एक्स्प्लोर

शेतकऱ्यांचं समुपदेशन करा, आयजींच्या सूचनेने पोलिस कचाट्यात

नागपूर : पोलिसांची नेमकी जबाबदारी काय..? गुन्हेगारी रोखणे की शेतकऱ्यांचं समुपदेशन करणे. हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे अमरावती परिक्षेत्राचे आयजी विठ्ठल जाधव यांनी पोलिसांसाठी काढलेलं अजब फर्मान. जाधवांनी अमरावती विभागातील पोलिसांना शेतकरी आत्महत्या रोखण्याचा पाच कलमी कार्यक्रमाला जुंपलं आहे.   पोलिसांची मुख्य जबाबदारी असते ती, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची. पण, अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांना पोलिसांवर वेगळ्याच कामाचा भार टाकला आहे.   जाधवांच्या पत्रकातील सूचना : - जास्तीत जास्त शेतकरी मित्र बनवणे. - व्यसनाधीन शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्यांना व्यसन सोडण्यासाठी समुपदेशन करणे - बँक आणि कृषी अधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या अडचणी दूर करणे. - शेतकऱ्याच्या मुलींच्या लग्नासाठी मदत करणारे दानशूर शोधणे, प्रसंगी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणे. - कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन दात्यांच्या मदतीनं त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे.   शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी आयजी साहेबांनी हे पाऊल उचललं आहे. पण, पोलिसांवर आधीच भार असताना हा अधिकचा भार टाकण्याचा हे प्रयोग, निरर्थक असल्याचं शेतकरी नेत्यांना वाटतं.   खरं तर अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे शेतकरी आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध आहेत. पण, मुळात शेतकरी आत्महत्या आणि पोलीस विभागाचा तसं थेट संबंध नाही. त्यामुळे कृषी, महसूल, सहकार, अर्थ आणि ग्रामीण विकास विभागानं करायलं हवं, ते काम पोलिसांवर लादण्यात काहीच शहाणपणा नसल्याचं जाणकारांना वाटतं.   शेतकरी आत्महत्या रोखणं आणि त्याचं कल्याण करणं राज्यकर्त्यांच्या हातात आहे. त्यासाठी पोलिसांनी वेगळे प्रयत्न करण्याची तशी गरज नाही. फक्त पोलीस विभागातील भ्रष्टाचार, अरेरावी संपवून वाढत्या गुन्हेगारीला अटकाव करणं जरी पोलिसांना जमलं तरी जनता समाधानी होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde : आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी?ABP Majha Headlines : 11 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha | 16 June 2024Elon Musk EVM Special Report : एलॉन मस्क यांचा ईव्हीएमवर सवाल, भारतातही पेटला वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde : आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Embed widget