एक्स्प्लोर

फडणवीस यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या व्हायरल कारणाचं खुद्द फडणवीस यांच्याकडूनच खंडन

केंद्राचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री बनल्याचा दावा कर्नाटकातील भाजप खासदार अनंत हेगडे यांनी केला आहे. हा दावा गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियात व्हायरल आहे. त्याला हेगडेंनी दुजोरा दिल्यावर त्याच्या बातम्या झाल्या. मात्र या दाव्याचं खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने खंडन केलं आहे.

मुंबई : केंद्र सरकारचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री बनले असा दावा भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केला आहे. भाजपकडे बहुमत नसतानाही फडणवीस मुख्यमंत्री का बनले असा सवाल आत्तापर्यंत उपस्थित करण्यात येत होता. त्यामागे कारण होते असा दावा हेगडेंनी केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केंद्राचे 40 हजार कोटी होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत आले असते तर त्यांनी 40 हजार कोटींचा दुरुपयोग केला असता, त्यामुळेच फडणवीस यांना 80 तासांचे मुख्यमंत्री व्हावं लागलं असा दावा हेगडेंनी केला आहे. 15 तासांत मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या फडणवीसांनी 40 हजार कोटी योग्य ठिकाणी पोहोचवले असा दावाही हेगडेंनी केलाय. अनंतकुमार हेगडेच्या दाव्याचं देवेंद्र फडणवीस कार्यालयाकडून खंडन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार अनंतकुमार हेगडेचा दावा फेटाळून लावला आहे. देवेंद्र फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री असतांना शेतकरी मदतीचा पाच हजार कोटी रुपयांच्या निर्णयाव्यतिरिक्त कोणताही निर्णय झालेला नाही. असे पैसे काही केंद्र थेट देत नसतं आणि असा पैसा राज्य सरकार परत पाठवू शकत नाही. व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड असलेल्या माहितीवर वक्तव्य करण्यापेक्षा पुराव्यानिशी बोलणं केव्हाही योग्य असल्याचं मतं देवेंद्र फडणवीस कार्यालयाने व्यक्त केलं आहे. अनंतकुमार हेगडेकडून करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचही स्पष्ट करण्यात आलं आहे. अनंतकुमार हेगडे काय म्हणाले? ‘80 तासांचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. राज्याच्या राजकारणात हा सगळा ड्रामा का केला असा प्रश्न उपस्थित झाला होता. आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहित नव्हतं का?, तरी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केंद्राच्या 40 हजार कोटींचा दुरुपयोग होऊ नये म्हणून हे सगळं करण्यात आलं’ असा दावा भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केला आहे. केंद्राचे हे सगळे 40 हजार कोटी रुपये विकासाच्या कामासाठी वापरले जाणार होते. यासाठीची योजना आधीपासून तयार होती. यासाठी हे सगळं करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेचच 15 तासांत 40 हजार कोटी केंद्राकडे पाठवण्यात आल्याचं हेगडेंनी सांगितलं. Anant Hegde |...म्हणून देवेंद्र फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री बनले : भाजप खासदार अनंत हेगडे | ABP Majha असे झाले असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना पायउतार व्हाव लागेल : नवाब मलिक खासदार अनंतकुमार हेगडेंच्या सांगण्यावरुन जर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठीचे 40 हजार कोटी रुपये परत पाठवले असल्यास जनता ते कधीचं सहन करणार नाही. असे झाले असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना पायउतार व्हाव लागेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. हा राज्यावरचा अन्याय असून ही आग देशभरात पसरेल आणि यावर कोणतही राज्य गप्प बसणार नाही असही नवाब मलिक म्हणाले. अनंतकुमार हेगडे कोण आहेत?
  • 1996 पासून सहा वेळा खासदार
  • सध्या उत्तर कन्नड मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात
  • जनतादल सेक्युलरच्या उमेदवाराला तब्बल 4 लाख 79 हजार मतांनी हरवून विजयी
  • पहिल्या मोदी सरकारमध्ये दीड वर्ष राज्यमंत्री होते
  • मुस्लिमविरोधी भूमिकेसाठी आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत
  • ताजमहाल, राहुल गांधींबाबतच्या वक्तव्यावरुन वाद
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी 26 नोव्हेंबरला सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आमच्याकडे बहुमत नसल्याने राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी काही कारणास्तव राजीनामा दिल्याने आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही, त्यामुळं मी राज्यपालांकडे राजीनामा देतं आहे. राज्यात भाजप चांगल्या विरोधी पक्षाचे काम करेल, असेही ते म्हणाले. तसेचं  जनादेशाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असं कधीचं ठरलं नव्हतं. शिवसेनेने आकडे बघून बार्गेनिंग सुरु केलं. जे लोकं मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले. महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी होता, असेही फडणवीस म्हणाले. आम्ही भूमिका घेतली होती की घोडेबाजार करणार नाही, फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी अख्खा घोड्याचा तबेला उभा केला असेही फडणवीस म्हणाले. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार असं कधीही ठरलं नव्हतं. न ठरलेल्या बाबींचा बाऊ केला, अनेक दिवस त्यांची वाट पाहिली, पण त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. महाविकासआघाडीचं तीन चाकं असलेलं सरकार चालणार नाही, असंही ते म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget