एक्स्प्लोर

Aditya Thakckeray : 'दसरा मेळाव्यात शिंदेंनी एसटीवर 10 कोटींचा खर्च केला', उदय सामंतांच्या आरोपांना आदित्य ठाकरेंचं उत्तर

Aditya Thakckeray : इंडिया आघाडीच्या बैठकीवर मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या टीकेवर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : "गुवाहाटीला गेले त्याचा खर्च कोणी केला असा सवाल विचारत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उदय सामंतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये विरोधकांच्या बैठकीचं (Opposition Meeting) आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी होणाऱ्या खर्चाचा लेखाजोखा उदय सामंतांकडून (Uday Samant) मांडण्यात आला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी अनेक विरोधी पक्षाचे नेते सध्या मुंबईत दाखल होत आहेत. 

50 खोके कुठून आले : आदित्य ठाकरे

दसऱ्या मेळाव्यात शिंदेंनी एसटीसाठी 10 कोटी रुपये दिले असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. गुवाहाटीला गेले त्याचा खर्च कोणी केला. त्यासाठीच्या चार्टड प्लेनचा खर्च कोणी केला. स्वत:च्या कार्यक्रमाच्या खर्चावर बोला, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी उदय सामंतांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. तसेच 50 खोके कोणी दिले हे आधी सांगा, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. 

'राम मंदिरासाठी भाजपचं श्रेय शून्य'

"आम्ही स्वत: राम मंदिराच्या ठिकाणी गेलो होतो. राम मंदिराचा विषय बाळासाहेब ठाकरे यांनी समोर आणला होता. आधी मंदिर आणि नंतर सरकार हे आम्ही सांगितलं होतं. राम मंदिर उभारण्यासाठी भाजपचं श्रेय शून्य आहे. जो निकाल आला तो सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचं काही काम नाही," असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. 

आम्ही देशाचा आवाज पुढे घेऊन जातोय : आदित्य

"आम्ही देशाचा आवाज पुढे घेऊन जात आहोत. देशाचं संविधान पुढे नेत आहोत. आम्ही लोकशाही लढत आहोत. आम्ही देशाचा आवाज संसदेत पोहोचवणार आहोत. त्यामुळे कोण काय बोलतंय याचा काही फरक पडत नाही. आम्ही सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र आलो आहोत," असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. 

'आमची लढाई हुकूमशाही विरोधात'

"आमची पहिली बैठक पाटण्यात झाली होती. नंतर बंगळुरुमध्ये झाली. अनेक पक्ष आमच्याशी जोडले जात आहेत. अनेक लोक आमच्याशी जोडले जात आहेत. आमची लढाई ही हुकूमशाहीच्या विरोधात आहे. लोक आता एकत्र येतायत त्यामुळे बदल नक्की होईल," असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

"आज शेतकरी त्रस्त आहेत, महिलांना अनेक अडचणी आहेत. जे लोक घाबरट आहेत ती सगळी लोक एकत्र आली आहेत. त्यांना आपल्या संविधानाशी अडचण आहे. त्यांना आता असं वाटतयं की इंडिया जिंकणार आहे म्हणून ते घाबरलेत," असं आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपकडे पंतप्रधान पदासाठी कोणताही चेहरा नाही पण आमच्याकडे बरेच चेहरे असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला. 

हेही वाचा : 

Uday Samant : 'जेवणाची एक प्लेट साडेचार हजार रुपयांची, 45 हजारांच्या 65 खुर्च्या', इंडिया आघाडीच्या बैठकीचा उदय सामंतांनी मांडला खर्च

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Mumbai Protest : ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Maharashtra Rain Updates: पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget