![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 162 कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू
Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 162 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्ण 132 कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
![Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 162 कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू Maharashtra Corona Update patients 132 discharged today 162 new cases in the state today Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 162 कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/52f0d3ca72241e6018e6d819c5ba1241_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) चढ उतार होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात 162 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 690 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही. राज्यात गेल्या 24 तासात 132 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज शून्य कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज शून्य कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,27, 683 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 99, 13, 632 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 690 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 690 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 415 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 53 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2067 नवे रुग्ण
देशातील कोरोना संसर्गात मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 2067 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 12 हजार 340 इतकी झाली आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 860 इतकी झाली आहे. मंगळवारी दिवसभरात देशात 1547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 13 हजार 248 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.49 टक्के इतका आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)