एक्स्प्लोर

अजब प्रेम की गजब कहानी... पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात दोघांवर अंत्यसंस्कार

शहरातील एका वयस्कर दांपत्याने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला. 60 वर्ष वैवाहिक जीवन आनंदात घालवल्यानंतर 82 वर्षीय रमेशसिंग आणि 76 वर्षांच्या पद्माबाई या वयस्कर दांपत्यानं जगाचा निरोप घेतला.

अकोला : लग्नाआधी प्रियकर अन् प्रेयसी यांच्यातील प्रेम लग्नानंतर (Marriage) अधिक घट्ट होतं, असं म्हणतात. पण, प्रेमविवाह न करता, कुटुंबाच्या सहमतीने लग्न झालेल्या पती अन् पत्नीच्या निखळ प्रेमाची कित्येक उदाहरणं समाजात आहेत. आपल्या पतीसोबत शेतात कुळव धरुन शेती करणारी पत्नी आपण पाहिली असेल. रस्त्यावर भाजीचा गाडा लावणाऱ्या पतीला मदतीची हात देणारी पत्नी तुम्ही पाहिली असेल, तर पतीच्या कामात खांद्याला खांदा लावून मदत करणारी अर्धांगिणी तुम्ही पाहिली. म्हणूनच, पती अन् पत्नीच्या प्रेमाची गोष्ट छोटी डोंगराएवढीय, असे म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अकोल्यातील (Akola) एका जोडप्यानं आपल्या याच प्रेमाची (Love) जणू कबुलीच दिल्याची घटना घडली आहे. 

शहरातील एका वयस्कर दांपत्याने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला. 60 वर्ष वैवाहिक जीवन आनंदात घालवल्यानंतर 82 वर्षीय रमेशसिंग आणि 76 वर्षांच्या पद्माबाई या वयस्कर दांपत्यानं जगाचा निरोप घेतला. या दोघांच्या मृत्यूमध्ये केवळ 8 तासांचा फरक होता. या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, म्हणूनच त्यांनी एकत्रपणे या जगातून निरोप घेतल्याची चर्चा आता त्यांच्या मृत्यूनंतर होत आहे. रमेशशिंग आणि पद्माबाई या दोघांची पहिली भेट साधारणता 60 वर्षापूर्वी रमेशसिंग हे लग्नासाठी मुलगी पाहायला गेले असता झाली, त्यावेळी ते 22 वर्षांचे, तर पदमाबाई अंदाजे 16 वर्षांच्या होत्या. कुटुंबातील वरिष्ठांनी दोघांचे लग्न लावले. दरम्यान लग्नानंतर पद्माबईंनी पतीसोबत अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरात अख्खं आयुष्य घालवलं. 60 वर्षापेक्षा दीर्घकाळ एकमेकांसोबत राहिल्यानंतर दोघांचं काल मध्यरात्री निधन झाले. आज (27 मे'रोजी) सोमवारी दुपारी राहत्या बाळापुरात दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय भावनिक आणि प्रेमाची साक्ष देणारा हा दु:खद प्रसंग पाहून स्मशानात अनेकांचे डोळे पाणावले.

अकोला जिल्ह्याच्या बाळापुर शहरातील गुजराती पूरा भागातील ही घटना. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या 8 तासातच पत्नीचाही मृत्यू झाला. लग्नानंतर 60 वर्षे एकत्र आयुष्याचा प्रवास केल्यानंतर दोघांनी काही वेळाच्या अंतरातच जगाचा निरोप घेतला. रमेशसिंग करणसिंग गौतम (वय 82) आणि पदमाबाई रमेश गौतम (वय 72) यांचा 60 वर्षापूर्वी विवाह झाला होता. पदमाबाई यांचे माहेर धुळे जिल्ह्यातील असून, रमेशसिंग हे मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी होते. कुटुंबातील वरिष्ठांच्या एकमतांने दोघांचा विवाह पार पडला होता. दोघांनाही लग्नानंतर दोन मुलं आणि दोन मुली झाल्या. मुला-मुलींचे लग्न होऊन नातवंड झाली. दोघांनी 60 वर्षे सोबत संसार केल्यानंतर काल मध्यरात्री त्यांनी अखेरचा जगाचा निरोप घेतला. 

पति रमेशसिंग यांचे दीर्घ आजाराने रविवारी रात्री 7 वाजताच्या सुमारास मृत्यु झाला. तर पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी पद्माबाई यांचादेखील आज पहाटे मृत्यू झाला. पती-पत्नीच्या निधनानंतर परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान दोघांनीही आयुष्याचा बराच काळ एकत्र घालवला. त्यामुळेच पतीच्या मृत्यूचा धक्का पदमाबाईंना सहन न झाल्यानेच त्यांनीही आपाल जीव त्यागल्याचं बोललं जातंय. दरम्यान, आज दुपारी राहत्या घरापासून पती-पत्नीची अंत्ययात्रा काढण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येनं नातेवाईक आणि स्थानिक लोक सहभागी झाले. दोन्ही मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. बाळापुरच्या स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी, दोघांमध्ये खूप प्रेम होतं, असे यावेळी कुटुंबीयांनी सांगितले.

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Embed widget