग्यांच्या आणि बड्या लोकांच्या जमिनींना लाभ देण्यासाठी हा खटाटोप केल्याचं दिसून येतंय.

औरंगाबाद-पैठण रस्त्यावर गेवराई तांडा हे सर्वात छोटे गाव आहे. तरीही या गावाला पूर्वेकडून बायपास रस्ता (रिअलाईनमेंट) करण्यात येणार आहे. म्हणजे हे गाव आता हायवेवर नसेल. तर गेवराई तांडा गावापेक्षा मोठे असलेल्या गावांना मात्र, बायपास केलेले नाही. विशेष म्हणजे या गावात अतिक्रमणे नाहीत, वाहतूक कोंडी होणारे गाव नाही, फार गजबजलेलेही गाव नाही, तरीही या गावाला बायपास केले आहे.

औरंगाबाद पैठण चौपदरीकरण झाल्यावर गेवराई तांडा येथील बायपास देण्यात आला. यासाठी शासनाला दहा एकर जमीन अधिग्रहित करावी लागेल आणि पूर्वीच्याच रस्त्याने जर चार पदरीकरण झालं तर केवळ सहा एकर जमीन अधिग्रहित करावी लागते.

बायपासमुळे लांबी आणि खर्चही वाढणार
औरंगाबाद-पैठण हा रस्ता सध्या 100 फूट रुंद संपादित जागेत दोन पदरी आहे. आता चार पदरी करण्यासाठी अधिकची 50 फूट जागा संपादित करायची आहे. मात्र, जिथे बायपास करायचे आहेत, तिथे पूर्ण 150 फूट रुंद जागा संपादित करावी लागणार आहे. गेवराई तांड्यामधून जाणारा सध्याचा रस्ता सरळ आहे. इथे बायपास केल्यास रस्त्याची लांबी एक किलोमीटरने वाढेल. तसेच बायपास करण्यासाठी 10 हेक्टर जमीन संपादित करावी लागेल तर बायपास न करता गेवराई तांड्यातूनच रस्ता पुढे नेल्यास अवघे 10 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. म्हणजे बायपासमुळे रस्त्याची लांबीही वाढणार आहे आणि पर्यायाने खर्चही वाढणार आहे.

धक्कादायक म्हणजे या रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत नोटिफिकेशन निघण्याच्या केवळ 15 दिवस आधी जमीन खरेदी करण्यात आली आहे. त्यापेक्षाही अधिक धक्कादायक म्हणजे भर उन्हाळ्यात आणि ऐन उष्णतेच्या लाटेत मोठमोठ्या आंब्याच्या फळझाडांची लागवड सुरू करण्यात आली आहे. कोणत्या गटातून हा रस्ता जाणार आहे, याची माहिती देणारे थ्री-ए नोटफिकेशन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने 24 एप्रिल रोजी प्रकाशित केले. 

रस्त्यासाठी जमीन अधिग्रहित करत असताना जर झाडं आली तर त्याचा मावेजा देताना सध्या असलेलं झाडाचं वय आणि पुढे भविष्यात किती काळ याला फळं लागू शकतात आणि त्यावेळी त्याची किंमत काय असेल या सगळ्याचं संशोधन केलं जातं. अगदी असंच मावेजा देतांना ही झाडं नेमकी कधी लावली आहेत याचं देखील संशोधन केलं तर भविष्यात अशा प्रकारची शासनाची फसगत थांबेल.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

 
15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
Pune Accident News: भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
Pune Sahyadri Hospital: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
Pune Accident News: भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
Pune Sahyadri Hospital: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
Pune Mundhwa Land Case : मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
धुरंधरमध्ये रहमान डकैत साकारत अक्षय खन्नाने भलताच भाव खाल्ला, पण खऱ्या आयुष्यात ‘नो-गो झोन’ केलेल्या कराचीच्या लियारीत रहमानचा शेवट कसा झाला? एन्काऊंटर करणारा एसपी चौधरी सुद्धा का वादात अडकला?
धुरंधरमध्ये रहमान डकैत साकारत अक्षय खन्नाने भलताच भाव खाल्ला, पण खऱ्या आयुष्यात ‘नो-गो झोन’ केलेल्या कराचीच्या लियारीत रहमानचा शेवट कसा झाला? एन्काऊंटर करणारा एसपी चौधरी सुद्धा का वादात अडकला?
Embed widget