एक्स्प्लोर

अमित शाहांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याने सोलापुरात वातावरण चिघळलं, माथाडी कामगार आक्रमक, कांदा लिलाव ठप्प

जरं माथाडी कामगारांनी कांदा उतरवला नाही तर उद्या कांद्याच्या लिलावावर परिणाम होऊ शकतात

Solapur: राज्यात सध्या परभणीत झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणाने वातावरण तापलं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता सोलापूरात उमटले आहेत.
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यरात्री माथाडी कामगारांनी आंदोलन पुकारलं. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज शेकडो गाडीत कांदा येतो. रात्री उशिरा हा कांदा बाजार समितीमध्ये उतरवल्यानंतर सकाळी कांदयाचे लिलाव पार पडतात. मात्र रात्री 12 वाजता माथाडी कामगारांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा विरोधात तसेच सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन पुकारलं. शेतकऱ्यांनी आणलेल्या कांदा उतरवणार नसल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेकडो क्विंटल कांदा रात्रभर गाडीतच थांबून राहिला. 

माथाडी कामगारांनी पुकारलेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांची मोठा फौजफाटा बाजार समितीमध्ये दाखल झाला. यावेळी पोलिसांनी माथाडी कामगारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र हे सर्व माथाडी कामगार आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले. 

नक्की झाले काय?

सोलापूर बाजार समितीत दररोज शेकडो गाड्यांमधून कांदा येतो. रात्री उशिरा हा कांदा उतरवण्यात येतो, आणि सकाळी त्याचा लिलाव सुरू होतो. मात्र मंगळवारी मध्यरात्री माथाडी कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन जाहीर केले. त्यांनी कांदा उतरण्यास नकार दिल्यामुळे गाड्यांमधील कांदा उतरवला गेला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीत आणलेला कांदा गाड्यांमध्येच अडकून राहिला.या आंदोलनामुळे कांदा लिलाव प्रक्रिया वेळेत होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. कामगारांनी सांगितले की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हावी आणि अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोठा फौजफाटा बाजार समितीत पाठवला. पोलिसांनी माथाडी कामगारांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र कामगारांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय म्हणाले होते अमित शहा?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  लोकसभेत बोलताना आंबेडकरांचं नाव घेत एक वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी आता विरोधकांकडून केली जात आहे. आंबेडकरांचे नाव घेण्याची फॅशन सध्या झाली आहे असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं, त्यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अमित शाह काय म्हणाले?आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असे सारख म्हणत राहणं ही आजकाल विरोधकांत फॅशन झाली आहे. जर तुम्ही एवढ्यावेळा देवाचे नाव घेतला असता तर तुम्हाला सात जन्म स्वर्गप्राप्ती झाली असती, असे शाहांनी म्हटलं आहे. यानंतर लगेचच शाह यांनी आंबेडकर यांचे शंभर वेळा नाव घ्या, पण मी तुम्हाला आंबेडकरांबद्दल खरे काय वाटते ते सांगेन असे शाह यांनी म्हटले.

संबंधित बातमी:.

अमित शाहांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यांचे विधिमंडळात पडसाद, विरोधकांकडून संतप्त सवाल  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget