एक्स्प्लोर

Amarnath Yatra : पुण्यातील दोघांचा मृत्यू, तीन जिल्ह्यातील 111 भाविक सुखरुप 

Amarnath Yatra : महाराष्टातून अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी शेकडो भाविक जात असतात. या दुर्घटनेवेळी तेथे महाराष्ट्रातील अनेक भाविक उपस्थित असतील.

Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीच्या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील दोन जणांचाही येथे मृत्यू झाला आहे. महाराष्टातून अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी शेकडो भाविक जात असतात. या दुर्घटनेवेळी तेथे महाराष्ट्रातील अनेक भाविक उपस्थित असतील. काही भाविकांचा संपर्क झालाय तर अनेकजण बेपत्ता असल्याचे समजतेय. आतापर्यंत पुणे, अकोला, बीड  जिल्ह्यातील भाविकांची माहिती मिळाली आहे. जसजशी इतर जिल्ह्यातील माहिती मिळेल, तुम्हाला अपडेट्स देत राहू...  

पुण्यातील 14 भाविक संपर्काबाहेर; 36 नागरिक सुखरुप
पुण्याच्या आळंदीतून अमरनाथ यात्रेला गेलेले 14 भाविक संपर्काबाहेर आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. या अमरनाथ यात्रेसाठी पुण्यातून दरवर्षी भाविक जातात. यावर्षी एकून 50 भाविक यात्रेसाठी गेले होते. अपघातानंतर पुण्यातील भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता 50 पैकी 36 भाविकांशीच संपर्क होऊ शकला आहे. मात्र 14 नागरिकांशी अजूनही काहीच संपर्क होऊ शकला नसल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. 

पुण्यातील दोन जणांचा मृत्यू - 
पुण्यातील धायरी येथे असणाऱ्या भोसले कुटुंबाचे देखील तीन सदस्य हे या यात्रेसाठी गेले होते. ज्यामध्ये सुनीता भोसले यांचं दुःखद निधन झालं आहे. धायरी मध्ये राहणारे महेश राजाराम भोसले,सुनिता महेश भोसले,प्रमिला प्रकाश शिंदे हे तिघे देखील बेपत्ता झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी धायरी येथे भोसले कुटुंबाची भेट घेत त्यांच सांत्वन करत जिल्हा प्रशासनाशी भोसले कुटुंबाचा संपर्क देखील करून दिला आहे. पिंपरीतील मृत्यू झालेले नागरिक सुखरुप परतले होते. मात्र परतल्यावर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी जागीच प्राण सोडले, अशी माहिती अमरनाथ यात्रा आयोजक शुभम खेडेकर यांनी दिली आहे. अमरनाथ यात्रेसाठी यावर्षी पुण्यातून एकून 50 भाविक गेले होते. त्यातल्या अनेक नागरिकांशी सकाळपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु होता.

बीडमधील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील 11 भाविक अमरनाथ येथे अडकले, 28 सुखरुप -
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून  दिनांक पाच जुलै रोजी  39 भाविक अमरनाथ यात्रेला गेले होते. तिथे अचानक ढगफुटी झाली, पूरग्रस्त स्थिती तयार झाली. पूर्ण भारतामधून अमरनाथ (बाब बर्फानी) यात्रेसाठी दरवर्षी भाविक भक्त जात असतात, यावर्षी ही आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून 39 भाविक भक्त गेले होते, त्यातील 28 भविक भक्त  बालटल येथे सुखरूप खाली आले आहेत. तर 11 जन वरतीच अडकले आहेत, तरी त्यांना  एन डी आर एफ  जवान आणि भारतीय लष्कराच्या मदतीने सुरक्षित स्थळे आणण्याचे  काम प्रगती पथावर  चालू आहे.

अकोल्यातील 47 यात्रेकरुंशी संपर्क - 
अकोल्यातून अमरनाथ यात्रेकरिता गेलेल्या 18 यात्रेकरूंचा गट सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनाशी आतापर्यंत 47 यात्रेकरूनी संपर्क केला आहे. यातील 29 यात्रेकरू अकोटचे आणि अकोल्यातील 18 यात्रेकरूंचा गट अमरनाथ यात्रा न करताच पहलगामवरून वैष्णोदेवीकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या सांगलीतील भाविकांचा उत्साह कायम...  
अमरनाथ मध्ये शुक्रवारी  ढगफुटी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतरही अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्यां भाविकांचा उत्साह कायम दिसून येत आहे.  सांगलीतून मोठया संख्येने भाविक शनिवारी अमरनाथ यात्रेसाठी रवाना झालेत. भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी  उर्फ पप्पू डोंगरे यांच्या सहकार्यातून हे भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत.  यंदा जिल्हाभरातून जवळपास दोन हजार भाविक अमरनाथ यात्रेसाठी जात आहेत. मागील 14  वर्षांपासून शिवाजी  उर्फ पप्पू डोंगरे हे स्वतःच्या खर्चातून  माधवनगर, सांगली भागांतील नागरिकांना अमरनाथ यात्रेचे दर्शन घडवले आहे. कोरोनामुळे मागे दोन वर्षांमध्ये अमरनाथ यात्रा होऊ शकली नव्हती.  त्यामुळे यंदा अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर संख्या दिसून येत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Raj Thackeray And Uddhav Thackeray मोठी बातमी: ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंसोबत अबोला, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंसोबत अबोला, काय घडलं?
Sachin Kalyanshetti vs Bhaskar Jadhav : तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!
तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Embed widget